शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पुनर्वसनाने दिली नक्षलींच्या आत्मसमर्पण योजनेला गती

By admin | Updated: October 13, 2015 02:54 IST

जंगलातील नक्षली जीवनाला कंटाळून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होणाऱ्यांचे पुनर्वसन वेगवान पद्धतीने करण्यावर गडचिरोली पोलिसांनी भर दिल्याने

गडचिरोली : जंगलातील नक्षली जीवनाला कंटाळून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होणाऱ्यांचे पुनर्वसन वेगवान पद्धतीने करण्यावर गडचिरोली पोलिसांनी भर दिल्याने, अनेक आत्मसमर्पित नक्षलवादी आता भाजी दुकानदार, चहाविक्रेते, सायकल दुरुस्ती, नळ फिटिंग करण्याचा व्यवसाय करताना दिसत आहेत. पुनर्वसन योजनेमुळे त्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.२९ आॅगस्ट २००५पासून राज्यात नक्षल आत्मसमर्पण योजना लागू झाली. सुरुवातीला पुनर्वसन कार्यक्रम थंड बस्त्यात होता. त्यामुळे त्याकडे नक्षलवादी आकर्षित झाले नव्हते. गेल्या चार-पाच वर्षांत पुनर्वसन कार्यक्रमाला गती देण्यात आली व नक्षल आत्मसमर्पण योजनेचा चेहरामोहरा बदलला. आता आत्मसमर्पणासाठी मोठी यादीच पोलिसांकडे आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, त्या माध्यमातून अनेक नक्षलवादी आत्मसमर्पणासाठी तयार झाले आहेत. नक्षलवाद्यांविरुद्ध पोलीस सर्वच आघाड्यांवर लढत असल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. परिणामी, दलममधून आत्मसमर्पण करणाऱ्यांचा ओघ वाढत आहे. १० वर्षांत ४८३ नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस प्रशासनासमोर आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहाकडे वाटचाल केली आहे. नक्षल चळवळीत भरकटलेला आदिवासी बांधव लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात येत आहे. दलम सदस्य व जहाल नक्षलवादी मदनअय्या उर्फ बालना बलय्या याने आत्मसमर्पण केल्यानंतर, आतापर्यंत एक स्टेट झोनल कमिटी सदस्य, सहा डिव्हिजनल कमिटी सदस्य, १६ कमांडर, २४ उपकमांडर, २१८ दलम सदस्य, ११० क्षेत्रीय/ग्रामरक्षक दल सदस्य, १२७ संगम सदस्य यांनी नवा मार्ग निवडला. २०१३मध्ये सर्वाधिक ११ नक्षल जोडप्यांनी आत्मसमर्पण केले.