शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

नाणारवरून रायगडमध्येही राजकीय वातावरण गरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 04:00 IST

भू-संपादनास शेकापचा विरोध : शिवसेना जनतेबरोबर

- आविष्कार देसाई अलिबाग : रत्नागिरी जिल्ह्यातील तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी सरकारने नव्याने भूसंपादन केल्यास त्याला आमचा विरोध राहील, मात्र सरकारकडे मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध आहे तेथे प्रकल्प उभारल्यास आमची हरकत राहणार नाही, असे मत शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.तर शिवसेना या प्रकल्पाविरोधात जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असल्याचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या मुद्द्यावर रायगडात आगामी काळात आंदोलन पेटून त्याचे चटके मात्र भाजपला बसणार असल्याचे बोलले जाते. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तर देत ही माहिती दिली. सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सहकार्याने तीन लाख कोटी रुपयांचा भव्य तेलशुद्धीकरण प्रकल्प प्रथम रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणारमध्ये उभारण्यात येणार होता, परंतु शिवसेनेने नाणारला प्रखर विरोध केला होता.विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. यावेळी विधानसभेत लेखी उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याची माहिती दिली. प्रकल्प रायगडमध्ये आणण्यास ४० गावातील ग्रामस्थांचा भूसंपादनाला विरोध नसल्याचेही ते म्हणाले. नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध होता. नाणार प्रकल्पामुळे कोकणातील फळबागा, शेती यासह निसर्गाची प्रचंड हानी होणार असल्यामुळे नाणारवासीयांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध होता. शिवसेनेनेदेखील कोकणातील जनतेच्या बाजूने भूमिका घेत या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध असल्याचे दाखवून दिले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना हा प्रकल्प नको होता तीच परिस्थिती रायगड जिल्ह्यात आहे. त्यामुळे जनतेच्या विरोधासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील. आमचा या प्रकल्पाला विरोध राहील असे शिवसेनेचे महाड विधानसभा क्षेत्राचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले.महाडमध्ये प्रकल्प उभारण्याची मागणीनाणारमधील प्रकल्प आता रायगड जिल्ह्यात स्थलांतरित होणार असल्याने शेकापकडून या प्रकल्पाला कडाडून विरोध होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला आहे. रायगड जिल्ह्यात प्रकल्प आणत असताना नव्याने भूसंपादन करायला आमचा विरोध राहील. कारण या आधीच विविध प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने मोठ्या प्रमाणात जमीन संपादित केलेली आहे. महाड तालुक्यातील पंचतारांकित एमआयडीसीमध्ये पाच हजार एकर जमीन उपलब्ध आहे. तेथे प्रकल्प उभारावा, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्प