शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसात रेल्वे विस्कळीत, मुंबईकरांचे हाल

By admin | Updated: July 2, 2014 14:47 IST

भर पावसात कांजूरमार्ग ते कुर्ला स्थानकांदरम्यान गाड्यांची लांबच लांब रांग लागलेली असतानाच रेल्वे अवघ्या २० मिनिटे उशीराने धावत असल्याची चुकीची माहिती रेल्वेतर्फे देण्यात येत आहे.

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २ -  दमदार पावसाची हजेरी त्यात भर म्हणजे कुर्ल्याला सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने हालात पडलेली भर प्रवाशांसाठी डोकुदुखी झालेली असताना मध्य रेल्वेने अत्यंत दिशाभूल करणारी अनाउन्समेंट करत प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप दिला. बुधवारी सकाळी मुंबईसह उपनगरामध्ये पावसानं हजेरी लावली. परंतु सकाळी दहाच्या नंतर कुर्ल्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि पार कांजूरमार्गपर्यंत धीम्या गतीच्या मार्गावर गाड्यांची रांग लागली आणि हजारो प्रवासी भर वाटेत खोळंबले. असे असतानाही रेल्वे मात्र गाड्या १५ ते २० मिनिटे उशीरानं धावत असल्याची धादांत खोटी अनाउन्समेंट करत असल्याचे दिसून आले. परिणामी ठाणे डोंबिवलीतल्या हजारो प्रवाशांनी पुढे जाऊन अडकणा-या गाड्यांमध्ये प्रवास करण्याचा निर्णय घेतला. कांजूर ते कुर्ला या दरम्यान जवळपास २० ते २२ लोकल्स एकामागे एक अशा दोन तास उभ्या होत्या आणि महिला, वृद्ध व्यक्ती आणि शाला कॉलेजातली मुलं अशा हजारो लोकांनी शेवटी कंटाळून ट्रॅकमध्ये उतरून जवळचे स्टेशन पायी जाण्याची निर्णय घेतला.
 
कांजूरमार्ग ते कुर्ला दरम्यान गेल्या दोन तासांपासून अनेक लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. मात्र लोकल ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना याविषयी कोणतीही माहिती दिली गेली नाही. लोकलमध्ये पब्लिक अनाउन्समेंट यंत्रणा बसवल्याचा गाजावाजा करण्यात आला मात्र या यंत्रणेच्या माध्यमातूनही प्रवाशांना कुठलीही माहिती देण्यात आली नाही.
दरम्यान, हार्बर मार्गावरही चेंबूर - टिळकनगरदरम्यानही पाणी तुंबल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. वडाळ्याजवळीही सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचे वृत्त आहे.
 
पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही झाला असून मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. एलबीएस मार्गावर पाणी तुंबल्याने वाहतूक खोळंबली असून, घाटकोपर, सांताक्रूझ येथेही अशीच परिस्थिती असल्याने मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.