शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

शेतकरी लाभापासून वंचित, प्रकाश जाधव यांचा आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: July 2, 2016 21:04 IST

लाभार्थी ठरलेल्या गावातील शेतक-यांना या योजनांचा लाभ मिळावा, अन्यथा शिवसेना आक्रमक होऊन आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव यांनी दिला

ऑनलाइन लोकमत - 
नागपूर, दि. 02 - २०१४-१५ या वर्षात ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या क्षेत्रातील शेतक-यांसाठी अनेक सवलतीच्या योजना राज्य शासनाने लागू केल्या होत्या. मात्र योजनांच्या लाभापासून शेतकरी वंचित राहिल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. लाभार्थी ठरलेल्या गावातील शेतक-यांना या योजनांचा लाभ मिळावा, अन्यथा शिवसेना आक्रमक होऊन आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव यांनी दिला. 
 
शनिवारी पत्रकार परिषदेदरम्यान प्रकाश जाधव यांनी शासन व प्रशासनाच्या नियोजनावर टीका केली. सतत तीन वर्षाचा दुष्काळ लक्षात घेता पीडित गावांची नोंदणी करण्यात आली. त्यात ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या ११८६२ गावांची निवड करण्यात आली. या गावांसाठी विविध उपाययोजना लागू करण्यात आल्या. यामध्ये शेतीशी निगडित कर्जाची वसुली स्थगित करणे, सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन करणे, जमीन महसुलात सूट, कृषी पंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, शेती पंपाची वीज जोडणी व शेतक-यांना कर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय २२ एप्रिल २०१६ ला घेण्यात आला. मात्र हा निर्णय जाहीर होऊनही शेतकºयांच्या पदरात काहीच पडले नसल्याचा आरोप प्रकाश जाधव यांनी केला. विविध साधनांचा वापर करून या योजनांची प्रसिद्धी करणे गरजेचे होते. मात्र शासनाने शेतक-ना योजनांपासून डावलण्यासाठी प्रसिद्धीच केली नसल्याची टीका जाधव यांनी केली. सहकारी व राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकºयांना कर्ज मिळत नसून पीक विम्याच्या नावाखाली नियमबाह्य कपात केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 
 
राज्यात शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी शेतकºयांच्या हितासाठी पक्षाचे धोरण निश्चित आहे. शेतकºयांना योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी येत्या ५ जुलै रोजी संविधान चौक येथे धरणे आंदोलन केले जाईल, असे जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.