शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

Rain Update: मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीची शक्यता; समुद्र खवळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 06:51 IST

समुद्र खवळलेला असल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा

मुंबई : तेलंगणावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा गेल्या ६ तासांत १४ ऑक्टोबर रोजी पश्चिमेकडे सरकला आहे. कमी दाबाचा पट्टा सोलापूरपासून (मध्य महाराष्ट्र) ११० किलोमीटर पूर्वेला आहे. कमी दाबाचा पट्टा पुढे पश्चिम-वायव्येकडे सरकत जाऊन पुढील १२ तासांत कमी होणार आहे. त्यानंतर, कमी दाबाचा पट्टा पश्चिम-वायव्येकडे सरकून १६ ऑक्टोबर रोजी अरबी समुद्रात महाराष्ट्र किनाऱ्याकडे येईल. महाराष्ट्रात अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात आगामी १२ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

१५ ऑक्टोबर : कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीची (२० सेंमी प्रतिदिन)  शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटकात पुढील १२ तासांत ३०-४० किलोमीटर ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील.

१५ ऑक्टोबर : सकाळी महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर ४०-५० किमी प्रतितास ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.

१६ ऑक्टोबर : संध्याकाळी अरबी समुद्राच्या ईशान्येकडे याचा वेग हळूहळू वाढत जाऊन ४५-५५ किमी प्रतितास ते ६५ किमी प्रतितास एवढा होईल.

१६ ऑक्टोबर : महाराष्ट्र किनारपट्टीवरील ईशान्य अरबी समुद्र खवळलेल्या स्थितीत असेल.

१६ ऑक्टोबर : पुढील तीन दिवस मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पाऊस आणि वाऱ्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये गव्हाचे पीक, केळी, पपई आणि इतर फळबागा, शेवग्याच्या शेंगाची झाडे आणि भाज्यांचे नुकसान होईल. मुसळधार पावसामुळे कच्च्या बंधाऱ्यांचे नुकसान होईल. सखल भागांमध्ये पूर, पाणी साचणे, वाहतुकीत अडथळा, भूस्खलन होईल आणि पाणीसाठे निर्माण होतील. तसेच रस्ते ओले आणि निसरडे होतील. अतिवृष्टीमुळे नाल्यांमध्ये  अडथळा येऊन अचानक पूरस्थिती निर्माण होईल.             

टॅग्स :Rainपाऊस