शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
2
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
3
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
4
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
5
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
6
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
7
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
8
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
9
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
10
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
11
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
12
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
13
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
14
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
15
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
16
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
17
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
18
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
19
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
20
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन

रेल्वे मेडिकल कॉलेजला ब्रेक!

By admin | Updated: December 5, 2014 00:39 IST

ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी २००९-१० च्या अर्थसंकल्पात नागपुरात रेल्वेचे मेडिकल कॉलेज सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेला आज पाच वर्षे पूर्ण झाली. दरम्यान ७ रेल्वेमंत्री

केंद्र शासनाचे सूतोवाच : एकाही खासदाराने केला नाही पाठपुरावानागपूर : ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी २००९-१० च्या अर्थसंकल्पात नागपुरात रेल्वेचे मेडिकल कॉलेज सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेला आज पाच वर्षे पूर्ण झाली. दरम्यान ७ रेल्वेमंत्री बदलले परंतु त्यांच्या घोषणेचे काहीच होऊ शकले नाही. दरम्यान चार-पाच दिवसांपूर्वी केंद्र शासनाने तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या घोषणा रद्द करण्यात आल्याचे सूतोवाच केल्यामुळे रेल्वेच्या मेडिकल कॉलेजचा प्रस्तावच बारगळला आहे. विदर्भातील एकाही खासदाराने याबाबत पाठपुरावा न केल्यामुळे नागपुरातील रेल्वेचे मेडिकल कॉलेज उभे होऊ शकले नाही, हे विशेष.तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वेच्या अर्थसंकल्पात नागपुरात रेल्वेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. घोषणा झाल्यानंतर वर्षभराच्या कालावधीनंतर रेल्वे हेल्थ सर्व्हिसेसचे महासंचालक रामटेके आणि त्यांची चमू नागपुरात दाखल झाली होती. त्यांनी गोधनी आणि खापरी येथील दोन जागांची पाहणीसुद्धा केली होती. या दोन जागांपैकी एका जागेची निवड रेल्वे मेडिकल कॉलेजसाठी करावयाची होती. पाहणी केल्यानंतर चमू रेल्वे बोर्डात परतली. त्यांनी जागेचा अहवालही सादर केला. परंतु त्यानंतर त्यांचा अहवाल रेल्वे मंत्रालयात तसाच धूळखात पडून होता. रेल्वेचे मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी रेल्वेकडे २५ एकर जागा, ५०० खाटांचे रुग्णालय असले तरच मेडिकल कॉलेजच्या प्रस्तावाला मान्यता मिळते. दोन्ही बाबी नागपुरात शक्य असताना केवळ राजकीय उदासीनतेपोटी नागपूरच्या मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही. सध्या हा प्रस्ताव केंद्र शासनाने रद्द झाल्याची घोषणा केली आहे. रेल्वेचे नागपुरात मेडिकल कॉलेज झाले असते तर विदर्भातील रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना या मेडिकल कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळू शकला असता. याशिवाय मेडिकल कॉलेजमध्ये लागणाऱ्या जागांसाठी अनेक उमेदवारांना संधी मिळाली असती. रेल्वेचे देशभरात १३ लाख कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मुलांना मेडिकलला प्रवेशाचा मार्ग खुला झाला असता. परंतु आता ही घोषणाच केंद्र शासनाने रद्दबातल ठरविल्यामुळे उरलीसुरली आशाही मावळली आहे. (प्रतिनिधी)रेल्वे रुग्णालयाचा ताण झाला असता कमीनागपुरात रेल्वेचे मेडिकल कॉलेज सुरू झाले असते तर ‘डीआरएम’ कार्यालयाच्या शेजारील रुग्णालयाचा ताण कमी झाला असता. या रुग्णालयात नेहमीच रुग्णांची गर्दी असते. येथे डॉक्टर, कर्मचाऱ्यांची संख्याही कमी असल्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. मेडिकल कॉलेज सुरू झाले असते तर या रुग्णालयावरील ताण कमी झाला असता.सात रेल्वेमंत्री बदललेममता बॅनर्जी यांनी अर्थसंकल्पात रेल्वेच्या मेडिकल कॉलेजची घोषणा केल्यानंतर सात रेल्वेमंत्री बदलले. यात दिनेश त्रिवेदी, मुकुल रॉय, सी.पी. जोशी, पवनकुमार बंसल, मल्लिकार्जुन खरगे, सदानंद गौडा, सुरेश प्रभु यांचा समावेश आहे. परंतु या रेल्वेमंत्र्यांपैकी एकालाही विदर्भातील मेडिकल कॉलेजच्या प्रस्तावावर विचार करण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे राजकीय इच्छाशक्तीअभावी नागपुरातील रेल्वेचे मेडिकल कॉलेज पूर्ण होऊ शकले नसल्याचे बोलले जात आहे.