शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने उडविली दाणादाण

By admin | Updated: August 6, 2015 01:13 IST

पश्चिम विदर्भात अतिवृष्टीची नोंद झाली असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग केल्याने अकोला, वाशिम, अमरावती, बुलडा, यवतमाळ, भंडारा, वर्धा जिल्ह्यात नद्यांना पूर आला आहे

मुंबई : पश्चिम विदर्भात अतिवृष्टीची नोंद झाली असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग केल्याने अकोला, वाशिम, अमरावती, बुलडा, यवतमाळ, भंडारा, वर्धा जिल्ह्यात नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले तर काही गावांचा संपर्क तुटला आहे. खान्देशात जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची रिपरिप सुरू होती. औरंगाबाद, नांदेड, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, जालना जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जळगाव जिल्ह्यात पावसामुळे दोन वृद्ध महिलांचा बुडून मृत्यू झाला. त्यात शामाबाई राजाराम महाजन (७०, रा. ऐनपूर ता. रावेर) आणि झामाबाई देवराम येशे (७५, रा. उत्राण ता. एरंडोल) यांचा समावेश आहे. अमरावतीमध्ये शहानूर नदीला आलेल्या पुरात मनोहर श्रीराम काळे (५५) वाहून गेले. अकोला जिल्ह्यात अदमपूर येथील रेशमा पंढरी भोजने (७५) ही महिला नागझिरी नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. यवतमाळमध्ये ढाणकी येथील असिम खान मोबीन खान पठाण व एका २१ वर्षीय तरुणाचा सहस्त्रकुंड धबधब्यामध्ये पडून मृत्यू झाला.विदर्भात धुवाधार ! : अकोला (१७९.४ मिमी), वाशिम (१६४.२ मिमी), अमरावती (१४८.८ मिमी), बुलढाणा (१४४.२ मिमी) व यवतमाळमध्ये (८६.३ मिमी) पावसाने दाणादाण उडविली.पुराचा हाहाकार  बुलडाण्यात पूर्णा नदीला पूर ऊर्ध्व वर्धा धरणाचे १३ तर निम्न वर्धा धरणाचे ३१ दरवाजे उघडलेयवतमाळचे निळोणा धरण ओव्हर फ्लो  जळगाव जिल्ह्यात १० व अमरावती जिल्ह्यात १२ गावांचा संपर्क तुटला

जळगावमधील भाटीचे धरण ओव्हर फ्लो, हतनूर धरणाचे ४१ दरवाजी उघडले लातूर : मराठवाड्यातील पावसाचे अल्प प्रमाण पाहता विभागासाठी म्हणून कृत्रिम पावसाची कायमस्वरुपी यंत्रणा उभी करणार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. लातूर येथील विमानतळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारने केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला यश आले आहे. योगायोगाने विदर्भासह मराठवाड्यात पाऊस सुरू झाला आहे. परंतु शासनाने कृत्रिम पावसासाठीची सारी यंत्रणा लावली होती. रडार गुरुवारी येणार होते. मात्र विमानातील छोट्या रडारवर ढग पाहून आम्ही रसायनाच्या नळकांड्या फोडल्या, याला यश आले आहे. कृत्रिम पाऊस किती पडला याची आकडेवारी लवकरच हाती येईल. कृत्रिम पावसासाठी आणखी एक विमान मराठवाड्यात येणार आहे. आता काही ठिकाणी पडलेला पाऊस हा पाच मीमी पेक्षा जास्त आहे. कृषी विभागाच्या मते पाच मीमी इतका पाऊस हा पिकांच्या वाढीसाठी पोषक असल्याचे म्हणत असल्याने कृत्रिम पाऊस पुरेसा आहे.