शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

पावसाने उडविली दाणादाण

By admin | Updated: August 6, 2015 01:13 IST

पश्चिम विदर्भात अतिवृष्टीची नोंद झाली असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग केल्याने अकोला, वाशिम, अमरावती, बुलडा, यवतमाळ, भंडारा, वर्धा जिल्ह्यात नद्यांना पूर आला आहे

मुंबई : पश्चिम विदर्भात अतिवृष्टीची नोंद झाली असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग केल्याने अकोला, वाशिम, अमरावती, बुलडा, यवतमाळ, भंडारा, वर्धा जिल्ह्यात नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले तर काही गावांचा संपर्क तुटला आहे. खान्देशात जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची रिपरिप सुरू होती. औरंगाबाद, नांदेड, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, जालना जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जळगाव जिल्ह्यात पावसामुळे दोन वृद्ध महिलांचा बुडून मृत्यू झाला. त्यात शामाबाई राजाराम महाजन (७०, रा. ऐनपूर ता. रावेर) आणि झामाबाई देवराम येशे (७५, रा. उत्राण ता. एरंडोल) यांचा समावेश आहे. अमरावतीमध्ये शहानूर नदीला आलेल्या पुरात मनोहर श्रीराम काळे (५५) वाहून गेले. अकोला जिल्ह्यात अदमपूर येथील रेशमा पंढरी भोजने (७५) ही महिला नागझिरी नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. यवतमाळमध्ये ढाणकी येथील असिम खान मोबीन खान पठाण व एका २१ वर्षीय तरुणाचा सहस्त्रकुंड धबधब्यामध्ये पडून मृत्यू झाला.विदर्भात धुवाधार ! : अकोला (१७९.४ मिमी), वाशिम (१६४.२ मिमी), अमरावती (१४८.८ मिमी), बुलढाणा (१४४.२ मिमी) व यवतमाळमध्ये (८६.३ मिमी) पावसाने दाणादाण उडविली.पुराचा हाहाकार  बुलडाण्यात पूर्णा नदीला पूर ऊर्ध्व वर्धा धरणाचे १३ तर निम्न वर्धा धरणाचे ३१ दरवाजे उघडलेयवतमाळचे निळोणा धरण ओव्हर फ्लो  जळगाव जिल्ह्यात १० व अमरावती जिल्ह्यात १२ गावांचा संपर्क तुटला

जळगावमधील भाटीचे धरण ओव्हर फ्लो, हतनूर धरणाचे ४१ दरवाजी उघडले लातूर : मराठवाड्यातील पावसाचे अल्प प्रमाण पाहता विभागासाठी म्हणून कृत्रिम पावसाची कायमस्वरुपी यंत्रणा उभी करणार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. लातूर येथील विमानतळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारने केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला यश आले आहे. योगायोगाने विदर्भासह मराठवाड्यात पाऊस सुरू झाला आहे. परंतु शासनाने कृत्रिम पावसासाठीची सारी यंत्रणा लावली होती. रडार गुरुवारी येणार होते. मात्र विमानातील छोट्या रडारवर ढग पाहून आम्ही रसायनाच्या नळकांड्या फोडल्या, याला यश आले आहे. कृत्रिम पाऊस किती पडला याची आकडेवारी लवकरच हाती येईल. कृत्रिम पावसासाठी आणखी एक विमान मराठवाड्यात येणार आहे. आता काही ठिकाणी पडलेला पाऊस हा पाच मीमी पेक्षा जास्त आहे. कृषी विभागाच्या मते पाच मीमी इतका पाऊस हा पिकांच्या वाढीसाठी पोषक असल्याचे म्हणत असल्याने कृत्रिम पाऊस पुरेसा आहे.