शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

वाङ्मयचौर्य केल्याचे सिद्ध करा, लेखणी बंद करेन; ‘पानिपत’कार, साहित्यिक विश्वास पाटील यांनी दिले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 16:03 IST

मला कोल्हेकुईची फिकीर नाही..; ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून दिले आव्हान

सातारा : वाङ्मयचौर्याची राळ उठवणाऱ्यांमध्ये हिंमत असेल, भारताच्या कुठल्याही चौकात किंवा सभागृहात येण्याची माझी तयारी आहे. मी दहा हजार पानांचे साहित्य लिहिले आहे. मग, एक पॅरेग्राफ जरी कुठून घेतला असेल तर ते सिद्ध करावे. मी माझी लेखणी बंद करेन,’ असे आव्हान ‘पानिपत’कार व साहित्यिक विश्वास पाटील यांनी दिले.सातारा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ‘लोकमत’ कार्यालयातील संपादकीय सहकाऱ्यांशी पाटील यांनी सोमवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मोकळेपणाने गप्पा मारल्या. संमेलनाध्यक्षपदी निवडीनंतर त्यांच्यावर एका साहित्यिक वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्याविषयी त्यांनी आपली स्पष्ट भूमिका ‘लोकमत’च्या व्यासपीठावर मांडली.ते म्हणाले, ‘मी मोबाइलवर रील बनविण्यासाठी अभ्यास करीत नाही. मी ऐतिहासिक साहित्यावर लिहिताना त्या-त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेलो. ‘संभाजी’ कादंबरी लिहिण्यासाठी सहा वर्षे सह्याद्रीमध्ये प्रत्यक्ष फिरलो. संभाजी महाराज ज्या मार्गाने गेले, त्या भागात सलग २२ तास ३५ किलोमीटर पायपीट केली. त्यावेळी मला सह्याद्रीने इतिहास शिकवला.माझ्यावर बालिशपणाने राळ उठवणाऱ्यांनी रील करण्यापेक्षा फिरून दाखवावे. मी वाघ अन् सिंहाला भीत नाही, कारण ते समोरून वार करतात; पण उंदराला डोळे नसतात. तो कपाटात घुसून भारीतला भारी शालू कुरतडून टाकतो. त्याचप्रमाणे मी संमेलनाचा अध्यक्ष होणार, हे विरोधकांना कळाले. त्यानंतर आमच्या वारणेच्या खोऱ्यातील दोन उंदरांनी कोणत्याही पुराव्याशिवाय माझ्यावर राळ उठवण्यास सुरुवात केली, असे पाटील यांनी सांगितले.

साहित्यिकाला जात नसते..दुसऱ्या प्रांतातील एकाला कुणबी दाखला मिळाला; पण माझ्याकडे पुरावे असताना मला मिळाला नाही, असे मी म्हणालो होतो; परंतु माझ्यावर टपलेल्या त्या उंदरांनी शिताफीने मी जातीयवादी असल्याचा कट रचला; पण साहित्यिकाला जात नसते. त्याचा माणुसकी हा एकच धर्म असतो. तो माझ्या साहित्याच्या पानापानांतून वाचकांना दिसतो, असे पाटील म्हणाले.

मला कोल्हेकुईची फिकीर नाही..माझी अधिकारी म्हणून कारकीर्द साताऱ्यातून सुरू झाली. माझ्या कामकाजाविषयी चुकीची राळ उठवली जाते; पण आरोप असते तर मला शासनाने नोटीस दिली असती. पण, राळ उठवणाऱ्यांना बालिशपणाला मी काय उत्तर देणार, असा सवाल करीत पाटील म्हणाले, ‘माझ्या प्रशासकीय कारकिर्दीत मी साहित्य लिहिले; पण कोणत्याही रात्रीच्या पार्ट्या व क्लबला गेलो नाही. विदाऊट पे रजा घेऊन साहित्य लिहिले. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी मला साहित्य लिखाणासाठी नऊ महिने रजा दिली. मी माझे प्रमोशन नाकारले. त्यामुळे मला पेन्शनही कमी मिळाली. हवे असेल, तर विरोधकांनी माहितीच्या अधिकारात ती मिळवावी, असे आव्हान पाटील यांनी केले.