शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

पाण्याची सोय असेल तरच रबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 11:41 IST

शेतीचा डॉक्टर : शेतकऱ्यांकडे दोन पाणी पाळी देण्यापुरती पाण्याची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी हरभरा, ज्वारी, करडई, जवस यासारखी रबीतील पिकांची पेरणी करावी.

- प्रसाद आर्वीकर (परभणी)

परतीचा पाऊस आता पूर्णत: परतला आहे. हा पाऊस होण्याची शक्यता राहिली नाही. तेव्हा कोरडवाहू शेतकऱ्यांनी रबीच्या पेरण्या करू नयेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे दोन पाणी पाळी देण्यापुरती पाण्याची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी हरभरा, ज्वारी, करडई, जवस यासारखी रबीतील पिकांची पेरणी करावी, असा सल्ला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. यू.एन. आळसे यांनी दिला आहे.

राज्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पावसाचा भरवसा राहिला नसल्याने शेतकऱ्यांनी रबीची पेरणी करू नये. मात्र, पाण्याची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनी संपूर्ण पीक शाश्वत पाणीसाठ्यावर घेता येत असेल, तर कमी पाणी लागणारे हरभरा, जवस, करडई, ज्वारी ही पिके घ्यावीत. गव्हासारख्या पिकाची पेरणी मात्र करू नये, असे आवाहन डॉ. आळसे यांनी केले आहे.

दरम्यान, खरीप हंगामातील मूग, उडीद या पिकांची काढणी झाली असून, सोयाबीनची काढणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे खळे करून घ्यावे. सोयाबीन काढणी झालेले रान मशागत करून ठेवावे. अनेक ठिकाणी सोयाबीनमध्ये तूर हे आंतरपीक घेतलेले असते. सोयाबीन काढणी झाल्यानंतर तुरीच्या पिकाला हलकी पाळी घालावी.

कापूस पिकासाठी शक्य आहे तेथे कोळपणी करून घ्यावी. बागायती शेतकऱ्यांनी कापसात एक ओळ सोडून सरीद्वारे पाणी द्यावे. खरिपातील कापूस आणि तूर ही पिके सध्या शेतात उभी आहेत. या पिकांना पाण्याचा ताण सहन करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट किंवा १३:०:४५ किंवा युरिया, पोटॅशची प्रत्येकी १५० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन डॉ. आळसे यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी