शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:42 IST

राज्य मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने विस्तार करावा यासाठी पक्षातूनच त्यांच्यावर दबाव वाढत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुख्यमंत्रीही विस्तारासाठी अनुकूल असले तरी विदेश दौऱ्याहून परतल्यानंतर ते विस्तार करतील, असे दिसते.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने विस्तार करावा यासाठी पक्षातूनच त्यांच्यावर दबाव वाढत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुख्यमंत्रीही विस्तारासाठी अनुकूल असले तरी विदेश दौऱ्याहून परतल्यानंतर ते विस्तार करतील, असे दिसते.मुख्यमंत्री ९ जूनपासून सहा दिवस विदेश दौºयावर जात आहेत. तेथून परतल्यानंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विस्तार नक्की होईल, असे सूत्रांनी सांगितले. पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासून नागपुरात सुरू होत आहे. प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार हे मुख्यमंत्र्यांचे ज्येष्ठ सहकारी विस्तारासाठी विशेष आग्रही असल्याचे म्हटले जाते. या शिवाय, रेंगाळलेल्या विस्ताराबाबत पक्षामध्ये नाराजीचे सूर आहेत. विधानसभेची निवडणूक आॅक्टोबर २०१९ मध्ये होणार आहे. लगेच विस्तार केला तर नवीन मंत्र्यांना १५ महिन्यांचा कार्यकाळ मिळेल आणि त्यांना काही कामगिरी करून दाखविता येईल. विस्तार आणखी रेंगाळला तर विस्ताराचा हेतूच पराभूत होईल, अशी भाजपांतर्गत भावना आहे. २०१४ च्या निवडणुकीत अन्य पक्षातून भाजपात येऊन आमदार झालेल्यांची संख्या मोठी होती पण त्यापैकी कोणालाही मंत्रीपद दिले गेले नाही. आता त्यांच्यापैकी एकदोघांना मंत्री केले तर भाजपात बाहेरून आलेल्यांना चांगली संधी मिळते, असा संदेश जाईल, असाही सूर आहे. शिवसेनेला आपल्या काही मंत्र्यांना वगळून नवीन चेहºयांना संधी द्यायची आहे का, या बाबत फडणवीस हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी विस्तारापूर्वी चर्चा करणार असल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस