शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील प्रत्येक विमानतळाच्या १०० किमी परिघात हेलिपॅड उभारण्याचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 03:06 IST

अपघात, वैद्यकीय आणीबाणीच्या किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी तातडीने विविध सुविधा उपलब्ध होण्यासाठी हवाई मार्गाने जोडले जाणे गरजेचे आहे.

- खलील गिरकर मुंबई : राज्यातील नागरिकांना आणीबाणीच्या वेळी प्रसंगी हवाई सेवा उपलब्ध होण्यासाठी दीड ते दोन तासांपेक्षा जास्त प्रवास करावा लागू नये, यासाठी प्रत्येक विमानतळाच्या १०० किमीच्या परिघात किमान एक हेलिपॅड उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबवण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी ‘लोकमत’ला दिली.अपघात, वैद्यकीय आणीबाणीच्या किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी तातडीने विविध सुविधा उपलब्ध होण्यासाठी हवाई मार्गाने जोडले जाणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यात विमानतळाच्या परिघातील मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड किंवा हेलिपोर्ट उभारण्याचा एमएडीसीचा विचार आहे. मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात नवीन हेलिपॅड उभारण्यासाठी कंपनीने इच्छुकांकडून प्रस्ताव मागवले होते. सागरी मार्ग न्यायालयीन प्रक्रियेत अडकला असल्याने एमएमआरडीएने विरार-अलिबाग कॉरिडॉरमध्ये याबाबत तरतूद करून त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्याचे ठरवले आहे, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.सिंधुदुर्ग विमानतळ मार्चपर्यंत सुरू होणार२०१६ पर्यंत राज्यात मुंबई, नागपूर, पुणे व औरंगाबादला विमानतळ कार्यरत होते. तीन वर्षांत राज्यात शिर्डी, जळगाव, नाशिक, कोल्हापूर व नांदेड येथे विमानतळ कार्यान्वित करण्यात यश आले. पुढील पाच वर्षांत आणखी सहा विमानतळे कार्यान्वित करण्याचे ध्येय असून ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती काकाणी यांनी दिली. त्यापैकी सिंधुदुर्ग येथील विमानतळ (चिपी) मार्च २०२० पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी आॅगस्टपर्यंत अमरावती, त्यानंतर पुरंदर, चंद्रपूर, नवी मुंबई, रत्नागिरी विमानतळाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.