शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

भारतात धावणार अतिवेगवान रेल्वे !

By admin | Updated: August 21, 2016 22:51 IST

रेल्वे तासाभरात सहाशे किलोमीटर अंतर पार करू शकेल, असे तंत्रज्ञान विकसित

ऑनलाइन लोकमत

रत्नागिरी, दि. 21- रेल्वे तासाभरात सहाशे किलोमीटर अंतर पार करू शकेल, असे तंत्रज्ञान विकसित केलेल्या मायग्रोव्ह या जगातील सर्वात मोठ्या कंपनीशी केंद्र सरकारची लवकरच नवी दिल्लीत चर्चा होणार आहे. या तंत्राद्वारे भारतीय रेल्वेतही क्रांती घडविता येईल व शेकडो किलोमीटरचे अंतर काही मिनिटात पार करता येईल, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला. रत्नागिरीतील मुंबई विद्यापीठ उपकेंद्रात रविवारी दुपारी १ वाजता रेल्वे संशोधन केंद्राचे मंत्री प्रभू यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, कोकण रेल्वेचे चेअरमन संजय गुप्ता, विद्यापीठाचे रजिस्ट्रार एम.ए.खान, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आमदार उदय सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र तथा बाळ माने, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर आदी उपस्थित होते. प्रभू म्हणाले, दिडशे वर्षापासून रेल्वेसाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान यापुढे कालबाह्य ठरणार आहे. सर्वाधिक वेगवान रेल्वेचा प्रयोग चिनने याआधी केला होता. मात्र आता त्यापेक्षाही वेगवान म्हणजेच ५५० ते ६०० किलोमिटर प्रतितास वेगाने रेल्वे धावू शकेल, असे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. हे तंत्रज्ञान भारतीय रेल्वेतही वापरून वेगाबाबत क्रांती घडवून आणण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठीच संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींना २ सप्टेंबरला दिल्लीत चर्चेसाठी बोलावले आहे. कोकण रेल्वे आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सहयोगातून रेल्वेने सुरू केलेल्या रेल्वे अभियांत्रिकी संशोधन केंद्राचे झालेले उदघाटन हे भारतीय रेल्वेतील एक नवे पर्व आहे. या केंद्रात कोकणातील अनेक युवक, युवतींना रेल्वेशी निगडीत अनेक विषयांवरील संशोधन करण्याचे कोर्स सुरू पूर्ण करता येतील. त्यांच्यासाठी रेल्वेतच नोकरीची संधीही मिळू शकेल. त्याचा फायदा कोकणवासियांनी घ्यावा, असे ते म्हणाले. रेल्वे संशोधन केंद्राच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मनुष्यबळाची निर्मिती करण्याचा मुख्य उद्देश आहे. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय देशमुख म्हणाले की, रेल्वे मंत्रालयाने रेल्वे संशोधन केंद्राची स्थापना करण्यासाठी देशातील ६७९ विद्यापीठांमधून मुंबई विद्यापीठाची केलेली निवड हा एक ऐतिहासिक क्षण आहे. रेल्वे प्राधिकरणाच्या मदतीने रेल्वे संदर्भातील व्यवस्थापन, कुशल मनुष्यबळ अशा सर्व प्रकारच्या गरजांवर आधारीत सर्व प्रकारचे अभ्यासक्रम या संशोधन केंद्रात सुरू करण्यात येतील. या कार्यक्रमापूर्वी मंत्री प्रभू यांच्या हस्ते संशोधन केंद्राच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. रेल्वे-विद्यापीठ समन्वयाचा अभावरेल्वेच्या संशोधन केंद्राच्या कार्यक्रमात कोकण रेल्वे महामंडळाचे चेअरमन संजय गुप्ता हे व्यासपीठासमोरील महत्वाच्या व्यक्तींच्या रांगेत बसले होते. मात्र भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी त्यांना नंतर व्यासपीठावर बोलावले. रेल्वेच्या कार्यक्रमाला कोकण रेल्वेचे चेअरमन व्यासपीठावर नसणे ही अयोग्य बाब होती. त्यामुळे कार्यक्रमाबाबत रेल्वे व विद्यापीठ यांच्यातील समन्वयाचा अभाव दिसून आला. लवकरच रेल्वेचे विद्यापीठदेशात रेल्वेचे स्वत:चे अभियांत्रिकी संशोधन विद्यापीठ हवे, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने प्रथम संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे. विद्यापीठ स्थापनेसाठी आवश्यक ती तयारी रेल्वेकडून केली जात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेचे स्वत:चे विद्यापीठ येत्या काही कालावधीत स्थापन होईल, असे मंत्री प्रभू म्हणाले.