शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

सनातन संस्थेवर बंदीचा प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन- गृहराज्यमंत्री केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 06:53 IST

नातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधिन असून त्यातील त्रुटींची पूर्तता राज्य सरकारने केली आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी सोमवारी ‘लोकमत’ला दिली.

मुंबई : सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधिन असून त्यातील त्रुटींची पूर्तता राज्य सरकारने केली आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी सोमवारी ‘लोकमत’ला दिली.अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेले डॉ. विरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा थेट सनातनशी संबंध असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे सनातनवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. कर्नाटक एटीएसने कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कारवाई केल्यानंतर महाराष्टÑ एटीएसला जाग आली, असा आरोप काँग्रेसने केला आहे.केसरकर म्हणाले, बंदीचा प्रस्ताव हा आघाडी सरकारच्या काळातच केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेला होता. त्या बाबत गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारकडून वेळोवेळी काही मुद्दे उपस्थित करण्यात आले व त्या बाबतची विचारणा राज्य सरकारकडे करण्यात आली. बंदीच्या प्रस्तावास पूरक अशी माहिती राज्याने पाठविलेली आहे. नवीन प्रस्ताव पाठविण्याची आवश्यकता नाही. सनातनवर बंदी घालण्याची आमच्या सरकारचीदेखील भूमिका आहे.सनातन संस्थेवर बंदी घालण्याचे प्रस्ताव २००८ आणि २०११ मध्ये तत्कालिन आघाडी सरकारने केंद्राकडे पाठविले होते. तथापि, ते दोन्ही प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाने अमान्य केले होते. राज्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मात्र आघाडी सरकारच्या काळातील प्रस्तावावर आजही केंद्राकडे असून त्यावर वेळोवेळी मागविण्यात आलेली माहिती आम्ही पुरवित असतो, असे स्पष्ट केले.हिंदुत्ववादी संघटना म्हणून सनातनला आमचे सरकार पाठीशी घालत असल्याचा विरोधकांचा आरोप निराधार आहे. तसे असते तर एवढ्या अटक कशा झाल्या असत्या? आता जे काही समोर आले आहे त्याचे मुख्य श्रेय हे महाराष्ट्र एटीएसचे आहे. - दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र