शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

महापुरुषांची बदनामी करणाऱ्या विकृत मनोवृत्तीचा संमेलनात निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 13:43 IST

साहित्य संमेलनात १८ ठराव मंजूर : गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा

राम शिनगारेभारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरीउदगीर (जि. लातूर) : ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, मातोश्री जिजाबाई आणि शाहू महाराज यांच्याविषयी बदनामीपर लेखन करणारे, व्यक्तिगत पातळीवर सभा-संमेलनात जाहीरपणे विकृत बुद्धीने बोलणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींचा तीव्र निषेध करीत असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मागील काळात राज्यपालांसह इतरांनी महापुरुषांवर टिप्पणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा ठराव घेण्यात आला.साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात अखिल भारतीय मराठी साहित्य  महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोदर मावजो यांच्यासमोरच मराठी भाषेची गोव्यात होत असलेली गळचेपी चिंताजनक असल्याचे सांगितले होते. यानंतर ठाले-पाटील यांनी समारोपात गोव्यात मराठी भाषिकांची संख्या अधिक असतानाही कोकणी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला. हा मराठी भाषिकांवरील अन्याय असून, तो गोवा सरकारने दूर करीत मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करणारा ठराव मांडला. त्यास बहुमताने मंजुरी देण्यात आली. हा ठराव गोवा शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. साहित्य संमेलनात एकूण १८ ठराव मंजूर केले. त्यात केंद्र शासनाने मराठी भाषेला तत्काळ अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, सीमाभागातील मराठी शाळा व महाविद्यालयांना महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदत करावी, कर्नाटकात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, गळचेपीचा निषेध, बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषेसाठी स्वतंत्र मराठी विभाग स्थापन करावा,  गोव्यात पणजीत अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र परिचय केंद्राचे पुनरुज्जीवन करावे आदी १८ ठराव मंजूर केले आहेत.

जेम्स लेनचा जाहीर निषेधब्रिटिश लेखक जेम्स लेन याने ‘शिवाजी हिंदू किंग इन मुस्लीम इंडिया’ या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराज आणि मातोश्री जिजामाता यांचा दुष्ट हेतूने अवमान केला. समस्त देशाला वंदनीय महापुरुषांवर हेतुतः बदनामीकारक लेखन करून समाजात असंतोष निर्माण केला. जेम्स लेनसह अशा तत्सम कुप्रवृत्तीच्या  निषेधाचा ठराव महामंडळाचे  डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी मांडला.

उदगीर जिल्ह्याची निर्मिती कराउदगीरची लोकसंख्या दीड लाख असून, शहरात बाजारपेठ, शैक्षणिक संस्था, जिल्ह्याची उपविभागीय कार्यालये असल्यामुळे जिल्हा करावा, उदगीर परिसरातील देवणी वळू देशभर परिचित असल्यामुळे येथे पशुवैद्यकीय विद्यापीठाची स्थापन करावी, उदगीर किल्ल्यास ‘अ’ दर्जा देण्याची मागणी करणारे ठराव मंजूर करण्यात आले.