शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे मताधिक्य राजेश टोपेंची चिंता वाढवणारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 13:13 IST

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती निश्चित झाली आहे. यामध्ये घनसावंगी मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला येणार हे निश्चित मानले जात आहे. त्या दृष्टीने हिकमत उढाण यांनी काम सुरू केले आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएने मोठा विजय मिळवत पुन्हा एकदा सत्तेत पुनरागमन केले. या विजयामुळे महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप युतीचा आत्मविश्वास वाढला असून अवघ्या तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीतील निकालामुळे विरोधी पक्षांची झोप उडाली असताना २०१४ मध्ये आपला विधानसभा मतदार संघ अभेद्य ठेवणाऱ्या आमदारांची चिंता वाढली आहे. या आमदारांमध्ये आता जालन्यातील घनसावंगी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांचाही समावेश झाला आहे.

२०१४ लोकसभा निवडणुकीत राजेश टोपे यांनी मोदी लाटेतही घनसावंगीचा गड कायम राखला होता. जालना जिल्ह्यातून टोपे यांच्या रुपाने आघाडीला पाचपैकी एक जागा मिळाली होती. आता मात्र ही जागा लोकसभेच्या निकालानंतर आघाडीसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. लोकसभेसाठी परभणी मतदार संघाचे शिवसेना उमेदवार संजय जाधव यांना घनसावंगी विधानसभा मतदार संघातून २४ हजारहून अधिक मतांची आघाडी मिळाली आहे. अर्थात यात भाजपची मतं मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र भाजप-शिवसेना एकत्र लढल्यास राजेश टोपे यांना कडवे आव्हान मिळणार अशी चर्चा मतदार संघात आहे.

घनसावंगी मतदार संघातून राजेश टोपे सलग दुसऱ्यांना विजय झाले. २००९ मध्ये त्यांची लढत शिवसेनेविरुद्ध होती. तर २०१४ मध्ये त्यांना भाजप उमेदवार विलासबापू खरात यांनी चांगलीच झुंज दिली. ते दुसऱ्या स्थानी होते. टोपे यांना ९८ हजार ३० तर विलासबापू यांना ५४ हजार ५५४ मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या हिकमत उढाण यांना ४५ हजार ६५७ मते मिळाली होती. घनसावंगी मतदार संघात काँग्रेसची ताकत फारशी नाही.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती निश्चित झाली आहे. यामध्ये घनसावंगी मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला येणार हे निश्चित मानले जात आहे. त्या दृष्टीने हिकमत उढाण यांनी काम सुरू केले आहे. त्यातच लोकसभेत शिवसेनाला मिळालेले मताधिक्य उढान यांचा उत्साह वाढविणारे आहे. तरी राजेश टोपे यांचा मतदार संघात असलेला दांडगा जनसंपर्क पाहिल्यास उढाण यांच्यासाठी ही लढाई वाटते तितकी सोपी नक्कीच नाही. साखर कारखाने, शिक्षण संस्था आणि सुतगिरणी यामुळे टोपे यांचे मतदार संघावर चांगली पकड आहे. त्यामुळे युतीत ही जागा कुणालाही सुटली तर युतीच्या उमेदवाराची लढत टोपे यांच्याशी होणार हे मात्र निश्चित आहे.