शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

लाचखोरांची मालमत्ता गोठविण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: March 31, 2015 03:33 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेल्या लाचखोरांच्या चौकशीप्रकरणी राज्यातील विविध सरकारी विभागांतील ३० जणांची ३४ कोटींची अपसंपदा गोठविण्यासाठीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे.

जळगाव : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेल्या लाचखोरांच्या चौकशीप्रकरणी राज्यातील विविध सरकारी विभागांतील ३० जणांची ३४ कोटींची अपसंपदा गोठविण्यासाठीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे.एसीबीने महसूल, सार्वजनिक बांधकाम, महानगरपालिका, समाजकल्याण, पाटबंधारे, जिल्हा परिषद, शिक्षण, विक्रीकर, आरोग्य आदी विभांगातील लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांंच्या अपसंपदेची चौकशी सुरू केली आहे. महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागात सर्वाधिक भ्रष्टाचारी अधिकारी आढळले आहेत. महसूल विभागातील एकूण आठ प्रकरणांमध्ये तीन कोटी ७१ लाख ७८ हजार ६०३, तर सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच प्रकरणांमध्ये तीन कोटी ६१ लाख ८१ हजार ३४१ रुपयांची मालमत्ता गोठविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.नोंदणी विभागातील एका प्रकरणाची चौकशी सुरूअसून, त्यात तब्बल २० कोटी १४ लाख ७३ हजार ६९५ रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची विनंती शासनाकडे केली आहे. वक्फ बोर्डाच्या एका प्रकरणात तीन कोटी ७ लाख ४९ हजार ३४० रुपयांची मालमत्ता गोठविण्याची शिफारस आहे.जळगावमध्ये दोन जणांच्या मालमत्ता गोठविण्याच्या हालचाली सुरूआहेत. भडगाव तालुक्यातील आश्रमशाळेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर त्यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे. दोन्ही प्रकरणांतील आरोपींना मालमत्तेची विक्री करण्याची परवानगी देऊ नये, अशी विनंती एसीबीने न्यायालयाकडे केली आहे. (प्रतिनिधी)