शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे दप्तरी मराठवाडा अजूनही महाराष्ट्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2017 20:49 IST

रेल्वेचा नांदेड विभाग मुंबईस्थित मध्य रेल्वेला जोडण्याच्या मागणीला कायम बगल दिल्याने रेल्वे मंत्रालयाच्या दप्तरी मराठवाडा अजूनही महाराष्ट्राबाहेर सिकंदराबादशी जोडल्याची खंत

ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 11 : रेल्वेचा नांदेड विभाग मुंबईस्थित मध्य रेल्वेला जोडण्याच्या मागणीला कायम बगल दिल्याने रेल्वे मंत्रालयाच्या दप्तरी मराठवाडा अजूनही महाराष्ट्राबाहेर सिकंदराबादशी जोडल्याची खंत व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी नागपूर व पुणे रेल्वेच्या वेळापत्रकातील गडबडीचाही मुद्दा मांडला. दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांच्या उपस्थितीत शुक्रवारी नांदेड येथे मराठवाड्यातील खासदारांची बैठक होत आहे. या संदर्भाने माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, नांदेड रेल्वे विभाग भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक व भावनिकदृष्ट्या मुंबईस्थित मध्य विभागाशी जोडलेला आहे. त्यामुळे दक्षिण-मध्य मधील नांदेड विभागाला मध्य विभागाशी जोडावे, ही मागणी अनेक वर्षांपासून आहे. त्याकडे दूर्लक्ष होत आहे. तसेच पुणे व नागपूरला जाणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक खाजगी ट्रॅव्हल्स चालकांच्या सोयीचे आहे. एकीकडे प्रवाशांच्या गैरसोयीचे वेळापत्रक बनवायचे. दुसरीकडे प्रवासी नाहीत म्हणून रेल्वे बंद करायची, असा अर्थपूर्ण डाव खेळला जातो. यामध्ये रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी व खाजगी ट्रॅव्हल्स चालकांचे हितसंबंध गुंतले असून याची सीबीआय चौकशी करावी, अशी आपली मागणी आहे. दरम्यान, खासदारांच्या बैठकीत कोणत्या मागण्या महत्वाच्या राहतील, असे विचारले असता ते म्हणाले, मराठवाड्यातील रेल्वे विस्तार व विकास मंदगतीने सुरू आहे. परभणी-मनमाड, मुदखेड-बोलाराम, मुदखेड-अदिलाबाद, पूर्णा-खांडवा रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करणे आवश्यक आहे. अकोला-खांडवा रेल्वे मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी आहे. पूर्णा येथे डिझेल लोकोशेडची निर्मिती केली पाहिजे. तसेच बोधन-बिलोली-मुखेड-लातूर व नांदेड-लोहा-अहमदपूर-लातूर या दोन नव्या रेल्वे मार्गाची निर्मिती करण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत. मराठवाड्यातील प्रवाशांच्या सुलभ प्रवासासाठी कोणते बदल अपेक्षित आहेत यावर खा. चव्हाण म्हणाले, मुंबई व नागपूरसाठी रात्रीच्या वेळी सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करावी. नांदेड-पुणे व नांदेड-पनवेल या दोन्ही रेल्वे लातूरमार्गे धावतात. त्यांना पुण्याला पोहचण्यासाठी १३ तास लागतात. याच रेल्वे मनमाडमार्गे धावल्या तर १२ तासात पुण्याला पोहचता येईल. सोबतच नांदेड-परभणी-जालना-औरंगाबाद- मनमाड जाणे सोयीचे होईल. नांदेड येथून नागपूरला जाणारी नंदीग्राम एक्स्प्रेस आदिलाबादमार्गे जाते. ही गाडी १२ तास वेळ घेते. त्याऐवजी पूर्णा-अकोला मार्गे सोडावी. विशेष म्हणजे नंदीग्राम एक्स्प्रेस आदिलाबाद ते वरोरा या ११० कि.मी. अंतरासाठी पाच तास वेळ घेते. ही गती वाढवली तर नागपूरला नंदीग्राम वेळेवर पोहचेल. नांदेड-पुणे रेल्वेला दहा डब्बे आहेत. ती संख्या वाढवली पाहिजे. उन्हाळी सुट्यांमध्ये विशेष गाड्या सुरू कराव्यात. उमरी-धर्माबाद येथे लांबपल्ल्याच्या धावणाऱ्या औरंगाबाद- तिरुपती, अमरावती-तिरुपती, अकोला-तिरुपती, संबलपूर एक्स्प्रेस, नगरसोल एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा देण्यात यावा अशीही आपली मागणी आहे.रेल्वे विकास व विस्तारीकरणाबद्दल खा. चव्हाण म्हणाले, नांदेड-वर्धा-यवतमाळ हा रेल्वे मार्ग मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा जवळचा मार्ग आहे. या नवीन मार्गास २००८-०९ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. परंतु निधीअभावी हा प्रकल्प रेंगाळलेला असून त्यासाठी अधिकचा निधी द्यावा, अशी मागणी आहे. मराठवाड्यातील धर्माबाद, उमरी, किनवट, ब्राह्मणवाडा, भेंडेगाव, पाथरड येथे रेल्वे उड्डाणपुलाची निर्मिती तात्काळ करावी. नांदेड स्थानकावरील फ्लाट क्रमांक ४ ची लांबी वाढवावी, दोन नवीन लिफ्ट व दोन सरकते जिने बसवावेत, अशीही आपली मागणी असल्याचे खा. चव्हाण म्हणाले.