शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

सरकारी खरेदीअभावी कोसळले तुरीचे भाव!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 06:29 IST

तूर बाजारात आली तरी नाफेडची खरेदी केंद्रे राज्यात सुरू झाली नसल्याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी क्विंटलमागे एकहजार ते बाराशे रुपये कमी दरात सगळीकडे खरेदी सुरू केली

मुंबई : तूर बाजारात आली तरी नाफेडची खरेदी केंद्रे राज्यात सुरू झाली नसल्याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी क्विंटलमागे एकहजार ते बाराशे रुपये कमी दरात सगळीकडे खरेदी सुरू केली असून त्यामुळे शेतकºयांची लूट होत आहे.केंद्र्र सरकारने यंदा तुरीची आधारभूत किंमत क्विंटलमागे ५ हजार ६७५ रुपये इतकी निश्चित केली आहे. मात्र आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी नाफेडची केंद्रे सुरू झालेली नाहीत. राज्याच्या पणन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले की तूर खरेदी सुरू करावी, असा प्रस्ताव विभागाकडून १५ दिवसांपूर्वीच केंद्र सरकारला पाठविला आहे. केंद्राने प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही.आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी करणाºया व्यापाºयांवर कारवाई करण्याचे आश्वासन मध्यंतरी सरकारने दिले होते. मात्र, व्यापारी सध्या ४५०० ते ४८०० रुपये दराने बिनबोभाटपणे खरेदी करीत आहेत. तूर साधारणत: डिसेंबरमध्ये बाजारात येते हे वर्षानुवर्षे माहिती असतानाही नाफेडची खरेदी केंद्रे जानेवारीअखेर वा फेब्रुवारीअखेर सुरू केली जातात.दरम्यान, तुरीला यावर्षी ५,६७५ रुपये हमीदर जाहीर करण्यात आला आहे; पण खरेदी केंद्रच सुरू झाले नसल्याने या दराचे करायचे काय, असा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.मुद्दाम विलंब केल्याचा शेतकºयांचा आरोपगेल्यावेळी १ फेब्रुवारी ते १५ जून २०१८ दरम्यान नाफेडने एकूण ३३ लाख ६५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली होती. यंंदा त्याच्या आधीच खरेदी सुरू होईल, असा विश्वास पणन विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला. नाफेडवर खरेदीचा बोजा येऊ नये म्हणून मुद्दाम खरेदी विलंबाने सुरू केली जाते, असा शेतकºयांचा आरोप आहे.तुरीला हमीभावापेक्षा कमी दर : यावर्षी तुरीचे उत्पादन घटले असून, बाजारात तुरीचे दर सध्या सरासरी प्रतिक्ंिवटल ४,४०० रुपये आहेत. हमीदरापेक्षा हे दर १,२७५ रुपयांनी कमी आहेत.

टॅग्स :agricultureशेती