शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राष्ट्रीय कृषी बाजाराला जोडण्यासाठी ६२ बाजार समित्यांचा केंद्राकडे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 15:11 IST

देशभरातील मार्केटमध्ये आॅनलाईन खरेदीविक्री करण्यासाठी ई-नाम; महाराष्टÑातील ६३ बाजार समित्यांचा समावेश

ठळक मुद्देमहाराष्ट्रात पणन मंडळ ाच्या अखत्यारित ३०७ बाजार समित्या कार्यरत आतापर्यंत दोन टप्प्यात ६० बाजार समित्या या प्रणालीशी जोडलेल्या आहेत‘आकांक्षी’ प्रकल्पातून मागास जिल्'ातील तीन बाजार समित्यांचाही यामध्ये समावेश

अरुण बारसकर 

सोलापूर: कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील जुन्या पद्धतीचे कामकाज आता कालबाह्य झाले असून, केंद्र सरकारने आता  देशभरातील मार्केटमध्ये आॅनलाईन खरेदीविक्री करण्यासाठी ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) प्रणाली विकसित केली आहे. १६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ५८५ बाजार समित्या या प्रणालीला जोडल्या असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ६३ बाजार समित्यांचा समावेश आहे. शिवाय राज्यातील आणखी ६२ बाजार समित्यांचा यामध्ये  समावेश करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. 

महाराष्ट्रात  पणन मंडळ ाच्या अखत्यारित ३०७ बाजार समित्या कार्यरत आहेत. शेतकºयांचा शेतीमाल देशभरात कोणालाही खरेदी करता यावा व यातून शेतकºयांना चांगला दर मिळावा  या उद्देशाने  ई-नाम प्रणाली अवलंबली जाते. आतापर्यंत दोन टप्प्यात ६० बाजार समित्या या प्रणालीशी जोडलेल्या आहेत.  याशिवाय विशेष बाब म्हणून  ‘आकांक्षी’ प्रकल्पातून मागास जिल्'ातील तीन बाजार समित्यांचाही यामध्ये समावेश केला आहे.  या  प्रक्रियेला जोडलेल्या  राज्यातील ६३ बाजार  समित्यांमध्ये आॅनलाईन ई ट्रेडिंग सुरू झाले आहे. असे असतानाच नव्याने ६२ बाजार समित्यांचा प्रस्ताव राज्य पणन मंडळाने केंद्राला सादर केला आहे.  ई-नाम प्रणालीनुसार बाजार समित्यांचे कामकाज केल्यास पारदर्शकता येणार असल्याचे सांगितले जाते.

 ई-नामची सद्यस्थिती

  • - ६० बाजार समित्यांमध्ये ई-आॅक्शन(ई-लिलाव) द्वारे ७७.०९ लाख क्विंटल शेतीमालाची विक्री, शेतीमालाच्या विक्रीतून २११६ कोटी रुपयांची उलाढाल झाली. - ६० बाजार समित्यांमध्ये शेतीमाल गुणवत्ता तपासणी लॅब कार्यरत असून, त्यापैकी ५७ बाजार समित्यांमध्ये ३.२४ लाख लॉटची तपासणी झाली. 
  • - ३३ बाजार समित्यांनी शेतीमालाचे ई-पेमेंट केले असून, ई-पेमेंटद्वारे ५६.३७ कोटी रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले.
  • - ११.८४ लाख शेतकºयांची ई-नाम प्रणालीमध्ये नोंदणी झाली.
  • - १६४४४ व्यापारी तर १३ हजार ३९९ अडत्यांनी ई-नाम प्रणालीनुसार शेतीमाल खरेदी-विक्रीसाठी नोंदणी केली.
  • - शेती उत्पादक २०५ कंपन्यांनी ई-नामसाठी नोंदणी केली.

सोलापूरच्या ६ बाजार समित्याच्जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात बार्शी व दुसºया टप्प्यात सोलापूर बाजार समितीचा समावेश झाला आहे. नव्याने दुधनी, पंढरपूर, सांगोला, करमाळा, मंगळवेढा अकलूज या सहा बाजार समित्यांचा प्रस्ताव केंद्राकडे गेला आहे. केंद्राने मंजुरी दिल्यास जिल्ह्यातील ८ बाजार समित्यांचे कामकाज ई-नाम प्रणालीनुसार चालणार आहे.

ई-नाम प्रणालीमुळे शेतीमालाची शेतकºयांकडून होणारी पैशाची कपात कमी होईल. शेतकºयांना तत्काळ पैसे मिळतील. स्पर्धा वाढल्याने दर चांगले मिळतील. संचालक मंडळाने चांगल्या पद्धतीने ही प्रणाली राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. यात शेतकरी, अडते, व्यापारी व बाजार समित्यांचे हित आहे.- सुनील पवार, कार्यकारी संचालक, राज्य पणन मंडळ 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजारCentral Governmentकेंद्र सरकारagricultureशेतीFarmerशेतकरी