शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत पाच तासांत उभं राहतं अख्खं गाव! ६२ कंटेनरमध्ये २३० जणांची केली सोय

By श्रीनिवास भोसले | Updated: November 8, 2022 07:07 IST

काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो पदयात्रा कन्याकुमारी ते श्रीनगर असा साडेतीन हजार किलोमीटरचा पल्ला पार करणार आहे.

देगलूर (जि.नांदेड) :

काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो पदयात्रा कन्याकुमारी ते श्रीनगर असा साडेतीन हजार किलोमीटरचा पल्ला पार करणार आहे. ही पदयात्रा सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास महाराष्ट्रात दाखल झाली. या दीडशे दिवसांच्या पदयात्रेतून खासदार राहुल गांधी हे एका वातानुकूलित कंटेनरमध्ये मुक्कामी राहतात. त्यांच्या या ताफ्यात असलेल्या जवळपास ६० ते ६२ कंटेनरमध्ये २३० जणांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था आहे. 

सामान्य लोकांना जोडण्यासाठीचा मार्ग म्हणून राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. दिवसभर २२ ते २५ किलोमीटरचे अंतर पायी चालून राहुल गांधी त्यांच्यातील जोश आणि उत्साह कायम कसा ठेवतात, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. त्यांच्या या स्पिरीटचे अनेकांकडून कौतुकही होत आहे. राहुल गांधी हे मुक्काम कुठे करतात, याबाबतही अनेकांना उत्सुकता लागली आहे. 

राहुल गांधी यांच्यासह सोबत असलेल्या जवळपास २३० लोकांची कंटेनरमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल ६० ते ६२ कंटेनर असून, त्यातील एक नंबरच्या कंटेनरमध्ये राहुल गांधी हे मुक्कामी असतात. काही डब्यांमध्ये स्लीपिंग बेड, टॉयलेट आणि एअर कंडिशनरही बसविले आहेत. प्रवासादरम्यान, तापमान आणि वातावरणात होणारा बदल लक्षात घेऊन अत्याधुनिक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या रूममध्ये बेडसह बरंच काही... राहुल गांधी ज्या कंटेनरमध्ये मुक्कामी राहणार आहेत, त्यामध्ये बेडसह फ्रीज, एक सोफा, समोर टीपॉय, टॉयलेट, बाथरूम, एसी, फॅन आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या रूमच्या एका बाजूने महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेचे छायाचित्र दर्शनीभागात फ्रेम करून लावलेले आहे.कंटेनरमध्ये मुक्कामभारत जोडो पदयात्रेत असलेले जवळपास ६० ते ६२ कंटेनर एकाच ठिकाणी थांबतात. त्यात राहुल गांधी ज्यामध्ये मुक्काम करतात, त्या कंटेनरच्या समोरच सुरक्षा रक्षकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येते. रात्रीच्या विश्रांतीसाठी हे कंटेनर दररोज नवीन ठिकाणी एका गावाच्या आकारात उभे केले जातात. हे सर्व सेटअप उभारणीसाठी तब्बल पाच ते सात तास लागतात. राहुल गांधींसोबत राहणारे पदयात्री एकत्र जेवतील आणि जवळ राहतील, अशी काहीशी व्यवस्था केली गेली आहे.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी