शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

पां.वा. गाडगीळ, बाबा दळवी स्मृती पुरस्कार जाहीर

By admin | Updated: December 13, 2015 02:24 IST

लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित पां.वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म.य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत.

नागपूर : लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित पां.वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म.य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत. हे पुरस्कार नागपूर येथे १६ डिसेंबरला समारंभपूर्वक प्रदान केले जातील. या दोन्ही प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे २०१२ ते १५ या चार वर्षांचे मानकरी जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. या कार्यक्रमात आजची पत्रकारिता व शासन या विषयावर कौन्सिल फॉर इंडियन फॉरेन पॉलिसीचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश वैदिक यांचे व्याख्यान आयोजले आहे. लोकमत एडिटोरियल बोर्ड व लोकमत मीडिया प्रा. लि. चेअरमन विजय दर्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शालेय शिक्षणमंत्री व लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा असतील. पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे- पां.वा. गाडगीळ आर्थिक-विकासात्मक लेखन स्पर्धा- वर्ष २०१२- प्रथम- अ‍ॅड.कांतीलाल तातेड, नाशिक, वर्ष २०१३- प्रथम-ज.शं. आपटे, पुणे, द्वितीय. वर्ष २०१४- प्रथम - डॉ. नितीन चौधरी, अकोला, द्वितीय-सुनील चव्हाण, पुणे, तृतीय - डॉ. क्रांतिकुमार शर्मा, नांदेड; वर्ष- २०१५- प्रथम - डॉ. जे.एफ.पाटील, कोल्हापूर, द्वितीय - डॉ. वर्षा गंगणे, गोंदिया, तृतीय - बापू अडकिने, परभणी. बाबा दळवी शोधपत्रकारिता स्पर्धा- वर्ष २०१२- प्रथम - हरी विश्वनाथ मोकाशे, लातूर, द्वितीय - सविता देव हरकरे, नागपूर व तृतीय- भालचंद्र कुलकर्णी, अहमदनगर; वर्ष २०१३- प्रथम- संजय देशपांडे, औरंगाबाद, द्वितीय- दिनेश गुप्ता, औरंगाबाद व तृतीय- नरेश डोंगरे, नागपूर; वर्ष २०१४- प्रथम-गणेश देशमुख, अमरावती, द्वितीय- विठ्ठल हेंद्रे, सातारा व तृतीय- संदीप रायपुरे, चंद्रपूर ; वर्ष २०१५- प्रथम- प्रदीप तरकसे, अंबाजोगाई, बीड, द्वितीय- ज्ञानेश्वर भाले, जळगाव व तृतीय- शिवाजी भोसले, सोलापूर. पुरस्कारांचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. परीक्षक म्हणून लोकमतचे समन्वयक संपादक कमलाकर धारप, ज्येष्ठ संपादक ल. त्र्यं. जोशी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले व लोकमत टाइम्स नागपूरचे वाणिज्य संपादक सोपान पांढरीपांडे यांनी काम पाहिले.