शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

एकल महिलांना रोहयोंतर्गत तात्काळ कामे उपलब्ध करून देणार- आ.डॉ. नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 19:40 IST

स्थलांतरीत कामगारांना गावी जाताना होणारे समस्या या व इतर समस्या सामाजिक संस्थाच्या प्रतिनिधी यांनी सरकारकडून समस्यांचे निर्मूलन होण्याबाबत मागणी केली होती. 

मुंबई :- कोरोनाच्या संसर्गामुळे महाराष्ट्र शासनाने पावसाळी अधिवेशन पुढे गेले आहे. परंतु सामाजिक स्तरावरील समस्याना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या काळात सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणात रिलीफचे काम करत आहेत. हे काम करत असताना निर्माण झालेल्या समस्यांबाबत महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी उपसभापती आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे मांडल्या होत्या. यात प्रामुख्याने रोहयो योजना, स्त्रियांच्या समस्या, स्थलांतरित कामगारांना कामे उपलब्ध होत नाहीत, स्थलांतरीत कामगारांना गावी जाताना होणारे समस्या या व इतर समस्या सामाजिक संस्थाच्या प्रतिनिधी यांनी सरकारकडून समस्यांचे निर्मूलन होण्याबाबत मागणी केली होती. 

कोरोनाच्या काळात प्रत्यक्षात भेट शक्य नसल्याने आ. डॉ. गोऱ्हे यांनी ऑनलाइन अधिवेशन घेण्याची कल्पना मांडली होती. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. यात आ.डॉ.गोऱ्हे यांनी १४ व्या वित्त आयोग, जिल्हा नियोजन व मनरेगा येथील निधीचे विनियोजन करण्यासाठी सामजिक संस्थांची मदत घेण्याची सूचना मांडली. एकल महिलांना तात्काळ जॉब कार्ड देऊन कामे देण्याची देखील सूचना केली. आंबेगाव, लातूर आणि शहादा येथे रोहयोचे कामे मागितल्यानंतर धमकवण्यात आले आहे त्याची चौकशी करून तेथील मजुरांना कामे देण्याची मागणी उपस्थित असलेल्या शासनाच्या अधिकार यांच्याकडे आ.डॉ.गोऱ्हे यांनी केली.या अधिवेशनात रोजगार हमी योजना, शिक्षण (ग्रामीण व शहरी), आरोग्य, महिला व बालकल्याणसह सामाजिक न्याय, उद्योजगता व शहरी रोजगार योजना,शेती व शेतकरी महिला व रेशन व कामगार या सात ही विषयावर सविस्तर चर्चा झाली. या विषयाच्या प्रश्नाचे सोडविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व हे प्रश्न मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व इतर मंत्री, सचिव यांच्याकडे आ. डॉ गोऱ्हे या संस्थांच्या मदतीने पाठपुरावा करण्याचे ठरले.  शाश्वत विकासातील १७ उद्दिष्टे बाबतही पर्यावरण विभागाच्या जिल्हानिहाय  आराखड्यात हे मुद्दे समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ठरले असल्याचे आ.डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. महाराष्ट्रात ३५० तालुक्यात ९४ लाख जॉब कार्ड वाटप करण्यात आले आहेत यात नोंदणीकृत २ कोटी २३ लाख मजूर आहेत. कार्यरत मजूर ५६ लाख आहेत. ३३ हजार १९८ रोहयोची कामे सुरू असून यात ५ लाख ३३ हजार  मजूर काम करत असल्याचे मनरेगा आयुक्त नायक यांनी सांगितले. तसेच प्रोत्साहन भत्ते मिळण्यात काही समस्या असतील तर ई-मेलच्या माध्यमातून तक्रार केल्यास त्याचे तात्काळ निवारण करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे काम मगितल्यानंतर काम मिळेल नाही तर मजुराला बेरोजगार भत्ता देण्यात येईल, असेही नायक यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे