शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

रेडीरेकनरचे दर आता एक मे पासून बदलणार; शासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 19:26 IST

जमिनीचे सरकारी बाजार मूल्य किंवा रेडीरेकनरचे दर हे सर्व प्रकारच्या जमीन आणि घरे खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी आधारभूत असतात.

 नाशिक-  राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा विचार करता येत्या एक एप्रिलपासून रेडीरेकनरचे दर बदलणार नसून ते आता १ मे किंवा शासन निर्धारित करेल त्या तारखेपासून बदलतील असे आदेश नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक  ओमप्रकाश देशमुख यांनी सोमवारी (दि.३०)  जारी केले आहेत.

जमिनीचे सरकारी बाजार मूल्य किंवा रेडीरेकनरचे दर हे सर्व प्रकारच्या जमीन आणि घरे खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी आधारभूत असतात. शासनाचे मुद्रांक शुल्क भरताना जमिनीचे सरकारी मूल्य (रेडिरेकनर) प्रमाणेच हेच आधारभूत असतात.

 काही वर्षांपूर्वी १  जानेवारीपासून दरांमध्ये सुधारणा केली जात असे. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून १ एप्रिलपासून हे दर बदलले जातात. यंदा जीपीएस मॅपिंगद्वारे जमिनीचे मूल्य निर्धारण करण्यात येणार होते. त्यादृष्टीने शासनाने तयारी केली होती. दरम्यान, गेल्या महिन्यापासून कोरोना संसर्गामुळे राज्यातील वातावरण बदलले आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पाच टक्के शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये कामकाज करण्याचे आदेश आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर 1 एप्रिल पासून हे दर बदलणार नसून त्याऐवजी 1 मे पासून दरात सुधारणा केली जाणार आहे.

तोपर्यंत जमिनीचे व्यवहार झाल्यास त्यासाठी गेल्या वर्षाचे दर आधारभूत मानले जाणार आहे. त्यामुळे विकासक आणि सामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या स्थितीमुळे सर्वत्र लॉक डाऊन असून उद्योग- व्यवसाय आणि आणि सर्व प्रकारच्या खासगी आस्थापना बंद आहेत. बांधकाम क्षेत्र देखील ठप्प झाले आहे. अशा वेळी शासनाने दरामध्ये सुधारणा करताना सहानुभूतीपूर्वक विचार करावा किंबहुना दरवाढ करू नये अशी मागणी विकासकांकडून होत आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र