शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे मेडिकल कॉलेजला ब्रेक!

By admin | Updated: December 5, 2014 00:39 IST

ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी २००९-१० च्या अर्थसंकल्पात नागपुरात रेल्वेचे मेडिकल कॉलेज सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेला आज पाच वर्षे पूर्ण झाली. दरम्यान ७ रेल्वेमंत्री

केंद्र शासनाचे सूतोवाच : एकाही खासदाराने केला नाही पाठपुरावानागपूर : ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी २००९-१० च्या अर्थसंकल्पात नागपुरात रेल्वेचे मेडिकल कॉलेज सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या घोषणेला आज पाच वर्षे पूर्ण झाली. दरम्यान ७ रेल्वेमंत्री बदलले परंतु त्यांच्या घोषणेचे काहीच होऊ शकले नाही. दरम्यान चार-पाच दिवसांपूर्वी केंद्र शासनाने तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या घोषणा रद्द करण्यात आल्याचे सूतोवाच केल्यामुळे रेल्वेच्या मेडिकल कॉलेजचा प्रस्तावच बारगळला आहे. विदर्भातील एकाही खासदाराने याबाबत पाठपुरावा न केल्यामुळे नागपुरातील रेल्वेचे मेडिकल कॉलेज उभे होऊ शकले नाही, हे विशेष.तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी रेल्वेच्या अर्थसंकल्पात नागपुरात रेल्वेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. घोषणा झाल्यानंतर वर्षभराच्या कालावधीनंतर रेल्वे हेल्थ सर्व्हिसेसचे महासंचालक रामटेके आणि त्यांची चमू नागपुरात दाखल झाली होती. त्यांनी गोधनी आणि खापरी येथील दोन जागांची पाहणीसुद्धा केली होती. या दोन जागांपैकी एका जागेची निवड रेल्वे मेडिकल कॉलेजसाठी करावयाची होती. पाहणी केल्यानंतर चमू रेल्वे बोर्डात परतली. त्यांनी जागेचा अहवालही सादर केला. परंतु त्यानंतर त्यांचा अहवाल रेल्वे मंत्रालयात तसाच धूळखात पडून होता. रेल्वेचे मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी रेल्वेकडे २५ एकर जागा, ५०० खाटांचे रुग्णालय असले तरच मेडिकल कॉलेजच्या प्रस्तावाला मान्यता मिळते. दोन्ही बाबी नागपुरात शक्य असताना केवळ राजकीय उदासीनतेपोटी नागपूरच्या मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही. सध्या हा प्रस्ताव केंद्र शासनाने रद्द झाल्याची घोषणा केली आहे. रेल्वेचे नागपुरात मेडिकल कॉलेज झाले असते तर विदर्भातील रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना या मेडिकल कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळू शकला असता. याशिवाय मेडिकल कॉलेजमध्ये लागणाऱ्या जागांसाठी अनेक उमेदवारांना संधी मिळाली असती. रेल्वेचे देशभरात १३ लाख कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मुलांना मेडिकलला प्रवेशाचा मार्ग खुला झाला असता. परंतु आता ही घोषणाच केंद्र शासनाने रद्दबातल ठरविल्यामुळे उरलीसुरली आशाही मावळली आहे. (प्रतिनिधी)रेल्वे रुग्णालयाचा ताण झाला असता कमीनागपुरात रेल्वेचे मेडिकल कॉलेज सुरू झाले असते तर ‘डीआरएम’ कार्यालयाच्या शेजारील रुग्णालयाचा ताण कमी झाला असता. या रुग्णालयात नेहमीच रुग्णांची गर्दी असते. येथे डॉक्टर, कर्मचाऱ्यांची संख्याही कमी असल्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. मेडिकल कॉलेज सुरू झाले असते तर या रुग्णालयावरील ताण कमी झाला असता.सात रेल्वेमंत्री बदललेममता बॅनर्जी यांनी अर्थसंकल्पात रेल्वेच्या मेडिकल कॉलेजची घोषणा केल्यानंतर सात रेल्वेमंत्री बदलले. यात दिनेश त्रिवेदी, मुकुल रॉय, सी.पी. जोशी, पवनकुमार बंसल, मल्लिकार्जुन खरगे, सदानंद गौडा, सुरेश प्रभु यांचा समावेश आहे. परंतु या रेल्वेमंत्र्यांपैकी एकालाही विदर्भातील मेडिकल कॉलेजच्या प्रस्तावावर विचार करण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे राजकीय इच्छाशक्तीअभावी नागपुरातील रेल्वेचे मेडिकल कॉलेज पूर्ण होऊ शकले नसल्याचे बोलले जात आहे.