शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

जळगावला अमृत योजनेतून भूमिगत केबलचा प्रस्ताव

By admin | Updated: August 17, 2016 22:46 IST

शहरात महावितरणच्या वीज वाहिन्यांची केबल मनपाच्या ‘अमृत’ योजनेतील भूमिगत गटारींच्या कामा बरोबरच भूमिगत करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी आठ कोटींचा खर्च अपेक्षित आहे

उर्जा राज्यमंत्र्यांचे आदेश: आठ कोटींच्या खर्चासाठी पाठपुरावा करणारजळगाव : शहरात महावितरणच्या वीज वाहिन्यांची केबल मनपाच्या ‘अमृत’ योजनेतील भूमिगत गटारींच्या कामा बरोबरच भूमिगत करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी आठ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या कामासंदर्भात बुधवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा होऊन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती उर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

राज्याचे उर्जा, पर्यटन, अन्न व औषध प्रशासन व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार हे जिल्हा दौऱ्यावर आले होते. १८८४ कोटींची थकबाकी

जळगाव परिमंडळांतर्गत असलेल्या जळगाव, धुळे व नंदुबार जिल्ह्यातील वीज थकबाकी २,४३६ कोटींची आहे. यात वीज पंप (ए.जी. पंप) थकबाकी सर्वाधिक आहे. जवळपास १८८४ कोटींची ही थकबाकी आहे. यात जळगाव जिल्ह्याचा वाटा सर्वाधिक म्हणजे ५० टक्के, धुळे ३० तर नंदुरबार २० टक्के वाटा आहे. वसूली कमी असल्याचे येरावार म्हणाले. वीज पंप कनेक्शनची मागणी

थकबाकी जास्त असतानाही जळगाव परिमंडळात अद्याप १६ हजार १४६ कृषि पंप वीज कनेक्शनच्या प्रतिक्षेत आहे. यासाठी ७५ कोटींच्या निधीची गरज आहे. परिमंडळातील जळगाव जिल्ह्यातून ही मागणी ८,७०३, धुळे ४,५०४ तर नंदुरबार जिल्ह्यातून २,९३९ कृषि पंपांना वीज कनेक्शन मिळावे अशी मागणी आहे. यासाठीच्या निधीसाठी महावितरणचे मुख्य अभियंता जे.एम.पारधे यांनी अहवाल दिला असल्याचे येरावार यांनी सांगितले. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल असेही ते म्हणाले. १२ कोटींचा निधी गेला होत परत

यापूर्वी महावितरणकडून जळगाव शहरातील प्रमुख बाजारपेठा, मुख्य रस्त्यांवरील वीज वितरणाची व्यवस्था भूमिगत पद्धतीने करण्याचे प्रस्तावित होते. त्यासाठी महावितरकडून जवळपास १२ कोटींच्या जवळपास प्रस्ताव पाठवून मंजूर करून घेण्यात आला होता. या कामासाठी निधीही मंजूर होऊन प्राप्त झाला होता. मात्र शहराचे दुर्दैव असे की त्यावेळी शहरातील महावितरणचे कामकाज त्यावेळी क्रॉम्प्टनकडे देण्यात आले होते. देखभाल व दुरूस्तीची कामे या कंपनीकडे असल्याने महावितरणचा भूमिगत केबलिंगचा प्रस्ताव त्यावेळी बारगळला. आता तोच प्रस्ताव ‘अमृत’ योजनेच्या कामाबरोबर प्रस्तावित होण्याच्या हालचाली सुरू झाल्याने शहरासाठी हा एक चांगला निर्णय ठरणार आहे.