शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

रेल्वेने ठेवला मृत कामगारांवरच ठपका; समितीचा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:58 IST

जालन्याजवळ रुळावर झोपलेल्या १३ जणांचा झाला होता मृत्यू

- शिवराज बिचेवार नांदेड : लॉकडाऊनमुळे कंपनी बंद पडल्याने गावाकडे जात असताना बदनापूरजवळ पहाटे रुळावर झोपलेल्या १३ कामगारांना रेल्वेने चिरडल्याची घटना ८ मे रोजी घडली होती. या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने या अपघाताचा ठपका कामगारांवरच ठेवला आहे. स्वत:च्या मृत्यूस त्यांचाच नष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.जालना येथील दोन कंपन्यांमध्ये परप्रांतीय मजूर होते. या मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कंपनीने केली होती. परंतु त्यानंतरही हे कामगार गावी परतण्याच्या ओढीने ७ मे रोजी पायीच जालना येथून निघाले. रस्त्यातील चेक पोस्ट आणि पोलिसांची नजर चुकविण्यासाठी त्यांनी रेल्वे रुळावरूनच चालण्याचा निर्णय घेतला होता. पायी चालून हे सर्व पहाटे बदनापूरजवळ पोहोचले. थकल्याने त्यांनी रुळावरच पाठ टेकविली.गाढ झोपेमुळे रेल्वेचा आवाज त्यांना ऐकू आला नाही. रेल्वे अंगावरून गेल्याने १३ जणांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे.या समितीचे अध्यक्ष उपविभागीय दंडाधिकारी केशव नेटके होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के. व्ही. खरात आणि सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड हेही समितीत होते.मयत कामगारांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानमयत कामगारांच्या वारसांना शासनाने पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाने मानवीय दृष्टिकोनातून या कामगारांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे ठरविले असल्याचेही त्यात नमूद आहे.समितीने दिलेला अहवालकामगारांची व्यवस्थापनाने जेवणाची, राहण्याची सोय केली होती. तसेच मूळ गावी जाण्यासाठी कामगारांनी बस, रेल्वेची व्यवस्था यासाठी कुठलाही ऑनलाईन परवाना काढला नव्हता. प्रशासनाची परवानगी घेतली नाही, तसेच कंपनी व्यवस्थापन, ठेकेदार यांना कोणतीही माहिती न देता किंबहुना प्रशासनाची नजर चुकवून रुळावरून चालत गेले. रुळावर झोपणे या कृतीस कामगारच जबाबदार आहेत.