शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची सोय असेल तरच रबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 11:41 IST

शेतीचा डॉक्टर : शेतकऱ्यांकडे दोन पाणी पाळी देण्यापुरती पाण्याची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी हरभरा, ज्वारी, करडई, जवस यासारखी रबीतील पिकांची पेरणी करावी.

- प्रसाद आर्वीकर (परभणी)

परतीचा पाऊस आता पूर्णत: परतला आहे. हा पाऊस होण्याची शक्यता राहिली नाही. तेव्हा कोरडवाहू शेतकऱ्यांनी रबीच्या पेरण्या करू नयेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे दोन पाणी पाळी देण्यापुरती पाण्याची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी हरभरा, ज्वारी, करडई, जवस यासारखी रबीतील पिकांची पेरणी करावी, असा सल्ला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. यू.एन. आळसे यांनी दिला आहे.

राज्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पावसाचा भरवसा राहिला नसल्याने शेतकऱ्यांनी रबीची पेरणी करू नये. मात्र, पाण्याची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनी संपूर्ण पीक शाश्वत पाणीसाठ्यावर घेता येत असेल, तर कमी पाणी लागणारे हरभरा, जवस, करडई, ज्वारी ही पिके घ्यावीत. गव्हासारख्या पिकाची पेरणी मात्र करू नये, असे आवाहन डॉ. आळसे यांनी केले आहे.

दरम्यान, खरीप हंगामातील मूग, उडीद या पिकांची काढणी झाली असून, सोयाबीनची काढणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे खळे करून घ्यावे. सोयाबीन काढणी झालेले रान मशागत करून ठेवावे. अनेक ठिकाणी सोयाबीनमध्ये तूर हे आंतरपीक घेतलेले असते. सोयाबीन काढणी झाल्यानंतर तुरीच्या पिकाला हलकी पाळी घालावी.

कापूस पिकासाठी शक्य आहे तेथे कोळपणी करून घ्यावी. बागायती शेतकऱ्यांनी कापसात एक ओळ सोडून सरीद्वारे पाणी द्यावे. खरिपातील कापूस आणि तूर ही पिके सध्या शेतात उभी आहेत. या पिकांना पाण्याचा ताण सहन करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट किंवा १३:०:४५ किंवा युरिया, पोटॅशची प्रत्येकी १५० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन डॉ. आळसे यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी