शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती राजवट की काळजीवाहू सरकार?

By admin | Updated: September 27, 2014 05:51 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठवून दिला

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठवून दिला. विधानसभा निवडणुकीला उणेपुरे २० दिवस बाकी असताना आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची की, काळजीवाहू सरकारला काम पाहू द्यायचे, यावर राज्यपालांनी विधी व न्याय विभागाचे मत मागविले आहे.राष्ट्रवादीने काँग्रेसशी असलेली आघाडी तोडून स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय गुरुवारी रात्री जाहीर केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार रात्रीच राजभवनावर जाऊन राज्यपालांना भेटले आणि त्यांनी राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर पडत असल्याचे पत्र दिले. मुख्यमंत्री चव्हाण यांनी आज सकाळी ८.३०ला राजभवनावर राज्यपालांची भेट घेऊन उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. सरकार अल्पमतात आले असल्याने आपण राजीनामा देऊ इच्छितो, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी त्या वेळीच व्यक्त केली, असे सूत्रांनी सांगितले. तर राज्य सरकार अल्पमतात आले असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी राज्यपालांकडे केली. या घटनाक्रमानंतर राज्यपालांनी विधी व न्याय विभागाचे मत मागविले. तसेच दुपारी ३च्या सुमारास महाधिवक्ता दरियास खंबाटा यांना राजभवनावर पाचारण केले. उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा, याबाबत त्यांनी कायदेशीर बाजू तपासून पाहिल्या.नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारला करायची की, सध्याच्या सरकारला काळजीवाहू म्हणून काम करण्यास सांगायचे, याबाबतचा निर्णय राज्यपाल उद्यापर्यंत घेतील. (विशेष प्रतिनिधी)