शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती राजवट की काळजीवाहू सरकार?

By admin | Updated: September 27, 2014 05:51 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठवून दिला

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठवून दिला. विधानसभा निवडणुकीला उणेपुरे २० दिवस बाकी असताना आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची की, काळजीवाहू सरकारला काम पाहू द्यायचे, यावर राज्यपालांनी विधी व न्याय विभागाचे मत मागविले आहे.राष्ट्रवादीने काँग्रेसशी असलेली आघाडी तोडून स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय गुरुवारी रात्री जाहीर केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार रात्रीच राजभवनावर जाऊन राज्यपालांना भेटले आणि त्यांनी राष्ट्रवादी सरकारमधून बाहेर पडत असल्याचे पत्र दिले. मुख्यमंत्री चव्हाण यांनी आज सकाळी ८.३०ला राजभवनावर राज्यपालांची भेट घेऊन उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. सरकार अल्पमतात आले असल्याने आपण राजीनामा देऊ इच्छितो, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी त्या वेळीच व्यक्त केली, असे सूत्रांनी सांगितले. तर राज्य सरकार अल्पमतात आले असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी राज्यपालांकडे केली. या घटनाक्रमानंतर राज्यपालांनी विधी व न्याय विभागाचे मत मागविले. तसेच दुपारी ३च्या सुमारास महाधिवक्ता दरियास खंबाटा यांना राजभवनावर पाचारण केले. उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा, याबाबत त्यांनी कायदेशीर बाजू तपासून पाहिल्या.नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारला करायची की, सध्याच्या सरकारला काळजीवाहू म्हणून काम करण्यास सांगायचे, याबाबतचा निर्णय राज्यपाल उद्यापर्यंत घेतील. (विशेष प्रतिनिधी)