शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

नाणारवरून रायगडमध्येही राजकीय वातावरण गरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 04:00 IST

भू-संपादनास शेकापचा विरोध : शिवसेना जनतेबरोबर

- आविष्कार देसाई अलिबाग : रत्नागिरी जिल्ह्यातील तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी सरकारने नव्याने भूसंपादन केल्यास त्याला आमचा विरोध राहील, मात्र सरकारकडे मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध आहे तेथे प्रकल्प उभारल्यास आमची हरकत राहणार नाही, असे मत शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.तर शिवसेना या प्रकल्पाविरोधात जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या मुद्द्यावर रायगडात आगामी काळात आंदोलन पेटून त्याचे चटके मात्र भाजपला बसणार असल्याचे बोलले जाते. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तर देत ही माहिती दिली. सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सहकार्याने तीन लाख कोटी रुपयांचा भव्य तेलशुद्धीकरण प्रकल्प प्रथम रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणारमध्ये उभारण्यात येणार होता, परंतु शिवसेनेने नाणारला प्रखर विरोध केला होता.विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. यावेळी विधानसभेत लेखी उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याची माहिती दिली. प्रकल्प रायगडमध्ये आणण्यास ४० गावातील ग्रामस्थांचा भूसंपादनाला विरोध नसल्याचेही ते म्हणाले. नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध होता. नाणार प्रकल्पामुळे कोकणातील फळबागा, शेती यासह निसर्गाची प्रचंड हानी होणार असल्यामुळे नाणारवासीयांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध होता. शिवसेनेनेदेखील कोकणातील जनतेच्या बाजूने भूमिका घेत या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध असल्याचे दाखवून दिले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना हा प्रकल्प नको होता तीच परिस्थिती रायगड जिल्ह्यात आहे. त्यामुळे जनतेच्या विरोधासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील. आमचा या प्रकल्पाला विरोध राहील असे शिवसेनेचे महाड विधानसभा क्षेत्राचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले.महाडमध्ये प्रकल्प उभारण्याची मागणीनाणारमधील प्रकल्प आता रायगड जिल्ह्यात स्थलांतरित होणार असल्याने शेकापकडून या प्रकल्पाला कडाडून विरोध होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला आहे. रायगड जिल्ह्यात प्रकल्प आणत असताना नव्याने भूसंपादन करायला आमचा विरोध राहील. कारण या आधीच विविध प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने मोठ्या प्रमाणात जमीन संपादित केलेली आहे. महाड तालुक्यातील पंचतारांकित एमआयडीसीमध्ये पाच हजार एकर जमीन उपलब्ध आहे. तेथे प्रकल्प उभारावा, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्प