शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

शेतकरी लाभापासून वंचित, प्रकाश जाधव यांचा आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: July 2, 2016 21:04 IST

लाभार्थी ठरलेल्या गावातील शेतक-यांना या योजनांचा लाभ मिळावा, अन्यथा शिवसेना आक्रमक होऊन आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव यांनी दिला

ऑनलाइन लोकमत - 
नागपूर, दि. 02 - २०१४-१५ या वर्षात ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या क्षेत्रातील शेतक-यांसाठी अनेक सवलतीच्या योजना राज्य शासनाने लागू केल्या होत्या. मात्र योजनांच्या लाभापासून शेतकरी वंचित राहिल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. लाभार्थी ठरलेल्या गावातील शेतक-यांना या योजनांचा लाभ मिळावा, अन्यथा शिवसेना आक्रमक होऊन आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव यांनी दिला. 
 
शनिवारी पत्रकार परिषदेदरम्यान प्रकाश जाधव यांनी शासन व प्रशासनाच्या नियोजनावर टीका केली. सतत तीन वर्षाचा दुष्काळ लक्षात घेता पीडित गावांची नोंदणी करण्यात आली. त्यात ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या ११८६२ गावांची निवड करण्यात आली. या गावांसाठी विविध उपाययोजना लागू करण्यात आल्या. यामध्ये शेतीशी निगडित कर्जाची वसुली स्थगित करणे, सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन करणे, जमीन महसुलात सूट, कृषी पंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, शेती पंपाची वीज जोडणी व शेतक-यांना कर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय २२ एप्रिल २०१६ ला घेण्यात आला. मात्र हा निर्णय जाहीर होऊनही शेतकºयांच्या पदरात काहीच पडले नसल्याचा आरोप प्रकाश जाधव यांनी केला. विविध साधनांचा वापर करून या योजनांची प्रसिद्धी करणे गरजेचे होते. मात्र शासनाने शेतक-ना योजनांपासून डावलण्यासाठी प्रसिद्धीच केली नसल्याची टीका जाधव यांनी केली. सहकारी व राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकºयांना कर्ज मिळत नसून पीक विम्याच्या नावाखाली नियमबाह्य कपात केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 
 
राज्यात शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी शेतकºयांच्या हितासाठी पक्षाचे धोरण निश्चित आहे. शेतकºयांना योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी येत्या ५ जुलै रोजी संविधान चौक येथे धरणे आंदोलन केले जाईल, असे जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.