शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

रेल्वेने ठेवला मृत कामगारांवरच ठपका; समितीचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:58 IST

जालन्याजवळ रुळावर झोपलेल्या १३ जणांचा झाला होता मृत्यू

- शिवराज बिचेवार नांदेड : लॉकडाऊनमुळे कंपनी बंद पडल्याने गावाकडे जात असताना बदनापूरजवळ पहाटे रुळावर झोपलेल्या १३ कामगारांना रेल्वेने चिरडल्याची घटना ८ मे रोजी घडली होती. या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने या अपघाताचा ठपका कामगारांवरच ठेवला आहे. स्वत:च्या मृत्यूस त्यांचाच नष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.जालना येथील दोन कंपन्यांमध्ये परप्रांतीय मजूर होते. या मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कंपनीने केली होती. परंतु त्यानंतरही हे कामगार गावी परतण्याच्या ओढीने ७ मे रोजी पायीच जालना येथून निघाले. रस्त्यातील चेक पोस्ट आणि पोलिसांची नजर चुकविण्यासाठी त्यांनी रेल्वे रुळावरूनच चालण्याचा निर्णय घेतला होता. पायी चालून हे सर्व पहाटे बदनापूरजवळ पोहोचले. थकल्याने त्यांनी रुळावरच पाठ टेकविली.गाढ झोपेमुळे रेल्वेचा आवाज त्यांना ऐकू आला नाही. रेल्वे अंगावरून गेल्याने १३ जणांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे.या समितीचे अध्यक्ष उपविभागीय दंडाधिकारी केशव नेटके होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के. व्ही. खरात आणि सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड हेही समितीत होते.मयत कामगारांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानमयत कामगारांच्या वारसांना शासनाने पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाने मानवीय दृष्टिकोनातून या कामगारांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे ठरविले असल्याचेही त्यात नमूद आहे.समितीने दिलेला अहवालकामगारांची व्यवस्थापनाने जेवणाची, राहण्याची सोय केली होती. तसेच मूळ गावी जाण्यासाठी कामगारांनी बस, रेल्वेची व्यवस्था यासाठी कुठलाही ऑनलाईन परवाना काढला नव्हता. प्रशासनाची परवानगी घेतली नाही, तसेच कंपनी व्यवस्थापन, ठेकेदार यांना कोणतीही माहिती न देता किंबहुना प्रशासनाची नजर चुकवून रुळावरून चालत गेले. रुळावर झोपणे या कृतीस कामगारच जबाबदार आहेत.