शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

खासगीकरणाची 'लाइन कट', फडणवीसांच्या आश्वासनानंतर वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 06:18 IST

वीज कंपन्यांना समांतर वीज परवाना देऊ नये म्हणून सरकार ठामपणे आपली बाजू वीज नियामक आयोगाकडे मांडेल, असा शब्दही त्यांनी दिल्यानंतर ३२ वीज संघटनांनी संप मागे घेण्याची घोषणा केली.

मुंबई : तिन्ही सरकारी वीज कंपन्यांचे खासगीकरण केले जाणार नाही. उलट, पुढील तीन वर्षांत सरकारी वीज कंपनीत ५० हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कर्मचारी संघटनांना दिली. वीज कंपन्यांना समांतर वीज परवाना देऊ नये म्हणून सरकार ठामपणे आपली बाजू वीज नियामक आयोगाकडे मांडेल, असा शब्दही त्यांनी दिल्यानंतर ३२ वीज संघटनांनी संप मागे घेण्याची घोषणा केली.

राज्य सरकारच्या मालकीच्या वीज कंपन्यांचे खासगीकरण आणि अदानी वीज कंपनीला महावितरणच्या कार्यक्षेत्रात वीज वितरणाचा समांतर परवाना देण्याच्या धोरणाविरोधात राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीने तीन दिवसांचा राज्यव्यापी संप पुकारला होता. बुधवारी संपाच्या पहिल्याच दिवशी वीज वितरण व्यवस्था अनेक ठिकाणी कोलमडली. मुंबईत सह्याद्री अतिथिगृहावर फडणवीस आणि संपकरी संघटनांच्या नेत्यांच्या दोन बैठकांनंतर संप मागे घेण्यात आला.

समांतर खासगी परवानाही रोखणार■ अदानी वीज कंपनीने महावितरणचे महसुली कार्यक्षेत्र असलेल्या नवी मुंबई, ठाणे परिसरात वीज वितरण करण्यासाठी समांतर खासगी परवाना मिळावा म्हणून राज्य वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) केलेला अर्जही कारणीभूत ठरला आहे. यावरही फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.जेव्हा एमईआरसी याबाबत अधिसूचना काढेल, त्यावेळी असा परवाना देऊ नये म्हणून सरकार ठामपणे आपली बाजू मांडेल. सरकारकडील आयुधांचा वापर करून समांतर खासगी परवाना रोखला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

बैठकीत सरकारने दिलेली आश्वासने■ महावितरणच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज विरणाचा परवाना देण्यासाठी खासगी कंपन्यांना विरोध केला जाईल, वीज नियामक आयोगाने तसा प्रयत्न केला तर सरकार विरोध करेल. ■ कंत्राटी व आऊटसोर्सिंगच्या कर्मचायांना सामाजिक सुरक्षा दिली जाईल.■ रिक्त जागा भरताना कंत्राटी कामगारांना अधिक गुण देवून सामावून घेण्याचे धोरण तयार केले जाईल.■ कोणताही जलविद्युत प्रकल्प खासगी कंपन्यांना देणार नाही.

समन्वय वाढवू नफ्यातील विभाग खासगी कंपनीला देणे योग्य नाही. त्यामुळे या कंपन्यांपुढील संकट वाढेल. सरकारी कंपनीच्या हिताचाच निर्णय एमआरसीच्या माध्यमातून झाला पाहिजे, असे राज्य सरकारचे स्पष्ट धोरण आहे. संघटनेचेही तेच म्हणणे आहे. परंतु, समन्वयाअभावी हा प्रश्न निर्माण झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

राज्य सरकारला आपल्या तीनही कंपन्यांचे कुठलेही खासगीकरण करायचे नाही. त्यामुळे खासगीकरण करण्याचा प्रश्नच येत नाही, ओडिशा, दिल्ली येथे जवळपास पन्नास टक्के खासगीकरण झाले असले तरी तसे महाराष्ट्रात करण्याचा आमचा कोणताही विचार नाही.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस