शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

भर पावसात रेल्वे विस्कळीत, मुंबईकरांचे हाल

By admin | Updated: July 2, 2014 14:47 IST

भर पावसात कांजूरमार्ग ते कुर्ला स्थानकांदरम्यान गाड्यांची लांबच लांब रांग लागलेली असतानाच रेल्वे अवघ्या २० मिनिटे उशीराने धावत असल्याची चुकीची माहिती रेल्वेतर्फे देण्यात येत आहे.

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २ -  दमदार पावसाची हजेरी त्यात भर म्हणजे कुर्ल्याला सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने हालात पडलेली भर प्रवाशांसाठी डोकुदुखी झालेली असताना मध्य रेल्वेने अत्यंत दिशाभूल करणारी अनाउन्समेंट करत प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप दिला. बुधवारी सकाळी मुंबईसह उपनगरामध्ये पावसानं हजेरी लावली. परंतु सकाळी दहाच्या नंतर कुर्ल्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि पार कांजूरमार्गपर्यंत धीम्या गतीच्या मार्गावर गाड्यांची रांग लागली आणि हजारो प्रवासी भर वाटेत खोळंबले. असे असतानाही रेल्वे मात्र गाड्या १५ ते २० मिनिटे उशीरानं धावत असल्याची धादांत खोटी अनाउन्समेंट करत असल्याचे दिसून आले. परिणामी ठाणे डोंबिवलीतल्या हजारो प्रवाशांनी पुढे जाऊन अडकणा-या गाड्यांमध्ये प्रवास करण्याचा निर्णय घेतला. कांजूर ते कुर्ला या दरम्यान जवळपास २० ते २२ लोकल्स एकामागे एक अशा दोन तास उभ्या होत्या आणि महिला, वृद्ध व्यक्ती आणि शाला कॉलेजातली मुलं अशा हजारो लोकांनी शेवटी कंटाळून ट्रॅकमध्ये उतरून जवळचे स्टेशन पायी जाण्याची निर्णय घेतला.
 
कांजूरमार्ग ते कुर्ला दरम्यान गेल्या दोन तासांपासून अनेक लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. मात्र लोकल ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना याविषयी कोणतीही माहिती दिली गेली नाही. लोकलमध्ये पब्लिक अनाउन्समेंट यंत्रणा बसवल्याचा गाजावाजा करण्यात आला मात्र या यंत्रणेच्या माध्यमातूनही प्रवाशांना कुठलीही माहिती देण्यात आली नाही.
दरम्यान, हार्बर मार्गावरही चेंबूर - टिळकनगरदरम्यानही पाणी तुंबल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. वडाळ्याजवळीही सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचे वृत्त आहे.
 
पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही झाला असून मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. एलबीएस मार्गावर पाणी तुंबल्याने वाहतूक खोळंबली असून, घाटकोपर, सांताक्रूझ येथेही अशीच परिस्थिती असल्याने मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.