शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांना रेनकोट वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 02:19 IST

८० हजार रेनकोटचे वितरण; ‘निर्मल वारी’ उपक्रमाच्या माध्यमातून स्वयंसेवकांना भेट

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाचरणी लीन होण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातून जाणाºया वारकऱ्यांना आता पावसात भिजावे लागणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांना रेनकोट भेट दिले.आतापर्यंत सुमारे ८० हजार रेनकोटचे वितरण विविध पालख्यांमधील वारकरी बांधवांना करण्यात आले असून एकूण साडेपाच लाख रेनकोटचे वितरण पालखी मार्गस्थ होण्यापूर्वी करण्यात येत आहे. ‘निर्मल वारी’ उपक्रमाच्या माध्यमातून शेकडो स्वयंसेवकांनी या रेनकोटच्या वितरणाची मोहीम हाती घेतली आहे.गेल्या वर्षी प्लास्टिकबंदीमुळे पावसापासून बचाव करायला हे प्लास्टिक वापरले तर कारवाई होईल, अशी भीती त्र्यंबकेश्वरमध्ये श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीतील वारकºयांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारतीय यांच्याकडे बोलून दाखविली. भारतीय यांनी तिथूनच हे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले. त्यांनी वारीपुरती प्लास्टिकबंदी उठविली व वारकºयांचा पावसापासून बचाव करण्यासाठी काहीतरी ठोस केले पाहिजे, असे मनावर घेतले. वारकºयांची सेवा करण्याच्या परंपरेचा एक भाग म्हणून त्या बाबत खारीचा वाटा उचलला.पालखीच्या ठिकाणी करणार वाटपश्री निवृत्तीनाथ महाराज पालखी, मोहम्मद शहा बाबांची पालखी, मध्य प्रदेशातून येणारी श्री भाकरे महाराज पालखी, एकनाथबाबा पालखी; देवगड आदी ठिकाणी रेनकोटचे वितरण करण्यात आले. श्री तुकोबा, श्री ज्ञानेश्वर माऊली पालखीतही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :varkariवारकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस