शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे मताधिक्य राजेश टोपेंची चिंता वाढवणारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 13:13 IST

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती निश्चित झाली आहे. यामध्ये घनसावंगी मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला येणार हे निश्चित मानले जात आहे. त्या दृष्टीने हिकमत उढाण यांनी काम सुरू केले आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएने मोठा विजय मिळवत पुन्हा एकदा सत्तेत पुनरागमन केले. या विजयामुळे महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप युतीचा आत्मविश्वास वाढला असून अवघ्या तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीतील निकालामुळे विरोधी पक्षांची झोप उडाली असताना २०१४ मध्ये आपला विधानसभा मतदार संघ अभेद्य ठेवणाऱ्या आमदारांची चिंता वाढली आहे. या आमदारांमध्ये आता जालन्यातील घनसावंगी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांचाही समावेश झाला आहे.

२०१४ लोकसभा निवडणुकीत राजेश टोपे यांनी मोदी लाटेतही घनसावंगीचा गड कायम राखला होता. जालना जिल्ह्यातून टोपे यांच्या रुपाने आघाडीला पाचपैकी एक जागा मिळाली होती. आता मात्र ही जागा लोकसभेच्या निकालानंतर आघाडीसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. लोकसभेसाठी परभणी मतदार संघाचे शिवसेना उमेदवार संजय जाधव यांना घनसावंगी विधानसभा मतदार संघातून २४ हजारहून अधिक मतांची आघाडी मिळाली आहे. अर्थात यात भाजपची मतं मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र भाजप-शिवसेना एकत्र लढल्यास राजेश टोपे यांना कडवे आव्हान मिळणार अशी चर्चा मतदार संघात आहे.

घनसावंगी मतदार संघातून राजेश टोपे सलग दुसऱ्यांना विजय झाले. २००९ मध्ये त्यांची लढत शिवसेनेविरुद्ध होती. तर २०१४ मध्ये त्यांना भाजप उमेदवार विलासबापू खरात यांनी चांगलीच झुंज दिली. ते दुसऱ्या स्थानी होते. टोपे यांना ९८ हजार ३० तर विलासबापू यांना ५४ हजार ५५४ मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या हिकमत उढाण यांना ४५ हजार ६५७ मते मिळाली होती. घनसावंगी मतदार संघात काँग्रेसची ताकत फारशी नाही.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती निश्चित झाली आहे. यामध्ये घनसावंगी मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला येणार हे निश्चित मानले जात आहे. त्या दृष्टीने हिकमत उढाण यांनी काम सुरू केले आहे. त्यातच लोकसभेत शिवसेनाला मिळालेले मताधिक्य उढान यांचा उत्साह वाढविणारे आहे. तरी राजेश टोपे यांचा मतदार संघात असलेला दांडगा जनसंपर्क पाहिल्यास उढाण यांच्यासाठी ही लढाई वाटते तितकी सोपी नक्कीच नाही. साखर कारखाने, शिक्षण संस्था आणि सुतगिरणी यामुळे टोपे यांचे मतदार संघावर चांगली पकड आहे. त्यामुळे युतीत ही जागा कुणालाही सुटली तर युतीच्या उमेदवाराची लढत टोपे यांच्याशी होणार हे मात्र निश्चित आहे.