शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
2
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
3
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
4
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
5
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
6
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
7
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
8
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
9
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
10
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
11
बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी
12
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
13
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
14
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
15
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
16
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
17
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
18
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
20
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ

एलफिन्स्टन रेल्वे पुलाच्या बांधकामास तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी दिली होती परवानगी, मात्र टेंडर अडकला लालफितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 22:19 IST

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलाच्या बांधकामास तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परवानगी दिली होती. मात्र त्याचे टेंडर न निघाल्यानं हा पूल लालफितीत अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देएलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलाच्या बांधकामास तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परवानगी दिली होती.टेंडर न निघाल्यानं हा पूल लालफितीत अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरेश प्रभू यांचे स्वीय सहाय्यक हरिश प्रभू यांनी मुंबईतून ही माहिती प्रसिद्धीस दिली आहे.

मुंबई, दि. 29 - एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलाच्या बांधकामास तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परवानगी दिली होती. मात्र त्याचे टेंडर न निघाल्यानं हा पूल लालफितीत अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरेश प्रभू यांचे स्वीय सहाय्यक हरिश प्रभू यांनी मुंबईतून ही माहिती प्रसिद्धीस दिली आहे.तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी याआधीच पुलाच्या बांधकामास परवानगी दिली होती, मात्र रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे त्याचे टेंडर निघू शकले नाही, अशी नवी खळबळजनक माहिती उजेडात आली आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 23 एप्रिल 2015 रोजी एलफिस्टन येथे ‍12 मीटर रुंद आणि 10 मीटर लांब इतक्या आकाराचा पूल बांधण्यास मंजुरी दिली होती. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी या संदर्भातला पत्रव्यवहार तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबत केला होता.एलफिस्टन येथील पादचा-यांच्या समस्या लक्षात घेऊन हा रेल्वे ब्रिज वाढवण्याची आवश्यकता आहे, याकडे लक्ष्य वेधले असता त्यावेळी सुरेश प्रभूंनी बांधकामासाठी मंजुरी दिली होती. या पुलाच्या बांधकामासाठी 11.86 कोटी रुपये मंजूरही करण्यात आले. मात्र त्यानंतर ही मंजुरी सरकारी लालफितीत अडकली. रेल्वे प्रशासनाने या फाईलकडे वा रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या मंजुरीकडे कानाडोळा केल्यानं या पुलाचे टेंडर निघाले नाही. रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा यास जबाबदार असल्याचीच माहिती सुरेश प्रभू यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जर तेव्हाच या मंजूर फाईलवर त्वरित कारवाई करण्यात आली असती आणि या पुलाचे कंत्राट काढण्यात आलं असत तर आज मुंबईमध्ये ही परिस्थिती उद्भवली नसती आणि विनाकारण 22 माणसांचा मृत्यू झाला नसता. रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराबाबत तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.

रेल्वेच्या अनागोंदी कारभारामुळे या दुर्घटनेत 22 जणांना हकनाक जीव गमवावा लागला आहे. तर 39 जण जखमी झालेत. जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये 13 पुरुष, 8 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज शुक्रवारी (29 सप्टेंबर) सकाळी 10.45  वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.  पूल पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवेमुळे लोकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. यावेळी पुलावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी झाली. तर एका व्यक्तिच्या सांगण्यानुसार प्रचंड गर्दीच्यावेळी एक माणूस काहीतरी उचलण्यासाठी खाली वाकला असता, मागच्या लोंढ्यामुळे तो ढकलला गेला व पडला. यानंतर त्याठिकाणी मागच्या लोंढ्यांमुळे चेंगराचेंगरी झाली आणि परिस्थिती खूपच बिकट झाली होती.