शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे मताधिक्य राजेश टोपेंची चिंता वाढवणारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 13:13 IST

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती निश्चित झाली आहे. यामध्ये घनसावंगी मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला येणार हे निश्चित मानले जात आहे. त्या दृष्टीने हिकमत उढाण यांनी काम सुरू केले आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएने मोठा विजय मिळवत पुन्हा एकदा सत्तेत पुनरागमन केले. या विजयामुळे महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप युतीचा आत्मविश्वास वाढला असून अवघ्या तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीतील निकालामुळे विरोधी पक्षांची झोप उडाली असताना २०१४ मध्ये आपला विधानसभा मतदार संघ अभेद्य ठेवणाऱ्या आमदारांची चिंता वाढली आहे. या आमदारांमध्ये आता जालन्यातील घनसावंगी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांचाही समावेश झाला आहे.

२०१४ लोकसभा निवडणुकीत राजेश टोपे यांनी मोदी लाटेतही घनसावंगीचा गड कायम राखला होता. जालना जिल्ह्यातून टोपे यांच्या रुपाने आघाडीला पाचपैकी एक जागा मिळाली होती. आता मात्र ही जागा लोकसभेच्या निकालानंतर आघाडीसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. लोकसभेसाठी परभणी मतदार संघाचे शिवसेना उमेदवार संजय जाधव यांना घनसावंगी विधानसभा मतदार संघातून २४ हजारहून अधिक मतांची आघाडी मिळाली आहे. अर्थात यात भाजपची मतं मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र भाजप-शिवसेना एकत्र लढल्यास राजेश टोपे यांना कडवे आव्हान मिळणार अशी चर्चा मतदार संघात आहे.

घनसावंगी मतदार संघातून राजेश टोपे सलग दुसऱ्यांना विजय झाले. २००९ मध्ये त्यांची लढत शिवसेनेविरुद्ध होती. तर २०१४ मध्ये त्यांना भाजप उमेदवार विलासबापू खरात यांनी चांगलीच झुंज दिली. ते दुसऱ्या स्थानी होते. टोपे यांना ९८ हजार ३० तर विलासबापू यांना ५४ हजार ५५४ मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या हिकमत उढाण यांना ४५ हजार ६५७ मते मिळाली होती. घनसावंगी मतदार संघात काँग्रेसची ताकत फारशी नाही.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती निश्चित झाली आहे. यामध्ये घनसावंगी मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला येणार हे निश्चित मानले जात आहे. त्या दृष्टीने हिकमत उढाण यांनी काम सुरू केले आहे. त्यातच लोकसभेत शिवसेनाला मिळालेले मताधिक्य उढान यांचा उत्साह वाढविणारे आहे. तरी राजेश टोपे यांचा मतदार संघात असलेला दांडगा जनसंपर्क पाहिल्यास उढाण यांच्यासाठी ही लढाई वाटते तितकी सोपी नक्कीच नाही. साखर कारखाने, शिक्षण संस्था आणि सुतगिरणी यामुळे टोपे यांचे मतदार संघावर चांगली पकड आहे. त्यामुळे युतीत ही जागा कुणालाही सुटली तर युतीच्या उमेदवाराची लढत टोपे यांच्याशी होणार हे मात्र निश्चित आहे.