शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरी, ढगांच्या गडगडाटासह रेकॉर्ड ब्रेक पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 20:06 IST

कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी दुपारी 2 .30 वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गड़गडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. गणेशोत्सवाला प्रारंभ होतानाच सिंधुदुर्गात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर चार दिवस पावसाने विश्रांती घेतली होती.त्यामुळे वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढले होते. तर पुन्हा पावसाने हजेरी लावली होती.

कणकवली, दि. 10 - कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी दुपारी 2 .30 वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गड़गडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. गणेशोत्सवाला प्रारंभ होतानाच सिंधुदुर्गात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर चार दिवस पावसाने विश्रांती घेतली होती.त्यामुळे वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढले होते. तर पुन्हा पावसाने हजेरी लावली होती.अनंत चतुर्दशीनंतर गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास विजेच्या कड़कडाटासह पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असला तरी पुन्हा उष्णतेचे प्रमाण वाढले होते . तसेच एवढ़्यातच ऑक्टोबर हिटची चाहुल लागायला लागली आहे.रविवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास कणकवली तालुक्यासह जिल्ह्यातील इतर भागातहि पाऊस झाला. सायंकाळी 5 वाजल्यानंतर पावसाचा जोर ओसरला असला तरी तुरळक सरी अधून मधून कोसळत होत्या. त्यामुळे सतरा दिवसांच्या गणरायाना निरोप देण्यात भाविकाना अडचण निर्माण झाली होती.दुपारनंतर पडलेल्या या जोरदार पावसाने कणकवली तालुक्यात कुठेही नुकसान झाल्याची नोंद सायंकाळी उशिरा पर्यन्त कणकवली येथील तहसील कार्यालयात करण्यात आलेली नव्हती. सिंधुदुर्गात पावसाने गडगडाटासह दमदार हजेरी लावली. काही ठीकाणी झाडाच्या फांद्या विज वाहिन्यांवर तुटून पडल्याने विज गायब झाली होती. तर ढगाळ वातावरण असल्याने सर्वत्र काळोख पसरला होता. कुडाळमध्येही विजांच्या कडकडाटासह सह पावसाची हजेरी लावली. ⁠⁠⁠⁠⁠सावंतवाड़ी तालुक्यातही मुसळधार पाऊस कोसळला. विजेचा लपंडाव सुरु असल्याने व्यापारी वर्ग हैराण झाला होता.देवगड तालुक्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. तसाच ढगांचा कडकडाटही सुरु होता. हा पाऊस भात शेतीला फ़ायदेशीर ठरणार का? याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही शेतकऱ्यांकडून भात चिम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.