शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रेल्वेने ठेवला मृत कामगारांवरच ठपका; समितीचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:58 IST

जालन्याजवळ रुळावर झोपलेल्या १३ जणांचा झाला होता मृत्यू

- शिवराज बिचेवार नांदेड : लॉकडाऊनमुळे कंपनी बंद पडल्याने गावाकडे जात असताना बदनापूरजवळ पहाटे रुळावर झोपलेल्या १३ कामगारांना रेल्वेने चिरडल्याची घटना ८ मे रोजी घडली होती. या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने या अपघाताचा ठपका कामगारांवरच ठेवला आहे. स्वत:च्या मृत्यूस त्यांचाच नष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.जालना येथील दोन कंपन्यांमध्ये परप्रांतीय मजूर होते. या मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कंपनीने केली होती. परंतु त्यानंतरही हे कामगार गावी परतण्याच्या ओढीने ७ मे रोजी पायीच जालना येथून निघाले. रस्त्यातील चेक पोस्ट आणि पोलिसांची नजर चुकविण्यासाठी त्यांनी रेल्वे रुळावरूनच चालण्याचा निर्णय घेतला होता. पायी चालून हे सर्व पहाटे बदनापूरजवळ पोहोचले. थकल्याने त्यांनी रुळावरच पाठ टेकविली.गाढ झोपेमुळे रेल्वेचा आवाज त्यांना ऐकू आला नाही. रेल्वे अंगावरून गेल्याने १३ जणांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे.या समितीचे अध्यक्ष उपविभागीय दंडाधिकारी केशव नेटके होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के. व्ही. खरात आणि सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड हेही समितीत होते.मयत कामगारांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानमयत कामगारांच्या वारसांना शासनाने पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाने मानवीय दृष्टिकोनातून या कामगारांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे ठरविले असल्याचेही त्यात नमूद आहे.समितीने दिलेला अहवालकामगारांची व्यवस्थापनाने जेवणाची, राहण्याची सोय केली होती. तसेच मूळ गावी जाण्यासाठी कामगारांनी बस, रेल्वेची व्यवस्था यासाठी कुठलाही ऑनलाईन परवाना काढला नव्हता. प्रशासनाची परवानगी घेतली नाही, तसेच कंपनी व्यवस्थापन, ठेकेदार यांना कोणतीही माहिती न देता किंबहुना प्रशासनाची नजर चुकवून रुळावरून चालत गेले. रुळावर झोपणे या कृतीस कामगारच जबाबदार आहेत.