शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"शांततेत आंदोलन करा, हिंसाचाराला थारा नाही"; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 12:40 IST

बीडमधील जाळपाेळीची गंभीर दखल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात सुरू असलेल्या मराठा  आंदोलनादरम्यान काही ठिकाणी जाळपोळ झाली. त्याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. बीडमध्ये लोकप्रतिनिधींची घरे जाळण्यात आली. विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. लोक घरात असताना घरे जाळण्याचा प्रयत्न झाला. त्याचे व्हिडिओ पोलिसांकडे असून आतापर्यंत ५० ते ५५ जणांची ओळख पटविण्यात आली आहे. उर्वरित सगळ्यांची ओळख पटविण्यात येणार आहे. अशा आरोपींवर कलम ३०७ अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ओबीसी नेत्यांना सुरक्षा

काही ओबीसी नेत्यांना धमक्या आल्या आहेत. अशा धमक्या आल्या असतील किंवा कोणा ओबीसी नेत्यांना असुरक्षित जरी वाटत असेल तर त्यांना सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. सोशल मीडियावरून आलेल्या धमक्यांना देखील गांभीर्याने घेण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

आंदोलनावरून मंत्रिमंडळात चिंता

आंदोलनातील हिंसक प्रकारांबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. हे प्रकार काहीही करून थांबवा, असा आग्रह काही मंत्र्यांनी धरला. आंदोलनाची दिशा भरकटवली जात आहे, नेत्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. सरकार म्हणून ठोस भूमिका घेतली पाहिजे असे दोन ज्येष्ठ मंत्री म्हणाल्याचे समजते.

‘ते’ व्हिडीओ तपासणार

अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली असून ती आवश्यक त्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. जाळपोळीच्या घटनांमध्ये काही राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते यांचाही सहभाग असल्याचे लक्षात आले आहे. अशा ठिकाणचे व्हिडिओ तपासण्यात येत असून त्याची माहिती लवकरच देऊ असेही फडणवीस म्हणाले.

कोणाला मारून टाकण्याचा किंवा घरे, संपत्ती जाळण्याचा प्रकार झाल्यास पोलिस बघ्याची भूमिका घेणार नाहीत. शांततापूर्ण आंदोलने जरूर करावीत, मात्र महाराष्ट्रात हिंसेला अजिबात थारा देणार नाही.-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलBeedबीड