शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

महापुरुषांची बदनामी करणाऱ्या विकृत मनोवृत्तीचा संमेलनात निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 13:43 IST

साहित्य संमेलनात १८ ठराव मंजूर : गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा

राम शिनगारेभारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरीउदगीर (जि. लातूर) : ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, मातोश्री जिजाबाई आणि शाहू महाराज यांच्याविषयी बदनामीपर लेखन करणारे, व्यक्तिगत पातळीवर सभा-संमेलनात जाहीरपणे विकृत बुद्धीने बोलणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींचा तीव्र निषेध करीत असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मागील काळात राज्यपालांसह इतरांनी महापुरुषांवर टिप्पणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा ठराव घेण्यात आला.साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात अखिल भारतीय मराठी साहित्य  महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोदर मावजो यांच्यासमोरच मराठी भाषेची गोव्यात होत असलेली गळचेपी चिंताजनक असल्याचे सांगितले होते. यानंतर ठाले-पाटील यांनी समारोपात गोव्यात मराठी भाषिकांची संख्या अधिक असतानाही कोकणी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला. हा मराठी भाषिकांवरील अन्याय असून, तो गोवा सरकारने दूर करीत मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करणारा ठराव मांडला. त्यास बहुमताने मंजुरी देण्यात आली. हा ठराव गोवा शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. साहित्य संमेलनात एकूण १८ ठराव मंजूर केले. त्यात केंद्र शासनाने मराठी भाषेला तत्काळ अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, सीमाभागातील मराठी शाळा व महाविद्यालयांना महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदत करावी, कर्नाटकात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, गळचेपीचा निषेध, बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषेसाठी स्वतंत्र मराठी विभाग स्थापन करावा,  गोव्यात पणजीत अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र परिचय केंद्राचे पुनरुज्जीवन करावे आदी १८ ठराव मंजूर केले आहेत.

जेम्स लेनचा जाहीर निषेधब्रिटिश लेखक जेम्स लेन याने ‘शिवाजी हिंदू किंग इन मुस्लीम इंडिया’ या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराज आणि मातोश्री जिजामाता यांचा दुष्ट हेतूने अवमान केला. समस्त देशाला वंदनीय महापुरुषांवर हेतुतः बदनामीकारक लेखन करून समाजात असंतोष निर्माण केला. जेम्स लेनसह अशा तत्सम कुप्रवृत्तीच्या  निषेधाचा ठराव महामंडळाचे  डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी मांडला.

उदगीर जिल्ह्याची निर्मिती कराउदगीरची लोकसंख्या दीड लाख असून, शहरात बाजारपेठ, शैक्षणिक संस्था, जिल्ह्याची उपविभागीय कार्यालये असल्यामुळे जिल्हा करावा, उदगीर परिसरातील देवणी वळू देशभर परिचित असल्यामुळे येथे पशुवैद्यकीय विद्यापीठाची स्थापन करावी, उदगीर किल्ल्यास ‘अ’ दर्जा देण्याची मागणी करणारे ठराव मंजूर करण्यात आले.