शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Rain in Diwali: दिवाळीही पावसात भिजणार; उष्ण लाटांमुळे रेंगाळली परतीच्या पावसाची पावले 

By रूपेश उत्तरवार | Updated: October 14, 2022 06:37 IST

राज्यातून पाऊस १५ ऑक्टोबरनंतर परत जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे काढणीला आलेले पीक भुईसपाट होत आहे.

- रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परतीच्या पावसाचे गणित २०१० पासून बिघडले आहे. साधारणत: १७ सप्टेंबरला राजस्थानातून माघारी फिरणारा पाऊस यंदा २३ सप्टेंबरपासून माघारी फिरत आहे. मात्र, उष्ण लाटांमुळे राज्यात पावसाचा मुक्काम वाढला आहे. 

राज्यातून पाऊस १५ ऑक्टोबरनंतर परत जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे काढणीला आलेले पीक भुईसपाट होत आहे. शेतकऱ्यांना पुढील खरीप हंगामातील पेरणीच्या तारखाही बदलाव्या लागतील, असे मत हवामान अभ्यासक नोंदवीत आहेत. 

दिवाळीतही पाऊसमुंबई : परतीच्या पावसाचे वेध लागले असताना मुंबईसह राज्यभरात पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. हवामान विभागाने शुक्रवारी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. शनिवारनंतर पाऊस थांबणार असला तरी दिवाळीदरम्यान २० ते २४ ऑक्टोबरदरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.१४ ऑक्टोबर - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर (यलो अलर्ट)१५ ऑक्टोबर - रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग (यलो अलर्ट)१६ आणि १७ ऑक्टोबर - संपूर्ण महाराष्ट्र (ग्रीन अलर्ट)

पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रात मोठे बदलपृथ्वीवरील तापमानात सतत वाढ होत आहे. पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. यातून हवामानात मोठा बदल होत आहे. कमी दाबाचे पट्टे वारंवार तयार होतात. वातावरणात भोवऱ्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने ढगफुटीसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातून नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

दहा वर्षांत कधी परतला पाऊस?वर्ष     तारीख२०१०     ११ ऑक्टोबर२०११     १३ ऑक्टोबर२०१२     १५ ऑक्टोबर२०१३     १९ ऑक्टोबर२०१४     १४ ऑक्टोबर२०१५     १५ ऑक्टोबर२०१६     १८ ऑक्टोबर२०१७     २९ ऑक्टोबर२०१८     १८ ऑक्टोबर२०१९     १२ ऑक्टोबर२०२०     १९ ऑक्टोबर२०२१     २० ऑक्टोबर२०२२     अजून अनिश्चित 

टॅग्स :Rainपाऊस