शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

अहमदनगरला आता अहिल्यादेवी यांचे नाव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 05:50 IST

बारामती मेडिकल कॉलेजलाही अहिल्यादेवींचे नाव

चोंडी (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करून जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे  नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी चोंडीत केली. बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालाही अहिल्यादेवींचे नाव देण्याची घोषणा यावेळी केली. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९८वा जयंती सोहळा येथे शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरा झाला. व्यासपीठावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, सुजय विखे-पाटील, आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर, अण्णा डांगे, विकास महात्मे आदींची उपस्थिती होती. सोहळ्यात प्रारंभी राम शिंदे व पडळकर यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या मागणीकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. 

आरक्षणाबाबत घोषणाबाजीजयंती उत्सव सोहळ्याला उपस्थित असलेल्या समुदायाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे भाषण सुरू असताना ‘धनगर समाजाला आरक्षण द्या’ अशी घोषणाबाजी केली. मात्र, शिंदे, फडणवीस यांनी भाषणात आरक्षणाबाबत उल्लेख केला नाही. 

नेमके नामकरण काय असणार? गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नामकरण ‘अहिल्यानगर’ असे करण्याची मागणी केली होती. फडणवीस यांनीही आपल्या भाषणात याच नावाचा उल्लेख केला. मात्र त्यांनी सभेनंतर केलेल्या ट्वीटमध्ये अहमदनगरचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यानगर’ असेल असे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी भाषणात ‘अहिल्यादेवी होळकर’ अशा नावाचा उल्लेख केला तर ट्वीटमध्ये ‘अहिल्यादेवीनगर’ असे म्हटले. त्यामुळे नवीन नाव नेमके काय असणार? याबाबत संभ्रम असून ही बाब शासन आदेशानंतरच स्पष्ट होणार आहे. 

उपमुख्यमंत्र्यांची विनंती अन्...फडणवीस यांनी आपल्या भाषणात ‘सरकारने औरंगाबाद, उस्मानाबादचे नामकरण केले. आता तुमच्या नेतृत्वात या जिल्ह्याचे नामकरण झाले पाहिजे’ असा उल्लेख मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात ही घोषणा केली. ते म्हणाले, ‘अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अहिल्यादेवींचे कर्तृत्व मोठे होते. नामांतरामुळे या जिल्ह्याचे नावही हिमालयाएवढे उंच होणार आहे. गतवर्षी ज्यांनी चोंडीत येऊन राजकारण केले त्यांना आम्ही सत्तेतून घालविले, अशी टिप्पणी त्यांनी शरद पवार यांना उद्देशून केली. 

अहिल्यादेवींची ३००वी जयंती जगाला हेवा वाटेल, अशा पद्धतीने साजरी करू. अहिल्यादेवींच्या नावाने असलेल्या महामंडळासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. धनगर समाजाच्या ज्या छोट्या-मोठ्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील. एकनाथ शिंदेमुख्यमंत्री 

हिंदवी स्वराज्याचा विस्तार अहिल्यादेवींनी देशभर केला. त्यांनी शासनाच्या नव्हे तर स्वत:च्या तिजोरीतून हिंदू धर्मस्थळांचा जीर्णोद्धार केला. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAhmednagarअहमदनगर