शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

पंतप्रधान मोदींचे खरे स्वच्छतादूत

By admin | Updated: April 14, 2017 18:52 IST

योगेश पांडे नागपूर, दि. 14 : एरवी उन्हाळ्यातील एखादी सभा म्हटली की कार्यक्रमानंतर प्लॅस्टिकच्या बॉटल, पाणी पाऊच यांचा खच ...

योगेश पांडेनागपूर, दि. 14 : एरवी उन्हाळ्यातील एखादी सभा म्हटली की कार्यक्रमानंतर प्लॅस्टिकच्या बॉटल, पाणी पाऊच यांचा खच दिसून येतो. प्रशासनाकडून स्वच्छता होईलच या विचारातून लोक आपली जबाबदारी सोयीस्कररित्या विसरतात. मात्र महात्मा गांधी यांची स्वच्छतेशी शिकवण व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतसंदर्भात सुरू केलेली मोहिम यातून प्रेरणा घेऊन एका निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याने अनोखा पुढाकार घेतला. मानकापूर क्रीडा संकुल परिसरात मोदींच्या सभास्थळाबाहेरील परिसरात गजानन मारवाडे यांनी प्रशासनाची प्रतिक्षा न करता स्वत: लोकांनी फेकलेल्या पाण्याच्या रिकाम्या बॉटल्सउचलण्यास सुरुवात केली. सभा सुरू झाल्यापासून ते कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचे हे काम अव्याहतपणे सुरू होते हे विशेष. मारवाडे हे मोदींचे खरे स्वच्छतादूत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. नागपुरातील तापमान ४२ अंशांहून अधिक असले तरी भर दुपारी सभास्थळाबाहेरील ३ डोममध्ये हजारो लोक उपस्थित होते. उकाडा लक्षात घेता पंतप्रधानांच्या सभास्थळी प्रशासन तसेच उर्जा विभागाकडून पिण्याच्या सीलबंद बॉटल्सची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी २० हून अधिक काऊंटर्सदेखील लावण्यात आले होते. मात्र लोक पाणी पिल्यानंतर खुर्चीच्या शेजारी किंवा मोकळ््या जागेत बॉटल्स फेकत होते.कचरा उचलण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी किंवा सफाई कर्मचारी दिसून आले नाही. परंतु अचानक डोक्यावर गांधी टोपी घातलेले मारवाडे मोठी थैली घेऊन आले व कुणाशीही काहीही न बोलता लोकांच्या पायाशी पडलेल्या रिकाम्या ह्यबॉटल्सह्णचा कचरा उचलायला लागले. त्यांच्या या कृतीने मंडपातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले. अनेकांना ते मनपाचे कर्मचारी वाटले तर काहींना सफाई कर्मचारी. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्यातून २ महिन्यांपूर्वीच निवृत्त झालेल्या मारवाडे यांना याचे वाईट वाटले नाही. ते एखाद्या मिशनप्रमाणे आपले काम करत होते. कार्यक्रम झाल्यानंतरदेखील ते बॉटल्स गोळा करताना दिसून आले. परिसरातून त्यांनी २ तासात हजारो ह्यबॉटल्सह्ण उचलल्या. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात काही लहान मुलांनीदेखील त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन हा कचरा गोळा करण्याचा प्रयत्न केला.मी देशाचा नागरिक, ही जबाबदारीचयासंदर्भात गजाजन मारवाडे यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता त्यांनी आपली ओळख सांगितली. मी मनपाचा सफाई कर्मचारी नाही. मात्र देशाचा नागरिक आहे व स्वच्छता राखणे ही माझी जबाबदारी आहे. इतर लोक जबाबदारी झटकतात म्हणून मी का दुर्लक्ष करायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील पुस्तक प्रकाशनादरम्यान कापलेली रिबिन स्वत:च्या खिशात ठेवतात. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन कृतीतून समाजाला संदेश देण्याचा माझा प्रयत्न असतो, असे मारवाडे यांनी सांगितले.

https://www.dailymotion.com/video/x844voz