शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

राज्यभरात मुसळधार; कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात अतिवृष्टी; दरडी कोसळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 05:38 IST

जाेरदार काेसळणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुरामुळे शहर बाजारपेठेला पुराने वेढा दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १६१ मि.मी. पाऊस पडला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली असून, दरडी कोसळल्याने अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत बनली.  पुढील तीन दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापुरात मुसळधार पाऊस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो पाऊस  सुरू आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. कोयना धरणाची पाणी पातळी दिवसभरात ३ टीएमसीने वाढली आहे. तापोळा-महाबळेश्वर रस्त्यासह अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून, त्याचा वाहतुकीवर परिणाम होत वाहतूक विस्कळीत झाली. मलकापूरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने पुणे-बंगळुरू महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सांगलीतही सर्वत्र धुवाधार पाऊस सुरू असून, इस्लामपूर, सांगलीत अतिवृष्टी झाली आहे. 

जाेरदार काेसळणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुरामुळे शहर बाजारपेठेला पुराने वेढा दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १६१ मि.मी. पाऊस पडला आहे.

मराठवड्यातील परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव ते उक्कडगाव या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने परिसरातील सात गावांचा संपर्क काही काळासाठी तुटला होता. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातही तुरळक पाऊस पडला. जोरदार पावसाने रायघोळ आणि पूर्णा नदीला पूर आला होता. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि बुलडाणा जिल्ह्यात गुरुवारी दमदार पावसाने हजेरी लावली. यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार येथे अडाण नदीच्या पुरात वाहून गेल्याने देवराव प्रल्हाद मेश्राम (६२) यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Rainपाऊस