शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

पावसाने उडविली दाणादाण

By admin | Updated: August 6, 2015 01:13 IST

पश्चिम विदर्भात अतिवृष्टीची नोंद झाली असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग केल्याने अकोला, वाशिम, अमरावती, बुलडा, यवतमाळ, भंडारा, वर्धा जिल्ह्यात नद्यांना पूर आला आहे

मुंबई : पश्चिम विदर्भात अतिवृष्टीची नोंद झाली असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग केल्याने अकोला, वाशिम, अमरावती, बुलडा, यवतमाळ, भंडारा, वर्धा जिल्ह्यात नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले तर काही गावांचा संपर्क तुटला आहे. खान्देशात जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची रिपरिप सुरू होती. औरंगाबाद, नांदेड, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, जालना जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जळगाव जिल्ह्यात पावसामुळे दोन वृद्ध महिलांचा बुडून मृत्यू झाला. त्यात शामाबाई राजाराम महाजन (७०, रा. ऐनपूर ता. रावेर) आणि झामाबाई देवराम येशे (७५, रा. उत्राण ता. एरंडोल) यांचा समावेश आहे. अमरावतीमध्ये शहानूर नदीला आलेल्या पुरात मनोहर श्रीराम काळे (५५) वाहून गेले. अकोला जिल्ह्यात अदमपूर येथील रेशमा पंढरी भोजने (७५) ही महिला नागझिरी नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. यवतमाळमध्ये ढाणकी येथील असिम खान मोबीन खान पठाण व एका २१ वर्षीय तरुणाचा सहस्त्रकुंड धबधब्यामध्ये पडून मृत्यू झाला.विदर्भात धुवाधार ! : अकोला (१७९.४ मिमी), वाशिम (१६४.२ मिमी), अमरावती (१४८.८ मिमी), बुलढाणा (१४४.२ मिमी) व यवतमाळमध्ये (८६.३ मिमी) पावसाने दाणादाण उडविली.पुराचा हाहाकार  बुलडाण्यात पूर्णा नदीला पूर ऊर्ध्व वर्धा धरणाचे १३ तर निम्न वर्धा धरणाचे ३१ दरवाजे उघडलेयवतमाळचे निळोणा धरण ओव्हर फ्लो  जळगाव जिल्ह्यात १० व अमरावती जिल्ह्यात १२ गावांचा संपर्क तुटला

जळगावमधील भाटीचे धरण ओव्हर फ्लो, हतनूर धरणाचे ४१ दरवाजी उघडले लातूर : मराठवाड्यातील पावसाचे अल्प प्रमाण पाहता विभागासाठी म्हणून कृत्रिम पावसाची कायमस्वरुपी यंत्रणा उभी करणार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. लातूर येथील विमानतळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारने केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला यश आले आहे. योगायोगाने विदर्भासह मराठवाड्यात पाऊस सुरू झाला आहे. परंतु शासनाने कृत्रिम पावसासाठीची सारी यंत्रणा लावली होती. रडार गुरुवारी येणार होते. मात्र विमानातील छोट्या रडारवर ढग पाहून आम्ही रसायनाच्या नळकांड्या फोडल्या, याला यश आले आहे. कृत्रिम पाऊस किती पडला याची आकडेवारी लवकरच हाती येईल. कृत्रिम पावसासाठी आणखी एक विमान मराठवाड्यात येणार आहे. आता काही ठिकाणी पडलेला पाऊस हा पाच मीमी पेक्षा जास्त आहे. कृषी विभागाच्या मते पाच मीमी इतका पाऊस हा पिकांच्या वाढीसाठी पोषक असल्याचे म्हणत असल्याने कृत्रिम पाऊस पुरेसा आहे.