शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

पाण्याची सोय असेल तरच रबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 11:41 IST

शेतीचा डॉक्टर : शेतकऱ्यांकडे दोन पाणी पाळी देण्यापुरती पाण्याची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी हरभरा, ज्वारी, करडई, जवस यासारखी रबीतील पिकांची पेरणी करावी.

- प्रसाद आर्वीकर (परभणी)

परतीचा पाऊस आता पूर्णत: परतला आहे. हा पाऊस होण्याची शक्यता राहिली नाही. तेव्हा कोरडवाहू शेतकऱ्यांनी रबीच्या पेरण्या करू नयेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे दोन पाणी पाळी देण्यापुरती पाण्याची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी हरभरा, ज्वारी, करडई, जवस यासारखी रबीतील पिकांची पेरणी करावी, असा सल्ला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. यू.एन. आळसे यांनी दिला आहे.

राज्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पावसाचा भरवसा राहिला नसल्याने शेतकऱ्यांनी रबीची पेरणी करू नये. मात्र, पाण्याची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनी संपूर्ण पीक शाश्वत पाणीसाठ्यावर घेता येत असेल, तर कमी पाणी लागणारे हरभरा, जवस, करडई, ज्वारी ही पिके घ्यावीत. गव्हासारख्या पिकाची पेरणी मात्र करू नये, असे आवाहन डॉ. आळसे यांनी केले आहे.

दरम्यान, खरीप हंगामातील मूग, उडीद या पिकांची काढणी झाली असून, सोयाबीनची काढणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे खळे करून घ्यावे. सोयाबीन काढणी झालेले रान मशागत करून ठेवावे. अनेक ठिकाणी सोयाबीनमध्ये तूर हे आंतरपीक घेतलेले असते. सोयाबीन काढणी झाल्यानंतर तुरीच्या पिकाला हलकी पाळी घालावी.

कापूस पिकासाठी शक्य आहे तेथे कोळपणी करून घ्यावी. बागायती शेतकऱ्यांनी कापसात एक ओळ सोडून सरीद्वारे पाणी द्यावे. खरिपातील कापूस आणि तूर ही पिके सध्या शेतात उभी आहेत. या पिकांना पाण्याचा ताण सहन करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट किंवा १३:०:४५ किंवा युरिया, पोटॅशची प्रत्येकी १५० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन डॉ. आळसे यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी