शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

सरकारी खरेदीअभावी कोसळले तुरीचे भाव!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 06:29 IST

तूर बाजारात आली तरी नाफेडची खरेदी केंद्रे राज्यात सुरू झाली नसल्याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी क्विंटलमागे एकहजार ते बाराशे रुपये कमी दरात सगळीकडे खरेदी सुरू केली

मुंबई : तूर बाजारात आली तरी नाफेडची खरेदी केंद्रे राज्यात सुरू झाली नसल्याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी क्विंटलमागे एकहजार ते बाराशे रुपये कमी दरात सगळीकडे खरेदी सुरू केली असून त्यामुळे शेतकºयांची लूट होत आहे.केंद्र्र सरकारने यंदा तुरीची आधारभूत किंमत क्विंटलमागे ५ हजार ६७५ रुपये इतकी निश्चित केली आहे. मात्र आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी नाफेडची केंद्रे सुरू झालेली नाहीत. राज्याच्या पणन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले की तूर खरेदी सुरू करावी, असा प्रस्ताव विभागाकडून १५ दिवसांपूर्वीच केंद्र सरकारला पाठविला आहे. केंद्राने प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही.आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी करणाºया व्यापाºयांवर कारवाई करण्याचे आश्वासन मध्यंतरी सरकारने दिले होते. मात्र, व्यापारी सध्या ४५०० ते ४८०० रुपये दराने बिनबोभाटपणे खरेदी करीत आहेत. तूर साधारणत: डिसेंबरमध्ये बाजारात येते हे वर्षानुवर्षे माहिती असतानाही नाफेडची खरेदी केंद्रे जानेवारीअखेर वा फेब्रुवारीअखेर सुरू केली जातात.दरम्यान, तुरीला यावर्षी ५,६७५ रुपये हमीदर जाहीर करण्यात आला आहे; पण खरेदी केंद्रच सुरू झाले नसल्याने या दराचे करायचे काय, असा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.मुद्दाम विलंब केल्याचा शेतकºयांचा आरोपगेल्यावेळी १ फेब्रुवारी ते १५ जून २०१८ दरम्यान नाफेडने एकूण ३३ लाख ६५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली होती. यंंदा त्याच्या आधीच खरेदी सुरू होईल, असा विश्वास पणन विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला. नाफेडवर खरेदीचा बोजा येऊ नये म्हणून मुद्दाम खरेदी विलंबाने सुरू केली जाते, असा शेतकºयांचा आरोप आहे.तुरीला हमीभावापेक्षा कमी दर : यावर्षी तुरीचे उत्पादन घटले असून, बाजारात तुरीचे दर सध्या सरासरी प्रतिक्ंिवटल ४,४०० रुपये आहेत. हमीदरापेक्षा हे दर १,२७५ रुपयांनी कमी आहेत.

टॅग्स :agricultureशेती