शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील प्रत्येक विमानतळाच्या १०० किमी परिघात हेलिपॅड उभारण्याचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 03:06 IST

अपघात, वैद्यकीय आणीबाणीच्या किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी तातडीने विविध सुविधा उपलब्ध होण्यासाठी हवाई मार्गाने जोडले जाणे गरजेचे आहे.

- खलील गिरकर मुंबई : राज्यातील नागरिकांना आणीबाणीच्या वेळी प्रसंगी हवाई सेवा उपलब्ध होण्यासाठी दीड ते दोन तासांपेक्षा जास्त प्रवास करावा लागू नये, यासाठी प्रत्येक विमानतळाच्या १०० किमीच्या परिघात किमान एक हेलिपॅड उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबवण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी ‘लोकमत’ला दिली.अपघात, वैद्यकीय आणीबाणीच्या किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी तातडीने विविध सुविधा उपलब्ध होण्यासाठी हवाई मार्गाने जोडले जाणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यात विमानतळाच्या परिघातील मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड किंवा हेलिपोर्ट उभारण्याचा एमएडीसीचा विचार आहे. मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात नवीन हेलिपॅड उभारण्यासाठी कंपनीने इच्छुकांकडून प्रस्ताव मागवले होते. सागरी मार्ग न्यायालयीन प्रक्रियेत अडकला असल्याने एमएमआरडीएने विरार-अलिबाग कॉरिडॉरमध्ये याबाबत तरतूद करून त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्याचे ठरवले आहे, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.सिंधुदुर्ग विमानतळ मार्चपर्यंत सुरू होणार२०१६ पर्यंत राज्यात मुंबई, नागपूर, पुणे व औरंगाबादला विमानतळ कार्यरत होते. तीन वर्षांत राज्यात शिर्डी, जळगाव, नाशिक, कोल्हापूर व नांदेड येथे विमानतळ कार्यान्वित करण्यात यश आले. पुढील पाच वर्षांत आणखी सहा विमानतळे कार्यान्वित करण्याचे ध्येय असून ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती काकाणी यांनी दिली. त्यापैकी सिंधुदुर्ग येथील विमानतळ (चिपी) मार्च २०२० पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी आॅगस्टपर्यंत अमरावती, त्यानंतर पुरंदर, चंद्रपूर, नवी मुंबई, रत्नागिरी विमानतळाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.