शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

राज्यभरात मुसळधार; कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात अतिवृष्टी; दरडी कोसळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 05:38 IST

जाेरदार काेसळणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुरामुळे शहर बाजारपेठेला पुराने वेढा दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १६१ मि.मी. पाऊस पडला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली असून, दरडी कोसळल्याने अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत बनली.  पुढील तीन दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापुरात मुसळधार पाऊस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो पाऊस  सुरू आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. कोयना धरणाची पाणी पातळी दिवसभरात ३ टीएमसीने वाढली आहे. तापोळा-महाबळेश्वर रस्त्यासह अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून, त्याचा वाहतुकीवर परिणाम होत वाहतूक विस्कळीत झाली. मलकापूरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने पुणे-बंगळुरू महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सांगलीतही सर्वत्र धुवाधार पाऊस सुरू असून, इस्लामपूर, सांगलीत अतिवृष्टी झाली आहे. 

जाेरदार काेसळणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुरामुळे शहर बाजारपेठेला पुराने वेढा दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १६१ मि.मी. पाऊस पडला आहे.

मराठवड्यातील परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव ते उक्कडगाव या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने परिसरातील सात गावांचा संपर्क काही काळासाठी तुटला होता. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातही तुरळक पाऊस पडला. जोरदार पावसाने रायघोळ आणि पूर्णा नदीला पूर आला होता. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि बुलडाणा जिल्ह्यात गुरुवारी दमदार पावसाने हजेरी लावली. यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार येथे अडाण नदीच्या पुरात वाहून गेल्याने देवराव प्रल्हाद मेश्राम (६२) यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Rainपाऊस