शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

सनातन संस्थेवर बंदीचा प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन- गृहराज्यमंत्री केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 06:53 IST

नातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधिन असून त्यातील त्रुटींची पूर्तता राज्य सरकारने केली आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी सोमवारी ‘लोकमत’ला दिली.

मुंबई : सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधिन असून त्यातील त्रुटींची पूर्तता राज्य सरकारने केली आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी सोमवारी ‘लोकमत’ला दिली.अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेले डॉ. विरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा थेट सनातनशी संबंध असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे सनातनवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. कर्नाटक एटीएसने कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कारवाई केल्यानंतर महाराष्टÑ एटीएसला जाग आली, असा आरोप काँग्रेसने केला आहे.केसरकर म्हणाले, बंदीचा प्रस्ताव हा आघाडी सरकारच्या काळातच केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेला होता. त्या बाबत गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारकडून वेळोवेळी काही मुद्दे उपस्थित करण्यात आले व त्या बाबतची विचारणा राज्य सरकारकडे करण्यात आली. बंदीच्या प्रस्तावास पूरक अशी माहिती राज्याने पाठविलेली आहे. नवीन प्रस्ताव पाठविण्याची आवश्यकता नाही. सनातनवर बंदी घालण्याची आमच्या सरकारचीदेखील भूमिका आहे.सनातन संस्थेवर बंदी घालण्याचे प्रस्ताव २००८ आणि २०११ मध्ये तत्कालिन आघाडी सरकारने केंद्राकडे पाठविले होते. तथापि, ते दोन्ही प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाने अमान्य केले होते. राज्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मात्र आघाडी सरकारच्या काळातील प्रस्तावावर आजही केंद्राकडे असून त्यावर वेळोवेळी मागविण्यात आलेली माहिती आम्ही पुरवित असतो, असे स्पष्ट केले.हिंदुत्ववादी संघटना म्हणून सनातनला आमचे सरकार पाठीशी घालत असल्याचा विरोधकांचा आरोप निराधार आहे. तसे असते तर एवढ्या अटक कशा झाल्या असत्या? आता जे काही समोर आले आहे त्याचे मुख्य श्रेय हे महाराष्ट्र एटीएसचे आहे. - दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र