शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत पाच तासांत उभं राहतं अख्खं गाव! ६२ कंटेनरमध्ये २३० जणांची केली सोय

By श्रीनिवास भोसले | Updated: November 8, 2022 07:07 IST

काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो पदयात्रा कन्याकुमारी ते श्रीनगर असा साडेतीन हजार किलोमीटरचा पल्ला पार करणार आहे.

देगलूर (जि.नांदेड) :

काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो पदयात्रा कन्याकुमारी ते श्रीनगर असा साडेतीन हजार किलोमीटरचा पल्ला पार करणार आहे. ही पदयात्रा सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास महाराष्ट्रात दाखल झाली. या दीडशे दिवसांच्या पदयात्रेतून खासदार राहुल गांधी हे एका वातानुकूलित कंटेनरमध्ये मुक्कामी राहतात. त्यांच्या या ताफ्यात असलेल्या जवळपास ६० ते ६२ कंटेनरमध्ये २३० जणांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था आहे. 

सामान्य लोकांना जोडण्यासाठीचा मार्ग म्हणून राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. दिवसभर २२ ते २५ किलोमीटरचे अंतर पायी चालून राहुल गांधी त्यांच्यातील जोश आणि उत्साह कायम कसा ठेवतात, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. त्यांच्या या स्पिरीटचे अनेकांकडून कौतुकही होत आहे. राहुल गांधी हे मुक्काम कुठे करतात, याबाबतही अनेकांना उत्सुकता लागली आहे. 

राहुल गांधी यांच्यासह सोबत असलेल्या जवळपास २३० लोकांची कंटेनरमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल ६० ते ६२ कंटेनर असून, त्यातील एक नंबरच्या कंटेनरमध्ये राहुल गांधी हे मुक्कामी असतात. काही डब्यांमध्ये स्लीपिंग बेड, टॉयलेट आणि एअर कंडिशनरही बसविले आहेत. प्रवासादरम्यान, तापमान आणि वातावरणात होणारा बदल लक्षात घेऊन अत्याधुनिक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या रूममध्ये बेडसह बरंच काही... राहुल गांधी ज्या कंटेनरमध्ये मुक्कामी राहणार आहेत, त्यामध्ये बेडसह फ्रीज, एक सोफा, समोर टीपॉय, टॉयलेट, बाथरूम, एसी, फॅन आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या रूमच्या एका बाजूने महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेचे छायाचित्र दर्शनीभागात फ्रेम करून लावलेले आहे.कंटेनरमध्ये मुक्कामभारत जोडो पदयात्रेत असलेले जवळपास ६० ते ६२ कंटेनर एकाच ठिकाणी थांबतात. त्यात राहुल गांधी ज्यामध्ये मुक्काम करतात, त्या कंटेनरच्या समोरच सुरक्षा रक्षकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येते. रात्रीच्या विश्रांतीसाठी हे कंटेनर दररोज नवीन ठिकाणी एका गावाच्या आकारात उभे केले जातात. हे सर्व सेटअप उभारणीसाठी तब्बल पाच ते सात तास लागतात. राहुल गांधींसोबत राहणारे पदयात्री एकत्र जेवतील आणि जवळ राहतील, अशी काहीशी व्यवस्था केली गेली आहे.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी