शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

नाणारवरून रायगडमध्येही राजकीय वातावरण गरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 04:00 IST

भू-संपादनास शेकापचा विरोध : शिवसेना जनतेबरोबर

- आविष्कार देसाई अलिबाग : रत्नागिरी जिल्ह्यातील तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी सरकारने नव्याने भूसंपादन केल्यास त्याला आमचा विरोध राहील, मात्र सरकारकडे मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध आहे तेथे प्रकल्प उभारल्यास आमची हरकत राहणार नाही, असे मत शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.तर शिवसेना या प्रकल्पाविरोधात जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या मुद्द्यावर रायगडात आगामी काळात आंदोलन पेटून त्याचे चटके मात्र भाजपला बसणार असल्याचे बोलले जाते. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तर देत ही माहिती दिली. सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सहकार्याने तीन लाख कोटी रुपयांचा भव्य तेलशुद्धीकरण प्रकल्प प्रथम रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणारमध्ये उभारण्यात येणार होता, परंतु शिवसेनेने नाणारला प्रखर विरोध केला होता.विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. यावेळी विधानसभेत लेखी उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याची माहिती दिली. प्रकल्प रायगडमध्ये आणण्यास ४० गावातील ग्रामस्थांचा भूसंपादनाला विरोध नसल्याचेही ते म्हणाले. नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध होता. नाणार प्रकल्पामुळे कोकणातील फळबागा, शेती यासह निसर्गाची प्रचंड हानी होणार असल्यामुळे नाणारवासीयांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध होता. शिवसेनेनेदेखील कोकणातील जनतेच्या बाजूने भूमिका घेत या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध असल्याचे दाखवून दिले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना हा प्रकल्प नको होता तीच परिस्थिती रायगड जिल्ह्यात आहे. त्यामुळे जनतेच्या विरोधासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील. आमचा या प्रकल्पाला विरोध राहील असे शिवसेनेचे महाड विधानसभा क्षेत्राचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले.महाडमध्ये प्रकल्प उभारण्याची मागणीनाणारमधील प्रकल्प आता रायगड जिल्ह्यात स्थलांतरित होणार असल्याने शेकापकडून या प्रकल्पाला कडाडून विरोध होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला आहे. रायगड जिल्ह्यात प्रकल्प आणत असताना नव्याने भूसंपादन करायला आमचा विरोध राहील. कारण या आधीच विविध प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने मोठ्या प्रमाणात जमीन संपादित केलेली आहे. महाड तालुक्यातील पंचतारांकित एमआयडीसीमध्ये पाच हजार एकर जमीन उपलब्ध आहे. तेथे प्रकल्प उभारावा, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्प