शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
4
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
5
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
6
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
7
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
8
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
9
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
10
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
11
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
12
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
13
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
16
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
17
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
18
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
19
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
20
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?

विदर्भातील ८ जिल्ह्यांत पाणीसंकट, राज्यभरातील पावसाच्या सरासरीपेक्षा विदर्भात कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 21:57 IST

मान्सूनने आपला परतीचा प्रवास सुरू केला असून, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यातील ८ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० टक्क्यांहून कमी पाऊस झाला असून, त्या ठिकाणी पुढील काळात पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. 

पुणे - मान्सूनने आपला परतीचा प्रवास सुरू केला असून, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यातील ८ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० टक्क्यांहून कमी पाऊस झाला असून, त्या ठिकाणी पुढील काळात पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे.  मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यांतही कमी पाऊस झाला असून, तेथेही पुढील काळात पाणीसंकट उद्भवण्याची शक्यता आहे.देशभरात यंदा मान्सूनचा पाऊस सर्वसाधारण झाला असून, आता त्याने परतीचा प्रवास सुरू केला आहे. या प्रवासात देशाच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता असते. राज्यात परतीचा पाऊस हा साधारणपणे पर्जन्यछायेच्या प्रदेशात अधिक होतो. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या प्रदेशांत मान्सूनने यंदा चांगला हात दिला असला तरी विदर्भाला त्याची अवकृपा सहन करावी लागली आहे.  मान्सूनच्या चार महिन्यांच्या काळात विदर्भात काही दिवसांचा अपवाद वगळता फारसा पाऊस झाला नाही. जो पाऊस झाला तो कमी दिवसात पडला. आता परतीचा पाऊस पडला तरी पावसाचा बँकलॉग इतका आहे की, विदर्भात सरासरीइतका पाऊस होण्याची शक्यता नाही.  त्यामुळे पुढील काळात पिके त्याचबरोबर पिण्याचे पाणी आणि वीजनिर्मितीसाठी लागणा-या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. 

मराठवाड्यात यंदा मान्सूनने भरपूर साथ दिल्याने नदी, धरणे भरून वाहत आहेत. जायकवाडी धरण ओव्हरफ्लो झाले असले तरी हिंगोली -२७, परभणी -२१, नांदेड -२१ टक्के या तीन जिल्ह्यांत सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे. औरंगाबाद -६, जालना -१ या जिल्ह्यांतही कमी पाऊस झाला आहे. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये भरपूर पाऊस झाला असून त्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्याचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर येथे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. राज्यात सर्वाधिक अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा ५८ टक्के अधिक पाऊस पडला असून, त्याखालोखाल पुणे जिल्ह्यात ५१ टक्के पाऊस झाला आहे. सिंधदुर्ग जिल्ह्यात धो धो पाऊस झाला असल्याचे दिसत असले तरी तो सरासरीपेक्षा ५ टक्के कमी आहे. धुळे जिल्ह्यात सरासरी ऐवढा पाऊस झाला आहे. 

सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेले जिल्हे (वजा)(टक्के)

गडचिरोली - २३, चंद्रपूर -३२, गोंदिया -३७, भंडारा -२७, यवतमाळ -३४, अमरावती -२९, अकोला -२२, वाशीम -२८, वर्धा -१४, नागपूर -३, हिंगोली २७, परभणी -२१, नांदेड -२१, नंदूरबार -१०, जळगाव -१४, औरंगाबाद  -६, जालना -१, सांगली -१६, सिंधदुर्ग -५, कोल्हापूर -१६

सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेले जिल्हे (टक्के) 

अहमदनगर ५८, पुणे ५१, पालघर १७, ठाणे ३३, मुंबई ९, रायगड १७, रत्नागिरी ४, सातारा १६, सोलापूर २७, उस्मानाबाद २६, लातूर ३, बीड १३, बुलढाणा २