शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने मोदींच्या 'या' ड्रीम प्रोजेक्टला लागणार ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 14:11 IST

जपानच्या सहकार्याने बनविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाला शेतकरी आधीच विरोध करीत आहेत.

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत राज्य असलेल्या महाराष्ट्रात भाजपची सत्ता गेल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला ब्रेक लागणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास बुलेट ट्रेनला देण्यात येणारा निधी शेतकऱ्यांना कर्जपासून मुक्त करण्यासाठी वापरून सरसकट कर्जमाफी केली जाईल असं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

जपानच्या सहकार्याने सुरु असलेल्या या प्रकल्पाला शेतकरी आधीच विरोध करीत आहेत. तर या बुलेट ट्रेन प्रकल्पाला राज्य सरकार निधी देणार असून त्यात महाराष्ट्राचा सुद्धा सहभाग असणार आहे. त्यामुळे या प्रकल्पामध्ये राज्य सरकार २५ टक्के निधी देणार होते. बुलेट ट्रेन भाजप आणि पंतप्रधान मोदींसाठी अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. सन २०२२ पर्यंत पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई पर्यंत ५०८ कि.मी. धावणार असल्याची योजना आहे.

या प्रकल्पासाठी १ लाख ८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी म्हणजेच 'जिका' ही कंपनी नाममात्र व्याजाने प्रदीर्घ काळासाठी कर्जपुरवठा करणार आहे. भारतीय रेल्वे, महाराष्ट्र आणि गुजरात सरकार तसेच जिका यांच्या संयुक्त अर्थसाह्यातून हा प्रकल्प आकारास येणार आहे. मात्र आता मोदींच्या या ड्रीम प्रोजेक्टला महाविकास आघाडीचं सरकार ब्रेक लावणार आहे.

किमान समान कार्यक्रमात ठरलेल्या धोरणाप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण कमी करणं हे महाविकासआघाडी सरकारचं पहीलं धोरण असल्याचं आमदार नाना पटोले यांनी सांगितलं आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनसाठी ठेवण्यात आलेले १० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना कर्जपासून मुक्त करण्यासाठी वापरून सरसकट कर्जमाफी केली जाईल असेही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्प कधीही बंद पडू शकते.