तरतुदींची पेरणी
By Admin | Updated: July 11, 2014 02:30 IST2014-07-11T02:30:08+5:302014-07-11T02:30:08+5:30
आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कृषी क्षेत्रसाठी ठोस दिशा न दाखविता तरतुदींची मात्र भरघोस पेरणी केली आहे.

तरतुदींची पेरणी
आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कृषी क्षेत्रसाठी ठोस दिशा न दाखविता तरतुदींची मात्र भरघोस पेरणी केली आहे.
किसान विकासपत्र
शेतक:यांना आर्थिक बचतीसाठी किसान विकास पत्र योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी शेतक:यांना किसान विकास पत्रमध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत अल्पभूधारकांना मदत होईल.
किसान टीव्ही
शेतीविषयी येणारे
नवे तंत्रज्ञान, संशोधन आणि विविध
योजनांची माहिती देणारे तसेच शेतक:यांचे प्रबोधन करण्यासाठी खास किसान टीव्ही
ही वाहिनी यावर्षीच सुरू करणार आहे.
8 लाख कोटींचे लक्ष्य
शेतक:यांना विविध अवजारे,
बी-बियाणो, शेतीच्या आधुनिकीकरणासाठी आणि शेतीचा कजर्पुरवठा यासाठी बँकांना 8 लाख कोटींचे लक्ष्य देण्यात आले आहे. यामुळे शेतीच्या विकासासह शेतक:याचे जीवनमानही उंचावेल, अशी अपेक्षा आहे. यात लघू पतपुरवठय़ाचा समावेश आहे.
नवी कृषी विद्यापीठे
देशात आणखी नवीन कृषी विद्यापीठे स्थापन करण्यात येणार आहेत. राजस्थान आणि आंध्र प्रदेशात कृषी विद्यापीठ, तर हरयाणा आणि तेलंगण राज्यात फलोत्पादनासाठी स्वतंत्र दोन विद्यापीठे स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे.
गंगा योजना
गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी नमामी गंगा योजना सुरू करणार असून, 2037 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय गंगाघाट दुरुस्तीसाठी 1क्क् कोटी विशेष प्राधिकरण स्थापन करण्यात येईल.
सिंचन योजना
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनाही सुरू करण्यात येणार आहे. यासाठी 1000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही तरतूद निव्वळ सिंचन प्रकल्पासाठी आहे. या योजनेतून विविध राज्यांतील प्रकल्पांना मदत.
शेतक:यांना सात टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. वेळेत कर्जाची फेड करणा:या शेतक:यांना तीन टक्के व्याजाची सूट देण्यात येणार आहे.
धान्याच्या वैज्ञानिक सुविधांसाठी गोदामे बांधण्यात येणार आहेत. यासाठी पाच हजार कोटींची तरतूद केली आहे. ईशान्य भारतात सेंद्रिय शेतीसाठी एक हजार कोटींची (1क् अब्ज) तरतूद केली आहे.