शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अहमदनगरला आता अहिल्यादेवी यांचे नाव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 05:50 IST

बारामती मेडिकल कॉलेजलाही अहिल्यादेवींचे नाव

चोंडी (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करून जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे  नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी चोंडीत केली. बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालाही अहिल्यादेवींचे नाव देण्याची घोषणा यावेळी केली. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९८वा जयंती सोहळा येथे शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरा झाला. व्यासपीठावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, सुजय विखे-पाटील, आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर, अण्णा डांगे, विकास महात्मे आदींची उपस्थिती होती. सोहळ्यात प्रारंभी राम शिंदे व पडळकर यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या मागणीकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. 

आरक्षणाबाबत घोषणाबाजीजयंती उत्सव सोहळ्याला उपस्थित असलेल्या समुदायाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे भाषण सुरू असताना ‘धनगर समाजाला आरक्षण द्या’ अशी घोषणाबाजी केली. मात्र, शिंदे, फडणवीस यांनी भाषणात आरक्षणाबाबत उल्लेख केला नाही. 

नेमके नामकरण काय असणार? गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नामकरण ‘अहिल्यानगर’ असे करण्याची मागणी केली होती. फडणवीस यांनीही आपल्या भाषणात याच नावाचा उल्लेख केला. मात्र त्यांनी सभेनंतर केलेल्या ट्वीटमध्ये अहमदनगरचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यानगर’ असेल असे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी भाषणात ‘अहिल्यादेवी होळकर’ अशा नावाचा उल्लेख केला तर ट्वीटमध्ये ‘अहिल्यादेवीनगर’ असे म्हटले. त्यामुळे नवीन नाव नेमके काय असणार? याबाबत संभ्रम असून ही बाब शासन आदेशानंतरच स्पष्ट होणार आहे. 

उपमुख्यमंत्र्यांची विनंती अन्...फडणवीस यांनी आपल्या भाषणात ‘सरकारने औरंगाबाद, उस्मानाबादचे नामकरण केले. आता तुमच्या नेतृत्वात या जिल्ह्याचे नामकरण झाले पाहिजे’ असा उल्लेख मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात ही घोषणा केली. ते म्हणाले, ‘अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अहिल्यादेवींचे कर्तृत्व मोठे होते. नामांतरामुळे या जिल्ह्याचे नावही हिमालयाएवढे उंच होणार आहे. गतवर्षी ज्यांनी चोंडीत येऊन राजकारण केले त्यांना आम्ही सत्तेतून घालविले, अशी टिप्पणी त्यांनी शरद पवार यांना उद्देशून केली. 

अहिल्यादेवींची ३००वी जयंती जगाला हेवा वाटेल, अशा पद्धतीने साजरी करू. अहिल्यादेवींच्या नावाने असलेल्या महामंडळासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. धनगर समाजाच्या ज्या छोट्या-मोठ्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील. एकनाथ शिंदेमुख्यमंत्री 

हिंदवी स्वराज्याचा विस्तार अहिल्यादेवींनी देशभर केला. त्यांनी शासनाच्या नव्हे तर स्वत:च्या तिजोरीतून हिंदू धर्मस्थळांचा जीर्णोद्धार केला. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAhmednagarअहमदनगर