शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 19:11 IST

Deputy CM Eknath Shinde: राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

Deputy CM Eknath Shinde: अशा प्रकारे कोणी सांगून मते कमी किंवा जास्त होत नसतात. जेव्हा काँग्रेस जिंकते तेव्हा त्यांचे आरोप नसतात. मात्र, जेव्हा काँग्रेसचा पराभव होतो तेव्हा ते आरोप करतात. ईव्हीएमवरही राहुल गांधी आरोप करतात. मात्र, ईव्हीएमवरील मतदानाला कधी आणि कोणाच्या काळात सुरूवात झाली, अशी विचारणा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतचोरीबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले. 

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. मतदार यादीतून काही व्यक्तींची नावे वगळण्यासाठी त्यांच्या ओळखीचा वापर दुसऱ्याच व्यक्तींनी केल्याचा दावा करत राज्याबाहेरचे काही मोबाईल क्रमांक ओटीपीसाठी वापरला गेला. २०२३ मध्ये कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीत वोट चोरी झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. यावर आता राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. 

न्यायालयात गेले पाहिजे

पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्या ठिकाणी मतचोरीचा आरोप केला, तेथे काँग्रेसचा उमेदवार निवडून कसा आला? राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे पुरावे दिले नाहीत. फक्त काही आकडेवारी सांगून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. पण जर राहुल गांधींकडे ठोस पुरावे असतील तर निवडणूक आयोगाकडे दिले पाहिजेत. तसेच त्यांनी न्यायालयात गेले पाहिजे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. 

मनमोहन सिंग यांनी सुरू केलेली प्रक्रिया चुकीची होती का?

ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान घेण्याची पद्धत ही यूपीएच्या काळात सुरू झाली. त्यावेळी मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. त्यामुळे त्यांनी सुरू केलेली प्रक्रिया ही चुकीची आहे, असे त्यांना म्हणायचे आहे का? मतचोरी करण्याचे काम १४ ते १५ वर्षांपासून सुरू आहे, असे ते सांगत आहेत का? आता १५ वर्षांपूर्वी सत्तेत कोण होते? असा सवाल शिंदे यांनी केला.  

दरम्यान, निवडणूक आयोगाने राहुल गांधी आणि जे आरोप करतात त्यांना सांगितले होते की, तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते सादर करा. तसेच प्रतिज्ञापत्र सादर करा. मात्र, प्रतिज्ञापत्र न देता फक्त आरोप करत आहेत. मी काही वेळापूर्वी पाहिले की, कर्नाटकमधील एका मतदारसंघामध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, जर मतांची चोरी झाली असती तर त्या ठिकाणी काँग्रेसचा आमदार निवडून कसा आला? मग मतांची चोरी कोणी केली? भाजपाने केली की काँग्रेसने केली? अशी विचारणा एकनाथ शिंदे यांनी केली.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग