शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

रेल्वे मेडिकल कॉलेजला ब्रेक!

By admin | Updated: December 5, 2014 00:39 IST

ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी २००९-१० च्या अर्थसंकल्पात नागपुरात रेल्वेचे मेडिकल कॉलेज सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेला आज पाच वर्षे पूर्ण झाली. दरम्यान ७ रेल्वेमंत्री

केंद्र शासनाचे सूतोवाच : एकाही खासदाराने केला नाही पाठपुरावानागपूर : ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी २००९-१० च्या अर्थसंकल्पात नागपुरात रेल्वेचे मेडिकल कॉलेज सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेला आज पाच वर्षे पूर्ण झाली. दरम्यान ७ रेल्वेमंत्री बदलले परंतु त्यांच्या घोषणेचे काहीच होऊ शकले नाही. दरम्यान चार-पाच दिवसांपूर्वी केंद्र शासनाने तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या घोषणा रद्द करण्यात आल्याचे सूतोवाच केल्यामुळे रेल्वेच्या मेडिकल कॉलेजचा प्रस्तावच बारगळला आहे. विदर्भातील एकाही खासदाराने याबाबत पाठपुरावा न केल्यामुळे नागपुरातील रेल्वेचे मेडिकल कॉलेज उभे होऊ शकले नाही, हे विशेष.तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वेच्या अर्थसंकल्पात नागपुरात रेल्वेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. घोषणा झाल्यानंतर वर्षभराच्या कालावधीनंतर रेल्वे हेल्थ सर्व्हिसेसचे महासंचालक रामटेके आणि त्यांची चमू नागपुरात दाखल झाली होती. त्यांनी गोधनी आणि खापरी येथील दोन जागांची पाहणीसुद्धा केली होती. या दोन जागांपैकी एका जागेची निवड रेल्वे मेडिकल कॉलेजसाठी करावयाची होती. पाहणी केल्यानंतर चमू रेल्वे बोर्डात परतली. त्यांनी जागेचा अहवालही सादर केला. परंतु त्यानंतर त्यांचा अहवाल रेल्वे मंत्रालयात तसाच धूळखात पडून होता. रेल्वेचे मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी रेल्वेकडे २५ एकर जागा, ५०० खाटांचे रुग्णालय असले तरच मेडिकल कॉलेजच्या प्रस्तावाला मान्यता मिळते. दोन्ही बाबी नागपुरात शक्य असताना केवळ राजकीय उदासीनतेपोटी नागपूरच्या मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही. सध्या हा प्रस्ताव केंद्र शासनाने रद्द झाल्याची घोषणा केली आहे. रेल्वेचे नागपुरात मेडिकल कॉलेज झाले असते तर विदर्भातील रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना या मेडिकल कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळू शकला असता. याशिवाय मेडिकल कॉलेजमध्ये लागणाऱ्या जागांसाठी अनेक उमेदवारांना संधी मिळाली असती. रेल्वेचे देशभरात १३ लाख कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मुलांना मेडिकलला प्रवेशाचा मार्ग खुला झाला असता. परंतु आता ही घोषणाच केंद्र शासनाने रद्दबातल ठरविल्यामुळे उरलीसुरली आशाही मावळली आहे. (प्रतिनिधी)रेल्वे रुग्णालयाचा ताण झाला असता कमीनागपुरात रेल्वेचे मेडिकल कॉलेज सुरू झाले असते तर ‘डीआरएम’ कार्यालयाच्या शेजारील रुग्णालयाचा ताण कमी झाला असता. या रुग्णालयात नेहमीच रुग्णांची गर्दी असते. येथे डॉक्टर, कर्मचाऱ्यांची संख्याही कमी असल्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. मेडिकल कॉलेज सुरू झाले असते तर या रुग्णालयावरील ताण कमी झाला असता.सात रेल्वेमंत्री बदललेममता बॅनर्जी यांनी अर्थसंकल्पात रेल्वेच्या मेडिकल कॉलेजची घोषणा केल्यानंतर सात रेल्वेमंत्री बदलले. यात दिनेश त्रिवेदी, मुकुल रॉय, सी.पी. जोशी, पवनकुमार बंसल, मल्लिकार्जुन खरगे, सदानंद गौडा, सुरेश प्रभु यांचा समावेश आहे. परंतु या रेल्वेमंत्र्यांपैकी एकालाही विदर्भातील मेडिकल कॉलेजच्या प्रस्तावावर विचार करण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे राजकीय इच्छाशक्तीअभावी नागपुरातील रेल्वेचे मेडिकल कॉलेज पूर्ण होऊ शकले नसल्याचे बोलले जात आहे.