शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

रेल्वे मेडिकल कॉलेजला ब्रेक!

By admin | Updated: December 5, 2014 00:39 IST

ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी २००९-१० च्या अर्थसंकल्पात नागपुरात रेल्वेचे मेडिकल कॉलेज सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेला आज पाच वर्षे पूर्ण झाली. दरम्यान ७ रेल्वेमंत्री

केंद्र शासनाचे सूतोवाच : एकाही खासदाराने केला नाही पाठपुरावानागपूर : ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी २००९-१० च्या अर्थसंकल्पात नागपुरात रेल्वेचे मेडिकल कॉलेज सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेला आज पाच वर्षे पूर्ण झाली. दरम्यान ७ रेल्वेमंत्री बदलले परंतु त्यांच्या घोषणेचे काहीच होऊ शकले नाही. दरम्यान चार-पाच दिवसांपूर्वी केंद्र शासनाने तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या घोषणा रद्द करण्यात आल्याचे सूतोवाच केल्यामुळे रेल्वेच्या मेडिकल कॉलेजचा प्रस्तावच बारगळला आहे. विदर्भातील एकाही खासदाराने याबाबत पाठपुरावा न केल्यामुळे नागपुरातील रेल्वेचे मेडिकल कॉलेज उभे होऊ शकले नाही, हे विशेष.तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वेच्या अर्थसंकल्पात नागपुरात रेल्वेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. घोषणा झाल्यानंतर वर्षभराच्या कालावधीनंतर रेल्वे हेल्थ सर्व्हिसेसचे महासंचालक रामटेके आणि त्यांची चमू नागपुरात दाखल झाली होती. त्यांनी गोधनी आणि खापरी येथील दोन जागांची पाहणीसुद्धा केली होती. या दोन जागांपैकी एका जागेची निवड रेल्वे मेडिकल कॉलेजसाठी करावयाची होती. पाहणी केल्यानंतर चमू रेल्वे बोर्डात परतली. त्यांनी जागेचा अहवालही सादर केला. परंतु त्यानंतर त्यांचा अहवाल रेल्वे मंत्रालयात तसाच धूळखात पडून होता. रेल्वेचे मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी रेल्वेकडे २५ एकर जागा, ५०० खाटांचे रुग्णालय असले तरच मेडिकल कॉलेजच्या प्रस्तावाला मान्यता मिळते. दोन्ही बाबी नागपुरात शक्य असताना केवळ राजकीय उदासीनतेपोटी नागपूरच्या मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही. सध्या हा प्रस्ताव केंद्र शासनाने रद्द झाल्याची घोषणा केली आहे. रेल्वेचे नागपुरात मेडिकल कॉलेज झाले असते तर विदर्भातील रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना या मेडिकल कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळू शकला असता. याशिवाय मेडिकल कॉलेजमध्ये लागणाऱ्या जागांसाठी अनेक उमेदवारांना संधी मिळाली असती. रेल्वेचे देशभरात १३ लाख कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मुलांना मेडिकलला प्रवेशाचा मार्ग खुला झाला असता. परंतु आता ही घोषणाच केंद्र शासनाने रद्दबातल ठरविल्यामुळे उरलीसुरली आशाही मावळली आहे. (प्रतिनिधी)रेल्वे रुग्णालयाचा ताण झाला असता कमीनागपुरात रेल्वेचे मेडिकल कॉलेज सुरू झाले असते तर ‘डीआरएम’ कार्यालयाच्या शेजारील रुग्णालयाचा ताण कमी झाला असता. या रुग्णालयात नेहमीच रुग्णांची गर्दी असते. येथे डॉक्टर, कर्मचाऱ्यांची संख्याही कमी असल्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. मेडिकल कॉलेज सुरू झाले असते तर या रुग्णालयावरील ताण कमी झाला असता.सात रेल्वेमंत्री बदललेममता बॅनर्जी यांनी अर्थसंकल्पात रेल्वेच्या मेडिकल कॉलेजची घोषणा केल्यानंतर सात रेल्वेमंत्री बदलले. यात दिनेश त्रिवेदी, मुकुल रॉय, सी.पी. जोशी, पवनकुमार बंसल, मल्लिकार्जुन खरगे, सदानंद गौडा, सुरेश प्रभु यांचा समावेश आहे. परंतु या रेल्वेमंत्र्यांपैकी एकालाही विदर्भातील मेडिकल कॉलेजच्या प्रस्तावावर विचार करण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे राजकीय इच्छाशक्तीअभावी नागपुरातील रेल्वेचे मेडिकल कॉलेज पूर्ण होऊ शकले नसल्याचे बोलले जात आहे.