शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले नाशिकच्या मयूर पाटीलचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 08:04 IST

Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. २८) राष्ट्राला संबोधून केलेल्या ‘मन की बात’च्या ८३ व्या भागात नाशिकचा युवक मयूर पाटील याने त्याच्या सहकाऱ्यांसह प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे.

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. २८) राष्ट्राला संबोधून केलेल्या ‘मन की बात’च्या ८३ व्या भागात नाशिकचा युवक मयूर पाटील याने त्याच्या सहकाऱ्यांसह प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे. खुद्द पंतप्रधानांनी मयूरच्या कार्याची दखल घेतल्याने ‘लोकमत’ने त्याच्याशी संवाद साधला असता त्याने आपल्या कल्पनेची माहिती दिली. कॉलेजमध्ये असताना तो दुचाकी वापरत होता. तिची सरासरी (मायलेज) अत्यंत कमी होते आणि उत्सर्जन खूप जास्त होते. ती दोन स्ट्रोक मोटारसायकल होती. उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि मायलेज वाढविण्यासाठी, मयूरने प्रयत्न सुरू केले. २०११-१२ मध्ये त्याने सुमारे ६२ किलोमीटर प्रति लीटरने मायलेज वाढवले. त्यानंतर त्याचा आत्मविश्वास बळावला व काहीतरी नवीन निर्माण करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्याने सांगितले.

नाशिक शहरातील गंगापूर रोड येथील नवरचना शाळेतून मयूरने शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर मालेगाव येथील केबीएच पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या पदवीचे शिक्षण त्याने पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून पूर्ण केले आहे. मयूर पुढे म्हणाला, आम्ही स्टार्ट-अप इंडिया अंतर्गत नोंदणीकृत आहोत. आम्हाला पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आणि सांगण्यात आले की पंतप्रधानांना तुमच्याशी बोलायचे आहे, त्यांना तुमच्या उद्योगाबद्दल जाणून घ्यायचे आहे. मी कॉलेजमध्ये असताना माझ्याकडे सेकंड हँड मोटारसायकल होती, तिचे मायलेज खूप कमी होते आणि प्रदूषणाची पातळी जास्त होती. मेकॅनिकल शाखेचा विद्यार्थी या नात्याने मी माझ्या ज्ञानाचा उपयोग करण्याचे ठरविले. मी दुचाकीचे इंजीन उघडले आणि त्यावर काम केले, नंतर मला कळले की दुचाकीचे मायलेज २०-२५ किलोमीटरवरून ४० किलोमीटर झाले आहे. त्यामुळे आणखी मायलेज कसे वाढवता येईल यावर त्याने संशोधन सुरू केले. मयूरच्या मते पूर्वी कार्बोरेटेड वाहने होती, आता फ्युएल इंजेक्टेड वाहने आहेत. कोणत्याही ज्वलनासाठी हवा, इंधन आणि स्पार्क या तीन गोष्टींची आवश्यकता असते. हे ओळखून त्याने हवेतील घटकांवर संशोधन सुरू केले जे ऑप्टिमाइझ किंवा ऑटोमाइज केले जाऊ शकतात. जवळपास सात वर्षांनंतर कल्पना अमलात आणण्यात तो यशस्वी झाला. २०१८ मध्ये त्याने प्रादेशिक परिवहन महामंडळात पायलट प्रोजेक्ट केला. उत्पादन प्रकल्पासाठी गुंतवणूकदार शोधत आहेत. सध्या मोटारसायकल, ट्रक आणि बसचे फिल्टर तयार करण्यास तो सक्षम आहे. सर्व प्रकारच्या मॉडेल्सची पूर्तता करण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे, असे मयूर म्हणाला.

 उत्तम कल्पना निर्माण करण्यासाठी फक्त एक छोटीशी ठिणगी लागते. तुम्ही एखादी गोष्ट करू शकत नाही असे कोणी म्हणत असेल, तर ती प्रेरणा असू शकते. कुटुंबाच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्याशिवाय एखादी गोष्ट साध्य करता येत नाही. चांगली नोकरी मिळवण्याचा पारंपरिक मार्ग सोडून वेगळा मार्ग शोधावा. -मयूर पाटील

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNashikनाशिक