शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

पावसाची चाहूल, तरीही दुष्काळाचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2015 04:32 IST

गतवर्षीचा दुष्काळ आणि गारपिटीमुळे हताश झालेला शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतानाच राज्याच्या कृषी विभागाने त्यांच्या उरल्यसुरल्या आशेवरही पाणी फेरणारी बातमी

पुणे : गतवर्षीचा दुष्काळ आणि गारपिटीमुळे हताश झालेला शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतानाच राज्याच्या कृषी विभागाने त्यांच्या उरल्यसुरल्या आशेवरही पाणी फेरणारी बातमी आणली आहे़ एल निनोच्या प्रभावामुळे जून, जुलै आणि आॅगस्ट अशा नेमक्या पेरणीच्या मोसमातच पाऊस ओढ देणार असल्याने राज्यावर यंदाही दुष्काळाचे गडद ढग घोंघावत आहेत.हवामान खाते, पंचांग आणि ग्रामीण भागातील घटमांडणीच्या सूत्रानुसार यंदा चांगला पाऊसकाळ असल्याचे भाकीत वर्तविण्यात आले होते़ त्या आशेवर असलेल्या बळीराजाने बी-बियाणांची तजवीज करून ठेवली होती, मात्र ऐन मृग नक्षत्राच्या तोंडावर कमी पावसाची कडू वार्ता आली आहे़ येत्या आठ ते पंधरा दिवसांत पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी हा पाऊस बेभरवशाचा राहणार आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरणी करताना घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाचे सल्लागार डॉ. रामचंद्र साबळे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे़ यंदा मान्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव अधिक प्रमाणात दिसून येणार आहे. तो सरासरीच्या ९५ टक्के इतका असेल़ कोकण आणि मराठवाड्यात मात्र तो सर्वात कमी असेल़, असा अंदाज कृषी विभागाने ‘मॉन्सून मॉडेल’वरून काढला आहे़ साबळे यांच्या मते मराठवाड्यात ९०, कोकणात ९०.५, विदर्भात ९६, उत्तर महाराष्ट्रात ९७ व पश्चिम महाराष्ट्रात ९९.८ टक्के पावसाचा अंदाज आहे़ (प्रतिनिधी)