शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

"मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी"; राज्य सरकारच्या योजनेवर शेतकरी नेत्याचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 17:15 IST

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी नव्या योजनांची घोषणा केली. या योजनेवरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला. यावेळी अजित पवार यांनी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेची घोषणा केली. या योजनेमार्फत महिलांना प्रति महिना १५०० रुपये मिळणार आहेत. या योजनेवरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. दरम्यान, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनीही राज्य सरकावर निशाणा साधला आहे. "सरकारची ही योजना म्हणजे मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी, असा टोला रघुनाथदादा पाटील यांनी लगावला आहे. 

Mihir Shah : मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाहला अखेर शहापूरमधून केली अटक

आज शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. "लाडकी बहीण योजना म्हणजे मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी अशी ही सरकारची योजना आहे, अशी टीका रघुनाथदादा पाटील यांनी सरकारवर केली. सरकारने जाहीर केलेली योजना राजकीय उद्देशाने जाहीर केली आहे. ही योजना फसवी आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. पण महिलांना एवढे पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसा आहे कुठे?, असंही रघुनाथदादा पाटील म्हणाले. 

अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत

 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. एकाचवेळी अनेक महिला अर्ज भरण्यासाठी जात असल्याने जागोजागी रांगा लागत आहेत. मात्र आता सरकारने या योजनेसाठी अर्ज भरायला मुदतवाढ दिली आहे. पात्र महिलांना अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच अर्ज करण्याची प्रक्रियाही सोपी केली आहे. या योजनेतून पात्र महिलेला दरमहा १५०० रुपये दिले जाणार असून या माध्यमातून एका वर्षात १८ हजार रुपये मिळतील, यामध्ये ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै महिन्याचेही पैसे दिले जातील.

उत्पन्न मर्यादा काय-

१) अडीच लाखांच्या आतील उत्पन्नाचा दाखला.

२) अडीच लाख रुपये उत्पन्नाचा दाखला नसल्यास पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आवश्यक.

कोण अर्ज करू शकते-

राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार आणि परित्यक्त्ता स्त्रिया अर्ज करू शकतात. तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला अर्ज करता येईल. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे