शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

‘महाज्योती’च्या योजनांच्या नियोजनातील त्रुटींमुळे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 08:58 IST

पीएच.डी.धारकांच्या समस्या सुटेनात : विद्यार्थ्यांना विद्यावेतनाची प्रतीक्षा

नागपूर : ओबीसी व व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य, गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन आदींसाठी स्थापना करण्यात आलेल्या ‘महाज्योती’द्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या नियोजनातच त्रुटी असल्याने एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पीएच.डी.धारक, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, उच्च शिक्षणासाठी आयोजित प्रवेशपूर्व कोचिंग घेणारे विद्यार्थी असोत की यूपीएससीचे विद्यार्थी; या सर्वांकडून ‘महाज्योती’च्या संचालनकर्त्यांवर ठपका ठेवण्यात येत आहे.ओबीसीचे ८० विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षेत मुलाखतीसाठी पात्र झाले आहे. महाज्योतीने विद्यावेतन देण्यासाठी ५ ते २५ एप्रिलदरम्यान अर्ज मागितले होते. ८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली; पण विद्यावेतनाबाबत काहीच निर्णय झाला नाही.या आहेत पीएच.डी.धारकांच्या मागण्यामहाज्योतीने संशोधन करण्यासाठी जाहिरात काढली. त्यात अर्ज स्वीकारण्याची तारीख ३० मे होती. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना कागदपत्र गोळा करणे शक्य झाले नाही. सारथीने मुदतवाढ दिली; पण महाज्योतीने दिली नाही.महाज्योती केवळ २०१९ मध्ये नोंदणी केलेल्या पीएच.डी.धारकांनाच लाभ देणार आहे. त्यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश करावा.सारथीमध्ये संशोधनासाठी ५०० जागा आहेत; पण महाज्योतीत व्हीजेएनटी व ओबीसीचा समावेश असताना केवळ १५० जागा आहेत. किमान ७०० जागा कराव्यात. बार्टी आणि सारथीएवढेच पीएच.डी.धारकांना विद्यावेतन द्यावे.पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणही अपुरेचपोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण १० हजार युवकांना देण्यात येणार होते. चार हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. केवळ १०० विद्यार्थी ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षण देणाऱ्यांना अनुभव नाही. प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्यांचा होता. त्यात टॅब्लेट देण्यात येणार होते. त्याबाबतचे काहीच नियोजन नाही.पीएच.डी. धारकांच्या समस्या कायमच‘सारथी’ची स्थापना २०१८ मध्ये झाली आणि महाज्योतीचीसुद्धा याच वर्षी नोंदणी झाली. मराठा कुणबी समाजासाठी काम करणाऱ्या सारथीने पीएच.डी.धारकांना सर्व लाभ दिले; पण महाज्योती पीएच.डी.धारकांचे प्रश्नच सोडवू शकली नाही.- किरण वर्णेकर, पीएच.डी.धारकविमुक्त भटक्यांचा केवळ नावापुरता समावेशमहाज्योतीमध्ये विमुक्त भटक्या जातिजमातीचा समावेश आहे. भटक्यांची शैक्षणिक पातळी अत्यल्प आहे. त्यामुळे योजनांचा लाभ केवळ ओबीसीचे विद्यार्थी घेऊ शकतात. मच्छीमार, बेलदार, पारधी, कैकाडी, नाथजोगी, गोसावी, मशानजोगी या जमातींवर संशोधनाचे कार्य होणे गरजेचे आहे.- गजानन चंदावार, संघटक, युवा संघर्ष वाहिनी