शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
3
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
4
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
5
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
6
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
7
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
8
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
9
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
10
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
11
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
12
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
13
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
14
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
15
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
16
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
17
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
18
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
19
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
20
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोणाविरोधी कायद्याची जनजागृती ठप्प, समिती कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 05:24 IST

जादूटोणाविरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी स्थापन केलेली समिती कागदावरच असून गेल्या तीन वर्षांपासून जनजागृतीचे कार्य ठप्प झाले आहे.

 - गणेश देशमुखमुंबई - जादूटोणाविरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी स्थापन केलेली समिती कागदावरच असून गेल्या तीन वर्षांपासून जनजागृतीचे कार्य ठप्प झाले आहे.अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा २० आॅगस्ट २०१३ रोजी पुण्यात निर्घृण खून झाल्यानंतर २० डिसेंबर २०१३ रोजी महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा लागू झाला. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि सर्वसामान्य जनतेला या कायद्याबाबत माहिती मिळावी, यासाठी सरकारने २०१४ साली जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार, प्रसार आणि अंमलबजावणी समितीची स्थापना केली. सामाजिक न्याय मंत्री या समितीचे अध्यक्ष असून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम मानव हे या समितीचे सहअध्यक्ष आहेत.समितीवर सोपविलेल्या जबाबदारीनुसार श्याम मानव यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण शिबिरे आणि व्याख्यानांतून शासकीय अधिकारी आणि नागरिकांचे प्रबोधन केले. यानंतर मात्र मागील तीन वर्षांत प्रबोधनाचे कार्य पूर्णत: ठप्प पडले आहे. या कायद्याबाबत पुरेशी जागृती नसल्यामुळे भोंदूबुवा-बाबांकडून फसवणूक झालेल्या महिला तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचे चित्र आहे.निधी जातो तरी कुठे?आघाडी सरकारने या समितीसाठी वार्षिक तीन कोटी रुपयांचा निधी दिला होता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांनी तो आकडा दहा कोटींपर्यंत वाढवू, असे आश्वासन समितीला दिले होते. मात्र निधीत वाढ झाली नाही. शिवाय, तीन कोटींचा निधी दरवर्षी समितीला मिळत असताना या निधीचा वापर कसा व कशासाठी होतो, हे एक कोडेच आहे.भ्रम निर्माण करणाऱ्या जाहिरातीशासनाच्या सामाजिक न्याय विभागाने बसगाडीच्या मागे जादूटोणाविरोधी कायद्याच्या जाहिराती केल्या. कायद्यात जे नाहीच तो मजकूर जाहिरातीत लिहिण्यात आल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.या कायद्याच्या प्रभावी जनजागृतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अनेकवेळा भेटलो. उत्तम कार्य करायचे आहे एवढेच ते बोलतात. कृती शून्य आहे. सामाजिक न्याय मंत्र्यांकडे तर वेळच नाही. प्रबोधन कार्य ठप्प पडल्याने कायदा निरुपयोगी ठरू लागला आहे.- श्याम मानव,जादूटोणाविरोधी कायद्याच्याप्रबोधन समितीचे सहअध्यक्षजादूटोणाविरोधी कायद्याच्या जागृतीचे काम बंद आहे असे म्हणता येणार नाही. निधी कमी-जास्त असू शकतो. श्याम मानव यांचे सहअध्यक्षपदच मला कळलेले नाही. त्यांना वृत्तपत्रातच जायचे असेल तर खुशाल जावे.- राजकुमार बडोले,सामाजिक न्यायमंत्री 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या