शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

विधानसभेत धक्काबुक्की; सदस्यांनी फलक ओढल्यामुळे झाले रणकंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 06:20 IST

सत्ताधारी-विरोधकांमध्ये सामना; कामकाज दिवसभरासाठी तहकूब

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्या, या उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीचा ‘सामना’च्या बातमीचा फलक मंगळवारी भाजप आमदारांनी विधानसभेत मंत्र्यांसमोर फडकावताच शिवसेना आमदारांनी तो ओढला. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्की झाली. दोन्ही बाजूंचे सदस्य वेलमध्ये उतरले. त्यामुळे विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी कामकाज तहकूब केले आणि दोन्हीकडील नेत्यांनी सदस्यांना शांत केले.

आजची घटना अशोभनीय असून सभागृहाच्या परंपरेला शोभेशी नाही, असे सांगत अध्यक्ष पटोले यांनी दोन्ही बाजूंच्या सदस्यांना समज दिली आणि पुन्हा असा प्रकार घडू नये, असेही बजावले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याच्या ठाकरे यांच्या मागणीची आठवण करून दिली. ही मदत जाहीर करीत नाही तोवर कामकाज चालवू नका, असे म्हणत त्यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली.

लगेच भाजपच्या सदस्यांनी घोषणा सुरू केल्या. अध्यक्षांनी स्थगन फेटाळताच घोषणा वाढल्या. उद्धव ठाकरे तेव्हा सभागृहात होते. अतिवृष्टी झाली तेव्हा भाजपचे सरकार होते. तेव्हा मदत का केली नाही, आता का कांगावा करीत आहात? असे सांगत आमच्या सरकारने मागितलेली १४,६०० कोटी रुपयांची मदत आणायला केंद्राकडे चला, असा हल्लाबोल वित्तमंत्री जयंत पाटील यांनी केला. तेवढ्यात भाजपच्या सदस्यांनी फलक फडकविला. त्यावर शिवसेनेचे सदस्य संतप्त होऊन समोर आले. अध्यक्षाांनी फलक बाहेर नेण्यास सांगितले, पण भाजप सदस्य ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. फलक हाती घेतलेल्या एकेका सदस्याचे नाव लिहा, असे आदेश पटोले यांनी दिल्यानंतर भाजपचा एकेक सदस्य बाजूला झाला. पण बदनापूरचे ाारायण कुचे आणि औसाचे अभिमन्यू पवार या दोन सदस्यांनी तो शिवसेना मंत्र्यांसमोर जाऊन दाखविणे सुरूच ठेवले. त्याचवेळी शिवसेनेचे बुलडाण्याचे संजय गायकवाड यांनी तो फलक जोरात ओढला.दोन्ही बाजूंचे सदस्य भिडले आणि प्रकरण हातघाईवर आले. वेलमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून ज्येष्ठ सदस्य शिवसेनेचे भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी सदस्यांना आवरले. भाजपच्या संतप्त सदस्यांना देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी शांत केले. अध्यक्ष पटोले यांनी आधी अर्ध्या तासासाठी तर तालिका अध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी १० मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा अध्यक्षांनी गोंधळी सदस्यांना समज दिली.

देवेंद्र फडणवीस यांनीही, विरोधी सदस्यांकडून चांगले वर्तन राखले जाईल, अशी हमी दिली. मात्र, याआधीही सदस्य फलक फडकवत असत, पण समोरच्या बाजूने ते कधीही फाडले गेले नाहीत याकडेही त्यांनी लक्ष वेधले. भाजप सदस्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली आणि लक्षवेधी सूचना व इतर कामकाज पुढे ढकलत व विधेयके गोंधळातच मंजूर करवून घेत कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.आधी सामना वाचला असता तर...आजच्या गदारोळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचे मुखपत्र देवेंद्र फडणवीस आधी वाचत नव्हते. आता ते वाचत असल्याची कबुली त्यांनी दिली, हे बरे झाले. त्यांनी तो आधीच वाचला असता तर आमचा ‘सामना’ झाला नसता.विधान परिषदेतही विरोधकांची आरडाओरडशेतकºयांची कर्जमाफी आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत तत्काळ जाहीर करण्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत आणि शिवसेनेच्या मुखपत्रातील बातमीचा फलक फडकविला. त्यानंतर, सत्तारूढ सदस्यांनी उठून फलक खेचायला सुरुवात केल्याने तणाव निर्माण झाला.प्रचंड घोषणाबाजी, गोंधळात सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब झाले. त्यानंतर, वित्तमंत्री जयंत पाटील बोलत असताना विरोधकांनी आरडाओरड सुरू केली. सभापती रामराजे निंबाळकर आणि उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांनी सदस्यांच्या गैरवर्तनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. गदारोळात कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस