शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जादूटोणाविरोधी कायद्याची जनजागृती ठप्प, समिती कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 05:24 IST

जादूटोणाविरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी स्थापन केलेली समिती कागदावरच असून गेल्या तीन वर्षांपासून जनजागृतीचे कार्य ठप्प झाले आहे.

 - गणेश देशमुखमुंबई - जादूटोणाविरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी स्थापन केलेली समिती कागदावरच असून गेल्या तीन वर्षांपासून जनजागृतीचे कार्य ठप्प झाले आहे.अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा २० आॅगस्ट २०१३ रोजी पुण्यात निर्घृण खून झाल्यानंतर २० डिसेंबर २०१३ रोजी महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा लागू झाला. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि सर्वसामान्य जनतेला या कायद्याबाबत माहिती मिळावी, यासाठी सरकारने २०१४ साली जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार, प्रसार आणि अंमलबजावणी समितीची स्थापना केली. सामाजिक न्याय मंत्री या समितीचे अध्यक्ष असून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम मानव हे या समितीचे सहअध्यक्ष आहेत.समितीवर सोपविलेल्या जबाबदारीनुसार श्याम मानव यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण शिबिरे आणि व्याख्यानांतून शासकीय अधिकारी आणि नागरिकांचे प्रबोधन केले. यानंतर मात्र मागील तीन वर्षांत प्रबोधनाचे कार्य पूर्णत: ठप्प पडले आहे. या कायद्याबाबत पुरेशी जागृती नसल्यामुळे भोंदूबुवा-बाबांकडून फसवणूक झालेल्या महिला तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचे चित्र आहे.निधी जातो तरी कुठे?आघाडी सरकारने या समितीसाठी वार्षिक तीन कोटी रुपयांचा निधी दिला होता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी तो आकडा दहा कोटींपर्यंत वाढवू, असे आश्वासन समितीला दिले होते. मात्र निधीत वाढ झाली नाही. शिवाय, तीन कोटींचा निधी दरवर्षी समितीला मिळत असताना या निधीचा वापर कसा व कशासाठी होतो, हे एक कोडेच आहे.भ्रम निर्माण करणाऱ्या जाहिरातीशासनाच्या सामाजिक न्याय विभागाने बसगाडीच्या मागे जादूटोणाविरोधी कायद्याच्या जाहिराती केल्या. कायद्यात जे नाहीच तो मजकूर जाहिरातीत लिहिण्यात आल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.या कायद्याच्या प्रभावी जनजागृतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अनेकवेळा भेटलो. उत्तम कार्य करायचे आहे एवढेच ते बोलतात. कृती शून्य आहे. सामाजिक न्याय मंत्र्यांकडे तर वेळच नाही. प्रबोधन कार्य ठप्प पडल्याने कायदा निरुपयोगी ठरू लागला आहे.- श्याम मानव,जादूटोणाविरोधी कायद्याच्याप्रबोधन समितीचे सहअध्यक्षजादूटोणाविरोधी कायद्याच्या जागृतीचे काम बंद आहे असे म्हणता येणार नाही. निधी कमी-जास्त असू शकतो. श्याम मानव यांचे सहअध्यक्षपदच मला कळलेले नाही. त्यांना वृत्तपत्रातच जायचे असेल तर खुशाल जावे.- राजकुमार बडोले,सामाजिक न्यायमंत्री 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या