शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

रेल्वे अर्थसंकल्प अतिशय फसवा, अन्यायकारक

By admin | Updated: February 27, 2015 23:21 IST

नारायण राणे यांची टीका : प्रभू जनतेला देणारे नाहीत, तर स्वत:ला मिळवून घेणारे

कणकवली : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेला रेल्वे अर्थसंकल्प अतिशय फसवा आणि अन्यायकारक आहे. प्रवाशांना भाडेवाढीचा भुर्दंड नसला तरी रेल्वेने मालवाहतुकीच्या रूपाने जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढविल्याने महागाई वाढणारच आहे. हे प्रभू जनतेला देणारे नाहीत तर स्वत:ला मिळवून घेणारे आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी येथे केली.येथील ओम गणेश निवासस्थानी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते. नारायण राणे पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी शासनाचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प सुरेश प्रभू यांनी सादर केला. हा अर्थसंकल्प जनतेची दिशाभूल करणारा आहे. सुरेश प्रभू यापूर्वीही मंत्री असताना त्यांनी सिंधुदुर्गचे सुपुत्र असूनही या भागाला झुकते माप दिलेले नाही. रेल्वे अर्थसंकल्पात प्रवाशांना पायाभूत सुविधा देणार, रेल्वेत स्वच्छता वाढविणार अशा घोषणा केल्या आहेत. मात्र, या गोष्टी कराव्याच लागतात. नागरी सुविधा देणे हे शासनाचे कर्तव्यच आहे. त्यात नवीन असे काहीच नाही. कोकणाला एकही जादा गाडी अर्थसंकल्पात देण्यात आलेली नाही. निदान आपल्या गावात जाण्यासाठी तरी प्रभूंनी नवीन गाडी देणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. मुंबई व महाराष्ट्राकडून रेल्वेला जेवढे पैसे मिळतात, त्या प्रमाणात त्यांना सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही प्रभूकृपा कशी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.राणे म्हणाले, चिपळूण-कऱ्हाड रेल्वे मार्गाचा सर्व्हे मी उद्योगमंत्री असताना करायला लावला आहे. त्याचे श्रेय इतर कोणालाही घेता येणार नाही. तत्कालीन रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करून हे काम केले आहे. अप्रत्यक्षरीत्या महागाई वाढविणारा हा अर्थसंकल्प आहे. प्रभूंनी रेल्वेमंत्री होण्यासाठी जेवढी मेहनत घेतली तेवढाच वेळ आपल्या खात्याला दिला असता, तर जनतेला काहीतरी मिळाले असते. पूर्वी मंत्री असताना सुरेश प्रभूंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेले एकतरी विकासकाम दाखवावे. त्यामुळेच पुन्हा मंत्री झाल्यानंतर देशाला, तसेच कोकणालाही ते काही देऊ शकणार नाहीत, असे वक्तव्य यापूर्वी मी केले होते, असेही राणे म्हणाले. (वार्ताहर)यापुढे कायकरायचे ते ठरवूमहाराष्ट्र तसेच कोकणला रेल्वे अर्थसंकल्पातून विशेष असे काहीच मिळालेले नाही. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी यापुढे प्रभू दर्शन होताच काय करायचे ते आम्ही ठरवू, असा खोचक इशाराही नारायण राणे यांनी दिला.शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाहीअनेक वर्षानंतर सत्ता मिळाल्याने शिवसेनेचे नेते पैसे कमवायच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांबरोबर त्यांचे कितीही खटके उडाले तरी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही. सत्तेत राहण्यासाठी त्यांची लाचारी सुरू असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी हे कधीच सहन केले नसते. सिंधुदुर्गातील दोन नंबरचे धंदे मी बंद केले होते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी आता हप्ते बांधून ते सुरू केले आहेत, असेही राणे म्हणाले.१०५ कोटी आणून दाखवाजनतेची दिशाभूल करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी जिल्हा नियोजनअंतर्गत १०५ कोटी रुपयांचा निधी आधी आणून दाखवावा आणि त्यानंतरच वक्तव्ये करावीत. दोन शब्दही बोलू न शकणारे आमदार विधानसभेत गेले आहेत. त्यांचा काहीच अभ्यास नसल्याने जनतेचे प्रश्न ते सोडवू शकणार नाहीत.मुख्यमंत्री स्वतंत्र विदर्भ राज्याचे पुरस्कर्तेसिंधुदुर्गातील सी-वर्ल्ड अथवा अन्य प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काहीही देणे-घेणे नाही. त्यामुळे ते याबाबत काहीच निर्णय घेणार नाहीत. ते स्वतंत्र विदर्भ राज्याचे पुरस्कर्ते असल्याने त्यांना त्या भागाचीच जास्त काळजी असल्याचे नारायण राणे यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.काँग्रेसचे पुण्यात शिबिरकेंद्र तसेच राज्य शासनाने जनतेची निराशा केली असून, भूसंपादन विधेयक तसेच अनेक प्रश्नांबाबत शासनाला घेरण्यासाठी काँग्रेसचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार होत आहे. पुणे येथे १४ व १५ मार्च रोजी यासाठी काँग्रेसचे शिबिर आयोजित करण्यात आले असून, त्यानंतर कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिला जाईल. भविष्यात जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस आक्रमक होईल, असे राणे यांनी सांगितले आहे.