शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

पाऊस रडवूनच परतणार; राज्यात दोन दिवसांपासून तडाखा; सोयाबीन, कापूस, तूर पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 06:10 IST

यंदा अतिवृष्टी, संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला / अहमदनगर / उस्मानाबाद /मुंबई: यंदा अतिवृष्टी, संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उरलेसुरले पीक शेतात असताना गेले दोन दिवस राज्यातील अनेक भागांना परतीच्या पावसाने तडाखा दिला असून, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची भीती आहे.

अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. सोंगणीला आलेल्या सोयाबीनच्या पिकाला पाण्याचा वेढा पडला. वाशिम जिल्ह्यातील दापुरा आणि चौसाळा, म्हसनीनजीकच्या नाल्याला पूर आल्याने त्या गावांचा संपर्क तुटला.  

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि परिसरात गुरुवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे. तळेगाव व पाटणादेवी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने डोंगरी व तितूर नद्यांना पूर आला. भडगाव तालुक्यात शेतांमध्ये पाणी साचले. शिरसगावात पुराचे पाणी शिरले. पावसामुळे कपाशी पीक खराब होत आहे, तर कापणीला आलेली मका, ज्वारी व बाजरीची पिकेही नष्ट होण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात पिके पुन्हा पाण्यात गेली आहेत. शुक्रवारी सकाळपर्यंत चार मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. माजलगाव धरण शुक्रवारी पहाटे ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या एका दरवाजातून सकाळी ४०६ क्युसेकने पाणी सिंदफना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. 

अतिवृष्टीने पिकांची नासाडी 

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा व जामखेड तालुक्यात अतिवृष्टीने पिकांची नासाडी झाली. दोन्ही तालुक्यात गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या नद्या - नाल्यांना पूर आला, तर जामखेड तालुक्यात पूल वाहून गेला. नेवासा तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले. नंदुरबार तालुक्यात वेचणीवर आलेला कापूस आणि मिरचीचे नुकसान झाले आहे. कापूस ओला झाला तर लाल मिरचीची प्रतवारी खराब होणार आहे.

चार-पाच दिवस धिंगाणा

पुढील चार ते पाच दिवसांसाठी राज्यभरात सर्वत्र गडगडाटासह पाऊस पडेल आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

८ ऑक्टोबर : राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. ९ ऑक्टोबर : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पाऊस होईल. १० ऑक्टोबर : कोकण, मध्य महाराष्ट्र, प. महाराष्ट्र आणि उ. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पाऊस पडेल. ११ ऑक्टोबर : मुंबई, म. महाराष्ट्रासह विदर्भात जाेरदार पाऊस पडेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस