शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

ठाण्यात ९०६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

By admin | Updated: October 7, 2014 05:38 IST

निवडणूक काळात समाजकंटकांकडून कोणत्याही कारवाया होऊ नये म्हणून पोलीस काळजी घेत आहेत.

पंकज रोडेकर, ठाणेनिवडणूक काळात समाजकंटकांकडून कोणत्याही कारवाया होऊ नये म्हणून पोलीस काळजी घेत आहेत. त्या दृष्टीने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तसेच विविध आंदोलनांमध्ये भाग घेणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. जिल्ह्यातील ठाणे शहर, ग्रामीण आणि नवी मुंबई या भागांत पोलिसांनी ९०६ जणांवर प्रतिबंधात्मक करवाई केली आहे. लोकसभा निवडणूक जिल्ह्यात पूर्णपणे शांततेमध्ये पार पडली होती. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नव्हता. विधानसभा निवडणूकही शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील पोलिसांनी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडीत बिघाडी झाल्याने ते-ते पक्ष निवडणूक आखाड्यात आमने-सामने उतरले आहेत. तसेच इच्छुकांना उधाण आल्याने जिल्ह्यात २३८ उमेदवार रिंगणात आहेत. साधारणत: प्रत्येक मतदारसंघात १० उमेदवार आहेत. सर्वाधिक २२ उमेदवार उल्हासनगर मतदारसंघात आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे पोलिसांचीही कसोटी लागणार आहे. यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील ठाणे शहर, ग्रामीण पोलीस आणि नवी मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक १ हजार ४०९ प्रकरणांपैकी ९०६ जणांवर कारवाई केली आहे. यात ठाणे पोलिसांनी ३५४, नवी मुंबई पोलिसांनी १२१ तर ठाणे ग्रामीण पोलिसांनी ४३१ जणांवर कारवाईचा बडगा उगारल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)