शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने मोदींच्या 'या' ड्रीम प्रोजेक्टला लागणार ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 14:11 IST

जपानच्या सहकार्याने बनविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाला शेतकरी आधीच विरोध करीत आहेत.

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत राज्य असलेल्या महाराष्ट्रात भाजपची सत्ता गेल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला ब्रेक लागणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास बुलेट ट्रेनला देण्यात येणारा निधी शेतकऱ्यांना कर्जपासून मुक्त करण्यासाठी वापरून सरसकट कर्जमाफी केली जाईल असं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

जपानच्या सहकार्याने सुरु असलेल्या या प्रकल्पाला शेतकरी आधीच विरोध करीत आहेत. तर या बुलेट ट्रेन प्रकल्पाला राज्य सरकार निधी देणार असून त्यात महाराष्ट्राचा सुद्धा सहभाग असणार आहे. त्यामुळे या प्रकल्पामध्ये राज्य सरकार २५ टक्के निधी देणार होते. बुलेट ट्रेन भाजप आणि पंतप्रधान मोदींसाठी अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. सन २०२२ पर्यंत पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई पर्यंत ५०८ कि.मी. धावणार असल्याची योजना आहे.

या प्रकल्पासाठी १ लाख ८ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी म्हणजेच 'जिका' ही कंपनी नाममात्र व्याजाने प्रदीर्घ काळासाठी कर्जपुरवठा करणार आहे. भारतीय रेल्वे, महाराष्ट्र आणि गुजरात सरकार तसेच जिका यांच्या संयुक्त अर्थसाह्यातून हा प्रकल्प आकारास येणार आहे. मात्र आता मोदींच्या या ड्रीम प्रोजेक्टला महाविकास आघाडीचं सरकार ब्रेक लावणार आहे.

किमान समान कार्यक्रमात ठरलेल्या धोरणाप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण कमी करणं हे महाविकासआघाडी सरकारचं पहीलं धोरण असल्याचं आमदार नाना पटोले यांनी सांगितलं आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनसाठी ठेवण्यात आलेले १० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना कर्जपासून मुक्त करण्यासाठी वापरून सरसकट कर्जमाफी केली जाईल असेही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्प कधीही बंद पडू शकते.