शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

एलफिन्स्टन रेल्वे पुलाच्या बांधकामास तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी दिली होती परवानगी, मात्र टेंडर अडकला लालफितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 22:19 IST

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलाच्या बांधकामास तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परवानगी दिली होती. मात्र त्याचे टेंडर न निघाल्यानं हा पूल लालफितीत अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देएलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलाच्या बांधकामास तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परवानगी दिली होती.टेंडर न निघाल्यानं हा पूल लालफितीत अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरेश प्रभू यांचे स्वीय सहाय्यक हरिश प्रभू यांनी मुंबईतून ही माहिती प्रसिद्धीस दिली आहे.

मुंबई, दि. 29 - एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलाच्या बांधकामास तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परवानगी दिली होती. मात्र त्याचे टेंडर न निघाल्यानं हा पूल लालफितीत अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरेश प्रभू यांचे स्वीय सहाय्यक हरिश प्रभू यांनी मुंबईतून ही माहिती प्रसिद्धीस दिली आहे.तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी याआधीच पुलाच्या बांधकामास परवानगी दिली होती, मात्र रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे त्याचे टेंडर निघू शकले नाही, अशी नवी खळबळजनक माहिती उजेडात आली आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 23 एप्रिल 2015 रोजी एलफिस्टन येथे ‍12 मीटर रुंद आणि 10 मीटर लांब इतक्या आकाराचा पूल बांधण्यास मंजुरी दिली होती. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी या संदर्भातला पत्रव्यवहार तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबत केला होता.एलफिस्टन येथील पादचा-यांच्या समस्या लक्षात घेऊन हा रेल्वे ब्रिज वाढवण्याची आवश्यकता आहे, याकडे लक्ष्य वेधले असता त्यावेळी सुरेश प्रभूंनी बांधकामासाठी मंजुरी दिली होती. या पुलाच्या बांधकामासाठी 11.86 कोटी रुपये मंजूरही करण्यात आले. मात्र त्यानंतर ही मंजुरी सरकारी लालफितीत अडकली. रेल्वे प्रशासनाने या फाईलकडे वा रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या मंजुरीकडे कानाडोळा केल्यानं या पुलाचे टेंडर निघाले नाही. रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा यास जबाबदार असल्याचीच माहिती सुरेश प्रभू यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जर तेव्हाच या मंजूर फाईलवर त्वरित कारवाई करण्यात आली असती आणि या पुलाचे कंत्राट काढण्यात आलं असत तर आज मुंबईमध्ये ही परिस्थिती उद्भवली नसती आणि विनाकारण 22 माणसांचा मृत्यू झाला नसता. रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराबाबत तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.

रेल्वेच्या अनागोंदी कारभारामुळे या दुर्घटनेत 22 जणांना हकनाक जीव गमवावा लागला आहे. तर 39 जण जखमी झालेत. जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये 13 पुरुष, 8 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज शुक्रवारी (29 सप्टेंबर) सकाळी 10.45  वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.  पूल पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवेमुळे लोकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. यावेळी पुलावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी झाली. तर एका व्यक्तिच्या सांगण्यानुसार प्रचंड गर्दीच्यावेळी एक माणूस काहीतरी उचलण्यासाठी खाली वाकला असता, मागच्या लोंढ्यामुळे तो ढकलला गेला व पडला. यानंतर त्याठिकाणी मागच्या लोंढ्यांमुळे चेंगराचेंगरी झाली आणि परिस्थिती खूपच बिकट झाली होती.