शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील ८ जिल्ह्यांत पाणीसंकट, राज्यभरातील पावसाच्या सरासरीपेक्षा विदर्भात कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 21:57 IST

मान्सूनने आपला परतीचा प्रवास सुरू केला असून, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यातील ८ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० टक्क्यांहून कमी पाऊस झाला असून, त्या ठिकाणी पुढील काळात पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. 

पुणे - मान्सूनने आपला परतीचा प्रवास सुरू केला असून, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यातील ८ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० टक्क्यांहून कमी पाऊस झाला असून, त्या ठिकाणी पुढील काळात पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे.  मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यांतही कमी पाऊस झाला असून, तेथेही पुढील काळात पाणीसंकट उद्भवण्याची शक्यता आहे.देशभरात यंदा मान्सूनचा पाऊस सर्वसाधारण झाला असून, आता त्याने परतीचा प्रवास सुरू केला आहे. या प्रवासात देशाच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असते. राज्यात परतीचा पाऊस हा साधारणपणे पर्जन्यछायेच्या प्रदेशात अधिक होतो. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या प्रदेशांत मान्सूनने यंदा चांगला हात दिला असला तरी विदर्भाला त्याची अवकृपा सहन करावी लागली आहे.  मान्सूनच्या चार महिन्यांच्या काळात विदर्भात काही दिवसांचा अपवाद वगळता फारसा पाऊस झाला नाही. जो पाऊस झाला तो कमी दिवसात पडला. आता परतीचा पाऊस पडला तरी पावसाचा बँकलॉग इतका आहे की, विदर्भात सरासरीइतका पाऊस होण्याची शक्यता नाही.  त्यामुळे पुढील काळात पिके त्याचबरोबर पिण्याचे पाणी आणि वीजनिर्मितीसाठी लागणा-या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. 

मराठवाड्यात यंदा मान्सूनने भरपूर साथ दिल्याने नदी, धरणे भरून वाहत आहेत. जायकवाडी धरण ओव्हरफ्लो झाले असले तरी हिंगोली -२७, परभणी -२१, नांदेड -२१ टक्के या तीन जिल्ह्यांत सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे. औरंगाबाद -६, जालना -१ या जिल्ह्यांतही कमी पाऊस झाला आहे. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये भरपूर पाऊस झाला असून त्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्याचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर येथे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. राज्यात सर्वाधिक अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा ५८ टक्के अधिक पाऊस पडला असून, त्याखालोखाल पुणे जिल्ह्यात ५१ टक्के पाऊस झाला आहे. सिंधदुर्ग जिल्ह्यात धो धो पाऊस झाला असल्याचे दिसत असले तरी तो सरासरीपेक्षा ५ टक्के कमी आहे. धुळे जिल्ह्यात सरासरी ऐवढा पाऊस झाला आहे. 

सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेले जिल्हे (वजा)(टक्के)

गडचिरोली - २३, चंद्रपूर -३२, गोंदिया -३७, भंडारा -२७, यवतमाळ -३४, अमरावती -२९, अकोला -२२, वाशीम -२८, वर्धा -१४, नागपूर -३, हिंगोली २७, परभणी -२१, नांदेड -२१, नंदूरबार -१०, जळगाव -१४, औरंगाबाद  -६, जालना -१, सांगली -१६, सिंधदुर्ग -५, कोल्हापूर -१६

सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेले जिल्हे (टक्के) 

अहमदनगर ५८, पुणे ५१, पालघर १७, ठाणे ३३, मुंबई ९, रायगड १७, रत्नागिरी ४, सातारा १६, सोलापूर २७, उस्मानाबाद २६, लातूर ३, बीड १३, बुलढाणा २