शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

सिंचनासाठी तरतूद असमाधानकारक

By admin | Updated: March 19, 2016 02:07 IST

केंद्रीय अर्थसंकल्पात सिंचनाचा व्यापक विचार करण्यात आल्यामुळे राज्य शासनही चौकटीच्या बाहेर जाऊन ठोस तरतूद करेल, अशी अपेक्षा होती. परंतु, राज्य शासनाने जलसिंचनासाठी केवळ

- अ‍ॅड. अनिल किलोर

केंद्रीय अर्थसंकल्पात सिंचनाचा व्यापक विचार करण्यात आल्यामुळे राज्य शासनही चौकटीच्या बाहेर जाऊन ठोस तरतूद करेल, अशी अपेक्षा होती. परंतु, राज्य शासनाने जलसिंचनासाठी केवळ ७ हजार ८५० कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे पुन्हा एकदा निराशा झाली. महाराष्ट्रात सर्वाधिक ४५२ सिंचन प्रकल्प आहेत. त्यात ७२ मोठे, ९७ मध्यम व २८३ लघू प्रकल्प आहेत. हे प्रकल्प वेगात पूर्ण करण्यासाठी दरवर्षी ३० हजार कोटी रुपयांची तरतूद करणे आवश्यक आहे. तेलंगणसारख्या नवीन राज्यात सिंचनासाठी २६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र सिंचनाबाबतचे उदासीन धोरण बदलविण्याचे धाडस कोणीच करीत नाही. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवर वेगवेगळ्या समित्यांनी दिलेल्या अहवालांत सिंचन अनुशेष दूर करण्याची शिफारस करण्यात आली होती. परिणामी राज्यात मोठ्या संख्येत सिंचन प्रकल्पांचे काम हातात घेण्यात आले. परंतु, दरवर्षीच्या अर्थसंकल्पात कमी तरतूद केली जात असल्यामुळे प्रकल्पांचे काम संथगतीने होत आहे. परिणामी प्रकल्पांच्या खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. १९८४ मध्ये गोसेखुर्द प्रकल्पाचा अपेक्षित खर्च ३७२ कोटी रुपये होता. २०१५ पर्यंत या प्रकल्पाची किंमत २० हजार कोटी रुपयांवर पोहोचली होती. १९८४ ते २०१५ पर्यंतच्या काळात या प्रकल्पाच्या किमतीत दर दिवशी पावणेदोन कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही पाहिजे त्या प्रमाणात सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली नाही. अशीच अवस्था राज्यातील अन्य प्रकल्पांची आहे. शासनाने सिंचन प्रकल्पासाठी दरवर्षी जेवढा निधी दिला, त्यापेक्षा जास्त किमतीचे टेंडर देण्यात आले. यामुळे कोणत्याही प्रकल्पाला निधीचे योग्य वाटप झाले नाही. आज राज्यातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एक लाख कोटी रुपयांची गरज आहे. (लेखक हे ‘जनमंच’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत.)