शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

रेल्वे दप्तरी मराठवाडा अजूनही महाराष्ट्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2017 20:49 IST

रेल्वेचा नांदेड विभाग मुंबईस्थित मध्य रेल्वेला जोडण्याच्या मागणीला कायम बगल दिल्याने रेल्वे मंत्रालयाच्या दप्तरी मराठवाडा अजूनही महाराष्ट्राबाहेर सिकंदराबादशी जोडल्याची खंत

ऑनलाइन लोकमतनांदेड, दि. 11 : रेल्वेचा नांदेड विभाग मुंबईस्थित मध्य रेल्वेला जोडण्याच्या मागणीला कायम बगल दिल्याने रेल्वे मंत्रालयाच्या दप्तरी मराठवाडा अजूनही महाराष्ट्राबाहेर सिकंदराबादशी जोडल्याची खंत व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी नागपूर व पुणे रेल्वेच्या वेळापत्रकातील गडबडीचाही मुद्दा मांडला. दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांच्या उपस्थितीत शुक्रवारी नांदेड येथे मराठवाड्यातील खासदारांची बैठक होत आहे. या संदर्भाने माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, नांदेड रेल्वे विभाग भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक व भावनिकदृष्ट्या मुंबईस्थित मध्य विभागाशी जोडलेला आहे. त्यामुळे दक्षिण-मध्य मधील नांदेड विभागाला मध्य विभागाशी जोडावे, ही मागणी अनेक वर्षांपासून आहे. त्याकडे दूर्लक्ष होत आहे. तसेच पुणे व नागपूरला जाणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक खाजगी ट्रॅव्हल्स चालकांच्या सोयीचे आहे. एकीकडे प्रवाशांच्या गैरसोयीचे वेळापत्रक बनवायचे. दुसरीकडे प्रवासी नाहीत म्हणून रेल्वे बंद करायची, असा अर्थपूर्ण डाव खेळला जातो. यामध्ये रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी व खाजगी ट्रॅव्हल्स चालकांचे हितसंबंध गुंतले असून याची सीबीआय चौकशी करावी, अशी आपली मागणी आहे. दरम्यान, खासदारांच्या बैठकीत कोणत्या मागण्या महत्वाच्या राहतील, असे विचारले असता ते म्हणाले, मराठवाड्यातील रेल्वे विस्तार व विकास मंदगतीने सुरू आहे. परभणी-मनमाड, मुदखेड-बोलाराम, मुदखेड-अदिलाबाद, पूर्णा-खांडवा रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करणे आवश्यक आहे. अकोला-खांडवा रेल्वे मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी आहे. पूर्णा येथे डिझेल लोकोशेडची निर्मिती केली पाहिजे. तसेच बोधन-बिलोली-मुखेड-लातूर व नांदेड-लोहा-अहमदपूर-लातूर या दोन नव्या रेल्वे मार्गाची निर्मिती करण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत. मराठवाड्यातील प्रवाशांच्या सुलभ प्रवासासाठी कोणते बदल अपेक्षित आहेत यावर खा. चव्हाण म्हणाले, मुंबई व नागपूरसाठी रात्रीच्या वेळी सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करावी. नांदेड-पुणे व नांदेड-पनवेल या दोन्ही रेल्वे लातूरमार्गे धावतात. त्यांना पुण्याला पोहचण्यासाठी १३ तास लागतात. याच रेल्वे मनमाडमार्गे धावल्या तर १२ तासात पुण्याला पोहचता येईल. सोबतच नांदेड-परभणी-जालना-औरंगाबाद- मनमाड जाणे सोयीचे होईल. नांदेड येथून नागपूरला जाणारी नंदीग्राम एक्स्प्रेस आदिलाबादमार्गे जाते. ही गाडी १२ तास वेळ घेते. त्याऐवजी पूर्णा-अकोला मार्गे सोडावी. विशेष म्हणजे नंदीग्राम एक्स्प्रेस आदिलाबाद ते वरोरा या ११० कि.मी. अंतरासाठी पाच तास वेळ घेते. ही गती वाढवली तर नागपूरला नंदीग्राम वेळेवर पोहचेल. नांदेड-पुणे रेल्वेला दहा डब्बे आहेत. ती संख्या वाढवली पाहिजे. उन्हाळी सुट्यांमध्ये विशेष गाड्या सुरू कराव्यात. उमरी-धर्माबाद येथे लांबपल्ल्याच्या धावणाऱ्या औरंगाबाद- तिरुपती, अमरावती-तिरुपती, अकोला-तिरुपती, संबलपूर एक्स्प्रेस, नगरसोल एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा देण्यात यावा अशीही आपली मागणी आहे.रेल्वे विकास व विस्तारीकरणाबद्दल खा. चव्हाण म्हणाले, नांदेड-वर्धा-यवतमाळ हा रेल्वे मार्ग मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा जवळचा मार्ग आहे. या नवीन मार्गास २००८-०९ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. परंतु निधीअभावी हा प्रकल्प रेंगाळलेला असून त्यासाठी अधिकचा निधी द्यावा, अशी मागणी आहे. मराठवाड्यातील धर्माबाद, उमरी, किनवट, ब्राह्मणवाडा, भेंडेगाव, पाथरड येथे रेल्वे उड्डाणपुलाची निर्मिती तात्काळ करावी. नांदेड स्थानकावरील फ्लाट क्रमांक ४ ची लांबी वाढवावी, दोन नवीन लिफ्ट व दोन सरकते जिने बसवावेत, अशीही आपली मागणी असल्याचे खा. चव्हाण म्हणाले.