शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

जनजागृतीनेच कर्णबधिर मुलांना सामान्य शाळेत शिक्षण शक्य

By admin | Updated: September 28, 2016 02:38 IST

जन्मत: कर्णबधिर असणाऱ्या मुलांचे जन्मावेळी अथवा पुढच्या एक ते दोन महिन्यांत निदान झाल्यास ही मुले सामान्य शाळेत शिक्षण घेऊन सामान्यपणे आयुष्य जगू शकतात.

मुंबई : जन्मत: कर्णबधिर असणाऱ्या मुलांचे जन्मावेळी अथवा पुढच्या एक ते दोन महिन्यांत निदान झाल्यास ही मुले सामान्य शाळेत शिक्षण घेऊन सामान्यपणे आयुष्य जगू शकतात. पण, जनजागृतीच्या अभावामुळे वयाच्या दोन ते अडीच वर्षांनंतर या मुलांना डॉक्टरकडे आणले जाते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली. मूल जन्माला आल्यावर त्यात कोणते व्यंग नाही ना, हे पाहणे अत्यंत गरजेचे असते. अजूनही आपल्याकडे अनेक ठिकाणी मुलांच्या श्रवण क्षमतेची तपासणी केली जात नाही. श्रवण क्षमता तपासणी करण्याचे तंत्रज्ञान ठरावीक रुग्णालयांतच उपलब्ध आहे. त्यामुळे अजूनही कर्णबधिरपणाविषयी म्हणावी तितकी जनजागृती झालेली दिसत नाही. त्यामुळे मूल आवाजाला प्रतिसाद देत नसले तरीही पालक याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. अनेकदा मूल साडेतीन-चार वर्षांचे झाल्यावर शाळेत जाऊ लागते. त्या वेळी त्याची श्रवण क्षमता कमी असल्याचे शिक्षकांकडून सांगितल्यावर डॉक्टरांकडे नेण्यात येते, असे कपूर रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाचे डॉ. समीर भार्गव यांनी सांगितले. डॉ. भार्गव यांच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांना लसीकरण करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे तपासण्या करणे आवश्यक आहे. श्रवणक्षमतेची तपासणी केल्यास नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. मुलांवर लवकर उपचार सुरू झाल्यास त्यांच्या बोलण्याच्या क्षमतेचा विकास चांगला होतो. नायर रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाचे डॉ. संजय छाब्रिया यांनी सांगितले, हजार मुलांमागे ३ ते ४ मुले ही कर्णबधिर जन्माला येतात. पण, त्यांचे निदान होण्याचे वय हे दीड ते चार वर्षे आहे. काहीच मुलांचे वय काही महिन्यांचे असताना ते कर्णबधिर असल्याचे निदान होते. त्यानंतर त्यांच्या कानांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार सुरू केले जातात. लहानपणीच त्यांना आवाज ऐकण्याची सवय लावल्यास ते बोलूही शकतात. त्यामुळे शालेय शिक्षणासाठी ते सामान्य मुलांच्या शाळेत सहज प्रवेश घेऊन त्यांच्याबरोबर शिकू शकतात. (प्रतिनिधी)मोठ्या आवाजाने घटतेय श्रवणक्षमता गेल्या काही वर्षांत शहरी भागात आवाजाच्या प्रदूषणात वाढ झालेली आहे. त्यामुळे निश्चितच त्याचा श्रवणक्षमतेवर परिणाम होताना दिसत आहे. श्रवणक्षमता घटत असल्याचे तरुणांमध्ये दिसून येत आहे. ट्रॅफिक पोलिसांमध्येदेखील सतत गाड्यांचे आवाज कानावर पडत असल्यामुळे श्रवणक्षमता कमी होते. औद्योगिक क्षेत्रात आवाजाची पातळी ८० डेसिबलपर्यंत असावी असा नियम आहे. पण, त्यापेक्षा मोठा आवाज सातत्याने होत राहिल्यास त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कानावर होऊ शकतो. त्याचप्रमाणे ड्रमचा आवाज हा ९० ते ९५ डेसिबल इतका असतो. सातत्याने चार तास हा आवाज कानावर पडल्यास कानांना इजा होऊ शकते. डीजेचा आवाज हा १०० डेसिबल इतका असतो. अर्धा तास हा आवाज ऐकल्यास श्रवणक्षमतेवर परिणाम होतो. मोठ्या आवाजात इअरफोनवर गाणी ऐकल्यामुळेही त्याचा परिणाम होत असल्याचे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. संजय छाब्रिया यांनी स्पष्ट केले.आवाजाचा अन्य अवयवांवरही परिणामसातत्याने मोठा आवाज कानावर पडत राहिल्यास त्याचा परिणाम फक्त श्रवणक्षमतेवर होत नाही; तर त्यामुळे रक्तदाब वाढतो. अनेकदा हृदयविकार होऊ शकतात, तर काहींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.